Shuru
Apke Nagar Ki App…
वाशिम जिल्ह्याच्या बिटोडा भोयर ग्रामपंचायतीत दोन वर्षांपासून प्रशासक असूनही मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. गटारं तुंबल्याने गावात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लाखो रुपयांचा निधी येऊनही कामे न झाल्याने नागरिक उच्च अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची मागणी करत आहेत.
अनंता लक्ष्मण घुगे
वाशिम जिल्ह्याच्या बिटोडा भोयर ग्रामपंचायतीत दोन वर्षांपासून प्रशासक असूनही मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. गटारं तुंबल्याने गावात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लाखो रुपयांचा निधी येऊनही कामे न झाल्याने नागरिक उच्च अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची मागणी करत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विडोळी ते देवठाणा (मंठा) येथील शिवपांदण रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तब्बल १५ दिवसांपासून सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालय परिसरात चारा, पाणी आणि वैरण घेऊन अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विडोळी खुर्द आणि विडोळी बु. शिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा हा शिवपांदण रस्ता अनेक वर्षांपासून वादात अडकला आहे. या रस्त्याचे बहुतांश काम लोकवर्गणीतून पूर्ण झाले असले, तरी उर्वरित काही अंतराच्या कामात काही शेतकऱ्यांकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. यासंदर्भात अनेकवेळा निवेदने, तक्रारी, पंचनामे आणि नोटिसा देऊनही रस्ता प्रत्यक्षात खुला न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने आणि कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेती हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असल्याने, रस्ता बंद असल्यामुळे शेतमाल वाहतूक, जनावरांची ने-आण तसेच दैनंदिन शेतीची कामे करताना मोठ्या अडचणी येत आहेत. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात चारा, पाणी व वैरण आणून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रशासनाला आता तरी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे म्हटले आहे. या आंदोलनामुळे मंठा तालुक्यात शिवपांदण रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- मंठा येथे हिंदू जनजागरण समिती आणि अशोक भाऊ चव्हाण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन संरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील चलानी कॉलनीतील राम मंदिराजवळ दिनांक १६ जून ते २७ जून या कालावधीत हे शिबिर भरवण्यात येणार आहे. सर्व युवक-युवतींनी सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समिती आणि अशोक भाऊ चव्हाण सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.1
- मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ च्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधीसाठी पंचायत समितीचे हेलपाटे घालावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तब्बल सहा महिने उलटूनही निधी न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संतापापोटी, १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती गाठून गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा थेट आरोप करत, पैसे देऊनही वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची खंत व्यक्त केली. "घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?" असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे गोरगरीबांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी त्यांच्या खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. गोरगरीबांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असतानाही, कागदपत्रे पूर्ण करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी त्रास सहन करावा लागत असेल, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. आता लाभार्थ्यांच्या या गंभीर आरोपांची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई होते की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- मंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 144 देशी दारूच्या बाटल्या, दोन मोटारसायकली आणि ₹1 लाख 29 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई 15 जून रोजी सायंकाळी सुमारे 7.25 वाजता गेवराई पाटी येथे करण्यात आली. यामध्ये पाटोदा, ता. मंठा येथील रहिवासी ईरसान आगाखाँ पठाण (वय 44) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून भिंगरी संत्रा कंपनीच्या 180 एम.एल. क्षमतेच्या 96 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली हिरो एच.एफ. डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईत ₹69,600 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक 318/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65(अ),(आ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी रात्री सुमारे 7.45 वाजता विडोळी फाटा येथे दुसरी कारवाई करण्यात आली. घारे कॉलनी, मंठा येथील रहिवासी रवी हनुमंतराव सूर्यवंशी (वय 36) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून भिंगरी संत्रा कंपनीच्या 48 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण ₹59,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक 317/2026 दाखल करण्यात आला आहे. मंठा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही कारवाया पार पडल्या असून, पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.1
- खामगाव येथे एक विहीर खचल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत काही मजूर गाडले गेले आहेत. प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.1
- क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली १६ जून रोजी बुलढाणा येथे सुरू झालेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाने आता राज्यव्यापी जनआंदोलनाचे रूप घेतले आहे. शासनाच्या फसव्या, दिशाभूल करणाऱ्या आणि जाचक अटींनी भरलेल्या कर्जमाफीच्या जी.आर. विरोधात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला असून, गावागावात जी.आर.च्या होळ्या पेटवल्या जात आहेत. बुलढाणा, वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. बुलढाणा जिल्ह्यातील डोमरूळ, दहिद बु., तांदूळवाडी, अटकळ, अंभोडा आणि मेहकर येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या कर्जमाफीच्या जी.आर.ची जाहीर होळी केली. मेहकर तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन करत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. वाशीम जिल्ह्यातील अडोळी येथे एका शेतकऱ्याने आंदोलनाला पाठिंबा देत स्वतःची दुचाकी पेटवून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला, तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे शेतकऱ्यांनी फसव्या जी.आर.ची होळी करत सरसकट कर्जमुक्तीची मागणी केली. या आंदोलनात सरपंच विनोद विरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश खडसे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते, जिथे "कर्जमाफी नाही तर सरकारला माफी नाही" आणि "शेतकरी वाचवा, शेती वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून, लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणारा हा जी.आर. स्वीकारला जाणार नाही. ते म्हणाले की, आज गावागावात जी.आर.च्या होळ्या पेटल्या आहेत, उद्या महाराष्ट्रभर सरकारविरोधात संघर्षाची ज्वाला भडकणार आहे. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. तुपकर यांनी पुढे म्हटले की, शेतकरी आता जागा झाला असून, आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळाच्या संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव संघर्षाचे केंद्र बनेल आणि सरकारला शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून शेतकरी, सामाजिक संघटना, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. गावागावात पेटलेली ही ठिणगी आता व्यापक जनआक्रोशात रूपांतरित होत असून, सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. "ही फक्त सुरुवात आहे," असे सांगत सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय आणि शेतीला जगण्याची हमी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शेतकरी आता मागे हटणार नसून, हक्क मिळेपर्यंत लढा देणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.1
- मंठा प्रतिनिधीनुसार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आकणी येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवांतर्गत, नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडीतून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करत नव्या विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश पूर्ण करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तर शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मध्यान्ह भोजनात गोड पदार्थही देण्यात आले. याच प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तथा दिवंगत अमृतराव नामदेवराव मोरे (सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी, परभणी) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी श्रीमती गांगुताई अमृतराव मोरे (सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, परभणी) यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल आडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन मोरे, समिती सदस्य संदिपान मोरे, ज्ञानेश्वर कदम, अंकुश खनके, संगम मोरे, शेख महंमद, दत्ता बोराडे, किशोर मोरे, दत्ता लोहटे यांच्यासह मुख्याध्यापक कैलास उबाळे, सहशिक्षक विठ्ठल तरवटे, अमोल लवटे, श्रीमती स्वाती बनसोडे, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात झालेले स्वागत आणि शिक्षणाविषयीचा सकारात्मक संदेश देणारा हा प्रवेशोत्सव गावकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.1
- बुलडाणा जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यावरून सक्ती केली जात आहे. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.1
- नांदेड विमानतळावरून खासदार संजय जाधव आणि खासदार संजय देशमुख एकाच खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. या घटनेमुळे 'ऑपरेशन टायगर' सुरू झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.1