अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये सुमारे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानाचा अंदाज घेऊन पिकांचे योग्य नियोजन करावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी, जमिनीचा प्रकार, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊनच पिकांची निवड करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तालुक्यात यंदा २५ हजार हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार हेक्टरवर मका आणि ९ हजार ६०० हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी तालुक्यात एकूण ५७ हजार ०८४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती, ज्यामध्ये सोयाबीन २६ हजार २५४ हेक्टर, मका ९ हजार २८५ हेक्टर आणि कापूस ९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्रावर होता. कृषी विभागाने कोरडवाहू भागात किमान ७५ ते १०० मि.मी. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच घाई न करता पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीपूर्वी माती परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा आणि रासायनिक खतांचा अतिरेक टाळून शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत व जैविक खतांचा वापर वाढवावा. पेरणीसाठी केवळ प्रमाणित व सत्यप्रत बियाण्यांचा वापर करून, रोगांपासून संरक्षणासाठी बुरशीनाशक आणि रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्मा या जैविक घटकांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच, तालुक्यातील मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि ओलावा संवर्धनासाठी बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीचा अवलंब उपयुक्त ठरेल. कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे, फेरोमोन सापळे आणि जैविक कीडनियंत्रणाचा वापर करावा आणि आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांत तणांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, पीक संरक्षण आणि जैविक शेतीसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पात्रतेनुसार अर्ज करावेत आणि अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये सुमारे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानाचा अंदाज घेऊन पिकांचे योग्य नियोजन करावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी, जमिनीचा प्रकार, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊनच पिकांची निवड करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तालुक्यात यंदा २५ हजार हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार हेक्टरवर मका आणि ९ हजार ६०० हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी तालुक्यात एकूण ५७ हजार ०८४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती, ज्यामध्ये सोयाबीन २६ हजार २५४ हेक्टर, मका ९ हजार २८५ हेक्टर आणि कापूस ९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्रावर होता. कृषी विभागाने कोरडवाहू भागात किमान ७५ ते १०० मि.मी. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच घाई न करता पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीपूर्वी माती परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा आणि रासायनिक खतांचा अतिरेक टाळून शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत व जैविक खतांचा वापर वाढवावा. पेरणीसाठी केवळ प्रमाणित व सत्यप्रत बियाण्यांचा वापर करून, रोगांपासून संरक्षणासाठी बुरशीनाशक आणि रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्मा या जैविक घटकांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच, तालुक्यातील मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि ओलावा संवर्धनासाठी बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीचा अवलंब उपयुक्त ठरेल. कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे, फेरोमोन सापळे आणि जैविक कीडनियंत्रणाचा वापर करावा आणि आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांत तणांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, पीक संरक्षण आणि जैविक शेतीसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पात्रतेनुसार अर्ज करावेत आणि अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींसाठी पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या मुलींसाठी मोफत निवासी आणि भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तरुणी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. या मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे. इच्छुकांना पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले येथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागेल. या सुवर्णसंधीबाबत अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ९९६०११२६०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मुलींनी आजच आपले अर्ज सादर करून पोलीस किंवा सैन्यदलातील करिअरच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकावे.1
- शिरूर तालुक्यातील कान्हेर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत एवरी डेनिसन व मॅजिक बस यांच्या सहकार्याने लोकशाही पद्धतीने विद्यार्थी बालपंचायत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया केवळ प्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्व, समानता, सहभाग आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी एक अत्यंत महत्त्वाची संधी ठरत आहे. या उपक्रमाबाबत बोलताना विद्यालयाचे प्राचार्य विनोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आवाहन केले की, प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान केंद्रावरील सर्व सूचनांचे पालन करून अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही दबाव, प्रभाव किंवा पक्षपाताशिवाय स्वतःच्या विचारांनुसार योग्य उमेदवाराची निवड करावी, कारण प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातूनच सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडू शकते.1
- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.1
- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.1
- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।1
- आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण पादुका असलेल्या पालखीचे शिरूर कासार शहरात प्रशासनाच्या वतीने मोठ्या जल्लोषात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. "भेटी लागे जीव.. लागलीसे आस..पाऊले चालली पंढरीची वाट..!" या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याप्रसंगी तहसीलदार सुरेशजी घोळवे, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी गणेश दहिफळे, पोलीस ठाण्याचे एपीआय राजेश गडवे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.1