logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन बीटमध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर आणि बनावट हातभट्टी दारू दुकाने लावून विकली जात आहेत, तसेच वरळी मटका आणि ५२ पत्त्यांचा जुगार बिनधोकपणे सुरू आहे. गावात पोलीस स्टेशन असूनही बिटरगाव (बु) मध्ये अनेक देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि चार वरळी मटका दुकाने सुरू आहेत. याशिवाय पिंपळगाव (वन), जेवली, येकंबा (वन), मोरचंडी, मुरली, आकोली आणि करंजी या गावांमध्येही असेच अवैध धंदे सुरू आहेत. बिटरगावातील बस स्टॉपला लागून दारू आणि वरळी मटका दुकाने, बिटरगाव ते जेवली रोडला लागून देशी-विदेशी विक्री दुकाने, रसवंतीच्या नावाखाली दारू दुकाने आणि कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी-विदेशी दारू दुकाने आहेत. इतकेच नाही तर बिटरगाव ते मन्याळी रोडला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडी आणि आलू भजेच्या दुकानातही देशी व विदेशी दारू खुलेआम विकली जात आहे. या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले-बाळे भीक मागायला लागली आहेत. तरुण पिढी आणि विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढी बरबाद होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरळी मटका, ५२ पत्त्याचा जुगार आणि दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून, तक्रार करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रारी देतात, मात्र बीट जमादार साहेब महिलांच्या समाधानासाठी दारू विक्रेत्यांवर थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात आणि पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे सुरू करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशनचा सुरू असल्याने महिलांनी कोणाकडे न्याय मागावा, हा गंभीर प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की, हे सर्व माहीत असूनही बीट अमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करत आहेत आणि आमचे संसार देशोधडीला लावत आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वीही अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी एका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले होते. परंतु, अजूनही ती दुकाने बंद झालेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज, २२ जून २०२६, सोमवार रोजी ३०० हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली आहे. बीट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव (बु) बीटमधील अवैध धंदे सात दिवसांच्या आत बंद झाले नाहीत, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.

1 hr ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 hr ago

बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन बीटमध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर आणि बनावट हातभट्टी दारू दुकाने लावून विकली जात आहेत, तसेच वरळी मटका आणि ५२ पत्त्यांचा जुगार बिनधोकपणे सुरू आहे. गावात पोलीस स्टेशन असूनही बिटरगाव (बु) मध्ये अनेक देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि चार वरळी मटका दुकाने सुरू आहेत. याशिवाय पिंपळगाव (वन), जेवली, येकंबा (वन), मोरचंडी, मुरली, आकोली आणि करंजी या गावांमध्येही असेच अवैध धंदे सुरू आहेत. बिटरगावातील बस स्टॉपला लागून दारू आणि वरळी मटका दुकाने, बिटरगाव ते जेवली रोडला लागून देशी-विदेशी विक्री दुकाने, रसवंतीच्या नावाखाली दारू दुकाने आणि कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी-विदेशी दारू दुकाने आहेत. इतकेच नाही तर बिटरगाव ते मन्याळी रोडला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडी आणि आलू भजेच्या दुकानातही देशी व विदेशी दारू खुलेआम

विकली जात आहे. या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले-बाळे भीक मागायला लागली आहेत. तरुण पिढी आणि विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढी बरबाद होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरळी मटका, ५२ पत्त्याचा जुगार आणि दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून, तक्रार करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रारी देतात, मात्र बीट जमादार साहेब महिलांच्या समाधानासाठी दारू विक्रेत्यांवर थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात आणि पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे सुरू करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशनचा सुरू असल्याने महिलांनी कोणाकडे न्याय मागावा, हा गंभीर प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की, हे सर्व

माहीत असूनही बीट अमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करत आहेत आणि आमचे संसार देशोधडीला लावत आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वीही अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी एका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले होते. परंतु, अजूनही ती दुकाने बंद झालेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज, २२ जून २०२६, सोमवार रोजी ३०० हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली आहे. बीट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव (बु) बीटमधील अवैध धंदे सात दिवसांच्या आत बंद झाले नाहीत, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन बीटमध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर आणि बनावट हातभट्टी दारू दुकाने लावून विकली जात आहेत, तसेच वरळी मटका आणि ५२ पत्त्यांचा जुगार बिनधोकपणे सुरू आहे. गावात पोलीस स्टेशन असूनही बिटरगाव (बु) मध्ये अनेक देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि चार वरळी मटका दुकाने सुरू आहेत. याशिवाय पिंपळगाव (वन), जेवली, येकंबा (वन), मोरचंडी, मुरली, आकोली आणि करंजी या गावांमध्येही असेच अवैध धंदे सुरू आहेत. बिटरगावातील बस स्टॉपला लागून दारू आणि वरळी मटका दुकाने, बिटरगाव ते जेवली रोडला लागून देशी-विदेशी विक्री दुकाने, रसवंतीच्या नावाखाली दारू दुकाने आणि कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी-विदेशी दारू दुकाने आहेत. इतकेच नाही तर बिटरगाव ते मन्याळी रोडला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडी आणि आलू भजेच्या दुकानातही देशी व विदेशी दारू खुलेआम विकली जात आहे. या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले-बाळे भीक मागायला लागली आहेत. तरुण पिढी आणि विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढी बरबाद होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरळी मटका, ५२ पत्त्याचा जुगार आणि दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून, तक्रार करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रारी देतात, मात्र बीट जमादार साहेब महिलांच्या समाधानासाठी दारू विक्रेत्यांवर थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात आणि पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे सुरू करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशनचा सुरू असल्याने महिलांनी कोणाकडे न्याय मागावा, हा गंभीर प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की, हे सर्व माहीत असूनही बीट अमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करत आहेत आणि आमचे संसार देशोधडीला लावत आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वीही अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी एका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले होते. परंतु, अजूनही ती दुकाने बंद झालेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज, २२ जून २०२६, सोमवार रोजी ३०० हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली आहे. बीट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव (बु) बीटमधील अवैध धंदे सात दिवसांच्या आत बंद झाले नाहीत, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.
    3
    बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन बीटमध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर आणि बनावट हातभट्टी दारू दुकाने लावून विकली जात आहेत, तसेच वरळी मटका आणि ५२ पत्त्यांचा जुगार बिनधोकपणे सुरू आहे. गावात पोलीस स्टेशन असूनही बिटरगाव (बु) मध्ये अनेक देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि चार वरळी मटका दुकाने सुरू आहेत. याशिवाय पिंपळगाव (वन), जेवली, येकंबा (वन), मोरचंडी, मुरली, आकोली आणि करंजी या गावांमध्येही असेच अवैध धंदे सुरू आहेत. बिटरगावातील बस स्टॉपला लागून दारू आणि वरळी मटका दुकाने, बिटरगाव ते जेवली रोडला लागून देशी-विदेशी विक्री दुकाने, रसवंतीच्या नावाखाली दारू दुकाने आणि कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी-विदेशी दारू दुकाने आहेत. इतकेच नाही तर बिटरगाव ते मन्याळी रोडला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडी आणि आलू भजेच्या दुकानातही देशी व विदेशी दारू खुलेआम विकली जात आहे.

या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले-बाळे भीक मागायला लागली आहेत. तरुण पिढी आणि विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढी बरबाद होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरळी मटका, ५२ पत्त्याचा जुगार आणि दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून, तक्रार करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रारी देतात, मात्र बीट जमादार साहेब महिलांच्या समाधानासाठी दारू विक्रेत्यांवर थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात आणि पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे सुरू करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशनचा सुरू असल्याने महिलांनी कोणाकडे न्याय मागावा, हा गंभीर प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की, हे सर्व माहीत असूनही बीट अमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करत आहेत आणि आमचे संसार देशोधडीला लावत आहेत.

मागील तीन महिन्यांपूर्वीही अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी एका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले होते. परंतु, अजूनही ती दुकाने बंद झालेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज, २२ जून २०२६, सोमवार रोजी ३०० हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली आहे. बीट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव (बु) बीटमधील अवैध धंदे सात दिवसांच्या आत बंद झाले नाहीत, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दानपेट्या आज, २० जून रोजी उघडण्यात आल्या. संस्थानचे कोषाध्यक्ष अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोजणीमध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्यांमधून मोठा निधी जमा झाल्याचे समोर आले आहे. संस्थानच्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी सीलबंद केलेल्या एकूण ११ दानपेट्या उघडण्यात आल्या, ज्यात सभामंडपातील ४, महालक्ष्मी माता मंदिरातील १, तुळजाभवानी माता मंदिरातील १, मंदिर परिसरातील २, तसेच परशुराम मंदिराकडील ३ दानपेट्यांचा समावेश होता. या उघडणीप्रसंगी संस्थानचे कोषाध्यक्ष मा. अभिजीत जगताप यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत, व्यवस्थापक विजय नामदेवराव राऊत, लेखापाल योगेश साबळे आणि सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे उपस्थित होते. दानपेट्यांमधील सोन्या-चांदीच्या वस्तूंची तपासणी संस्थानचे अधिकृत सोनार सुशील प्रल्हादराव टाक यांनी केली. दानपेट्यांमधून रोख रक्कम म्हणून ४३ लाख ७३ हजार ७१३ रुपये जमा झाले, तर ९८ ग्रॅम सोने, १३ सोन्याचे नग, २ किलो ८०१ ग्रॅम चांदी आणि परशुराम पाळण्यातून २ किलो २९६ ग्रॅम चांदी प्राप्त झाली. याव्यतिरिक्त, ९ एप्रिल २०२६ ते २० जून २०२६ या कालावधीत संस्थानला देणगी विभागामार्फत ४० लाख ३६ हजार १५३ रुपये, साडी-पातळ विक्रीतून ३० लाख ४० हजार २२२ रुपये, आणि ऑनलाइन देणगी स्वरूपात २१ लाख ४५ हजार १३० रुपये मिळाले. पावत्यांद्वारे २१ ग्रॅम ४४० मिली सोने आणि ३ किलो ६३७ ग्रॅम ७४० मिली चांदी देखील प्राप्त झाली. या सर्व प्रकारच्या देणग्यांची एकत्रित बेरीज करता, श्री रेणुकादेवी संस्थानला या संबंधित कालावधीत एकूण १ कोटी ३५ लाख ९५ हजार २१८ रुपयांची मोठी प्राप्ती झाली आहे. ही आकडेवारी भाविकांचा रेणुकामातेवरील दृढ विश्वास आणि श्रद्धेमुळे संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असल्याचे दर्शवते. संस्थान प्रशासनाने सर्व भाविकांचे आभार मानले असून, या सर्व देणग्यांचा वापर धार्मिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी पूर्णपणे पारदर्शकपणे केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, अधिक महिना असल्याने आई रेणुका मातेला अर्पण करण्यात आलेली पितळ, तांबे आणि स्टीलची भांडी यांची सविस्तर नोंद व्यवस्थापक विजय नामदेवराव राऊत यांनी करून ठेवली आहे.
    3
    माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दानपेट्या आज, २० जून रोजी उघडण्यात आल्या. संस्थानचे कोषाध्यक्ष अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोजणीमध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्यांमधून मोठा निधी जमा झाल्याचे समोर आले आहे.

संस्थानच्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी सीलबंद केलेल्या एकूण ११ दानपेट्या उघडण्यात आल्या, ज्यात सभामंडपातील ४, महालक्ष्मी माता मंदिरातील १, तुळजाभवानी माता मंदिरातील १, मंदिर परिसरातील २, तसेच परशुराम मंदिराकडील ३ दानपेट्यांचा समावेश होता. या उघडणीप्रसंगी संस्थानचे कोषाध्यक्ष मा. अभिजीत जगताप यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत, व्यवस्थापक विजय नामदेवराव राऊत, लेखापाल योगेश साबळे आणि सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे उपस्थित होते. दानपेट्यांमधील सोन्या-चांदीच्या वस्तूंची तपासणी संस्थानचे अधिकृत सोनार सुशील प्रल्हादराव टाक यांनी केली.

दानपेट्यांमधून रोख रक्कम म्हणून ४३ लाख ७३ हजार ७१३ रुपये जमा झाले, तर ९८ ग्रॅम सोने, १३ सोन्याचे नग, २ किलो ८०१ ग्रॅम चांदी आणि परशुराम पाळण्यातून २ किलो २९६ ग्रॅम चांदी प्राप्त झाली. याव्यतिरिक्त, ९ एप्रिल २०२६ ते २० जून २०२६ या कालावधीत संस्थानला देणगी विभागामार्फत ४० लाख ३६ हजार १५३ रुपये, साडी-पातळ विक्रीतून ३० लाख ४० हजार २२२ रुपये, आणि ऑनलाइन देणगी स्वरूपात २१ लाख ४५ हजार १३० रुपये मिळाले. पावत्यांद्वारे २१ ग्रॅम ४४० मिली सोने आणि ३ किलो ६३७ ग्रॅम ७४० मिली चांदी देखील प्राप्त झाली.

या सर्व प्रकारच्या देणग्यांची एकत्रित बेरीज करता, श्री रेणुकादेवी संस्थानला या संबंधित कालावधीत एकूण १ कोटी ३५ लाख ९५ हजार २१८ रुपयांची मोठी प्राप्ती झाली आहे. ही आकडेवारी भाविकांचा रेणुकामातेवरील दृढ विश्वास आणि श्रद्धेमुळे संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असल्याचे दर्शवते. संस्थान प्रशासनाने सर्व भाविकांचे आभार मानले असून, या सर्व देणग्यांचा वापर धार्मिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी पूर्णपणे पारदर्शकपणे केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, अधिक महिना असल्याने आई रेणुका मातेला अर्पण करण्यात आलेली पितळ, तांबे आणि स्टीलची भांडी यांची सविस्तर नोंद व्यवस्थापक विजय नामदेवराव राऊत यांनी करून ठेवली आहे.
    user_सक्षम महाराष्ट्र न्युज
    सक्षम महाराष्ट्र न्युज
    Newspaper advertising department माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे सोमवार, २२ जून रोजी श्री संत तुकामाई यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीस ते पस्तीस हजार भाविक दाखल झाले होते, ज्यांनी मोठ्या भक्तीभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. येहळेगाव तुकाराम हे हिंगोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, येथे संत तुकामाई यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी शंभर फूट बांधकाम करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यतिथीनिमित्त सलग आठ दिवस मोठ्या भक्तीभावाने पारायणे करण्यात आली, ज्यात आठव्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते. 'तुकामाई पारायण मंडळ येहळेगाव' आणि 'परभणी पारायण मंडळ' यांनी सामुदायिक पारायण करून आरती केली. या वेळी संतोष जाधव, विजय बाट, अविनाश जाधव, तुकाराम काळे, माणिकराव नांगरे, बबन नांगरे, परमेश्वर बाट, येहळेगाव तुकामाई पारायण महिला मंडळ तसेच परभणी येथील संजय गुरु, मिलिंदराव कुलकर्णी, नरेंद्र शुक्ल, गोपाळ कान्हेकर, संजय पाठक, प्रेमकुमार जोशी, दत्तात्रय अंबेकर, मानवतकर आणि धनंजय बोरवडकर यांनीही पारायण करून आरती केली. यावर्षी महाप्रसादासाठी शिरा, पुरी आणि मिश्रित भाजी तयार करण्यात आली होती, येथील मिश्रित भाजीला विशेष महत्त्व आहे. येहळेगाव तुकाराम येथील मंदिर परिसर तसेच जवळच असलेल्या मरडगाव येथे तब्बल पाच ते सात एकर जमिनीवर भाविकांनी पंगती धरून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. एकूण तीस ते पस्तीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
    1
    कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे सोमवार, २२ जून रोजी श्री संत तुकामाई यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीस ते पस्तीस हजार भाविक दाखल झाले होते, ज्यांनी मोठ्या भक्तीभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.

येहळेगाव तुकाराम हे हिंगोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, येथे संत तुकामाई यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी शंभर फूट बांधकाम करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यतिथीनिमित्त सलग आठ दिवस मोठ्या भक्तीभावाने पारायणे करण्यात आली, ज्यात आठव्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.

'तुकामाई पारायण मंडळ येहळेगाव' आणि 'परभणी पारायण मंडळ' यांनी सामुदायिक पारायण करून आरती केली. या वेळी संतोष जाधव, विजय बाट, अविनाश जाधव, तुकाराम काळे, माणिकराव नांगरे, बबन नांगरे, परमेश्वर बाट, येहळेगाव तुकामाई पारायण महिला मंडळ तसेच परभणी येथील संजय गुरु, मिलिंदराव कुलकर्णी, नरेंद्र शुक्ल, गोपाळ कान्हेकर, संजय पाठक, प्रेमकुमार जोशी, दत्तात्रय अंबेकर, मानवतकर आणि धनंजय बोरवडकर यांनीही पारायण करून आरती केली.

यावर्षी महाप्रसादासाठी शिरा, पुरी आणि मिश्रित भाजी तयार करण्यात आली होती, येथील मिश्रित भाजीला विशेष महत्त्व आहे. येहळेगाव तुकाराम येथील मंदिर परिसर तसेच जवळच असलेल्या मरडगाव येथे तब्बल पाच ते सात एकर जमिनीवर भाविकांनी पंगती धरून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. एकूण तीस ते पस्तीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आता पुणे शहरामध्ये बदली झाली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.
    1
    नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आता पुणे शहरामध्ये बदली झाली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
    1
    अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर असलेल्या नुक्ती गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार उमेश भेंडारे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे. घाटंजी पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर असलेल्या नुक्ती गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार उमेश भेंडारे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे. घाटंजी पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    14 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.