महिलांनी शासनाच्या विविध योजनेच्या बळावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण 'हळद तिखटाच्या' उद्योगातून घडविली यशाची 'चव' स्नेहल मंत्री यांची उल्लेखनीय झेप वाशिम, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आत्मविश्वास, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यशाचा मार्ग कसा घडविता येतो, याचे प्रभावी उदाहरण सौ. स्नेहल लक्ष्मीकांत मंत्री यांनी निर्माण केले आहे. गृह उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत त्यांनी महिला उद्योजकतेचा आदर्श उभा केला असून स्वावलंबनासोबत रोजगारनिर्मितीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. वाशिम तालुक्यातील काटा येथील रहिवासी स्नेहल मंत्री यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये बँकेकडून ८ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त करून उद्योग उभारणीस प्रारंभ केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून २.८० लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने उद्योगाला भक्कम आधार मिळाला. या आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने त्यांनी हळद, तिखट आणि विविध मसाल्यांच्या निर्मिती व प्रक्रियेचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मर्यादा, विक्री व्यवस्थेतील अडथळे, बाजारपेठेतील स्पर्धा आणि उत्पादनाला ओळख मिळविण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. मात्र, ध्येयाशी प्रामाणिक राहत त्यांनी प्रत्येक अडचण संधीमध्ये रूपांतरित केली. उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारून उत्पादन प्रक्रियेत आधुनिकता आणली. दर्जेदार उत्पादन, सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत विशेष प्रतिसाद मिळू लागला. कालांतराने त्यांच्या मसाला उत्पादनांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करत व्यवसायाला स्थिरता आणि विस्तार मिळवून दिला. आज त्यांच्या उद्योगातून वार्षिक १२ ते १४ लाख रुपयांची उलाढाल होत असून १० ते १२ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होत इतरांच्या हातालाही काम देण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. त्यामुळे त्यांची वाटचाल केवळ उद्योजकतेपुरती मर्यादित न राहता महिला सक्षमीकरणाच्या व्यापक संकल्पनेला बळ देणारी ठरली आहे. या यशप्रवासात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याची कृतज्ञ भावना स्नेहल मंत्री यांनी व्यक्त केली. शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर, परिश्रमाची जोड आणि आत्मविश्वासाची साथ असेल, तर महिला उद्योग क्षेत्रातही भक्कम यश मिळवू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत स्नेहल मंत्री यांची ही यशोगाथा महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी ठरत आहे.
महिलांनी शासनाच्या विविध योजनेच्या बळावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण 'हळद तिखटाच्या' उद्योगातून घडविली यशाची 'चव' स्नेहल मंत्री यांची उल्लेखनीय झेप वाशिम, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आत्मविश्वास, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यशाचा मार्ग कसा घडविता येतो, याचे प्रभावी उदाहरण सौ. स्नेहल लक्ष्मीकांत मंत्री यांनी निर्माण केले आहे. गृह उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत त्यांनी महिला उद्योजकतेचा आदर्श उभा केला असून स्वावलंबनासोबत रोजगारनिर्मितीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. वाशिम तालुक्यातील काटा येथील रहिवासी स्नेहल मंत्री यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये बँकेकडून ८ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त करून उद्योग उभारणीस प्रारंभ केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून २.८० लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने उद्योगाला भक्कम आधार मिळाला. या आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने त्यांनी हळद, तिखट आणि विविध मसाल्यांच्या निर्मिती व प्रक्रियेचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मर्यादा, विक्री व्यवस्थेतील अडथळे, बाजारपेठेतील स्पर्धा आणि उत्पादनाला ओळख मिळविण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. मात्र, ध्येयाशी प्रामाणिक राहत त्यांनी प्रत्येक अडचण संधीमध्ये रूपांतरित केली. उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारून उत्पादन प्रक्रियेत आधुनिकता आणली. दर्जेदार उत्पादन, सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत विशेष प्रतिसाद मिळू लागला. कालांतराने त्यांच्या मसाला उत्पादनांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करत व्यवसायाला स्थिरता आणि विस्तार मिळवून दिला. आज त्यांच्या उद्योगातून वार्षिक १२ ते १४ लाख रुपयांची उलाढाल होत असून १० ते १२ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होत इतरांच्या हातालाही काम देण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. त्यामुळे त्यांची वाटचाल केवळ उद्योजकतेपुरती मर्यादित न राहता महिला सक्षमीकरणाच्या व्यापक संकल्पनेला बळ देणारी ठरली आहे. या यशप्रवासात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याची कृतज्ञ भावना स्नेहल मंत्री यांनी व्यक्त केली. शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर, परिश्रमाची जोड आणि आत्मविश्वासाची साथ असेल, तर महिला उद्योग क्षेत्रातही भक्कम यश मिळवू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत स्नेहल मंत्री यांची ही यशोगाथा महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी ठरत आहे.
- *किसान का दर्द किसान ही महसूस कर सकता है। भगवान से रहम की लगाई गुहार* कड़ी धूप और हाड़ कंपाने वाली ठंड में खून-पसीना एक करने वाले किसान की मेहनत पर कुदरत ने पानी फेरना शुरू कर दिया है। बेमौसम बारिश ने खेतों में पकी फसलें खराब होने की कगार पर है। उपार्जन केंद्रों में अव्यवस्था के साथ मौसम ने बढ़ाई किसानों की चिंता, हजारों किसानों का गेहूं और अन्य फसल खरीदी के चक्कर में खेत खलिहानों में खुले में रखा है। सर्वर डाउन होने से किसान स्लॉट तक बुक नहीं कर पा रहे। जिससे किसान गहरे मानसिक तनाव में है।1
- Post by Raghunath Aghao1
- शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख3
- घनसावंगी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती केंद्र गुंज बु. येथे इयत्ता पहिली वर्गाचा शाळा प्रवेशोत्सव मेळावा दि. 29 एप्रिल 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रवेशपात्र मुलांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पाऊलांचे ठसे घेऊन जतन करण्यात आले आहेत. या पूर्वतयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीसाठी 20 मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे. हा कार्यक्रम मुख्याध्यापक तौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी ताई, शा. व्य. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, माता पालक व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. दि. 1 मे 2026 रोजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मुलांच्या कलागुणांचा अविष्कार सोहळा पार पडणार आहे. तरी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..1
- सर्व शक्तीपीठग्रस्त शेतकरी बांधवांना विनंती आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना 1 मे रोजी त्यांना शक्तीपीठ रद्द करा या मागणीचे निवेदन द्यायचे आहे. त्याप्रमाणे नियोजन करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हिंगोली शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 वाजता अगदी वेळेवर उपस्थित राहावे.1
- • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.1
- Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम1
- *ट्रक पलटने से भदनपुर घाटी में लगा लंबा जाम* मैहर में भदनपुर घाटी में भूसा से भरा ट्रक पलटा , SH 11 में लगा लंबा जाम, दोनों तरफ से वाहनों का आवागमन हुआ प्रभावित , बदेरा थाना क्षेत्र का मामला1