आधुनिक घनपद्धतीने केशर आंबा लागवडीला चालना ! १० एकरांवर आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक आधुनिक घनपद्धतीने केशर आंबा लागवडीला चालना राहेरा शिवारात १० एकरांवर आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक; क्लस्टर निर्मितीतून निर्यातीची संधी घनसावंगी प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील राहेरा शिवारातील जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष व प्रगतशील शेतकरी महेंद्र पवार यांच्या शेतात आधुनिक पद्धतीने केशर आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. गटशेती प्रणेते तथा आंबा लागवड तज्ज्ञ भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १० एकर क्षेत्रावर घनपद्धतीने केशर आंब्याची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. या कार्यशाळेत पारंपरिक पिकांसोबत आधुनिक व व्यावसायिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. केशर आंब्याची १० x ५ फूट अंतरावर घनपद्धतीने लागवड केल्यास मर्यादित क्षेत्रात अधिक झाडांची लागवड करून उत्पादन वाढविण्याची संधी उपलब्ध होते, अशी माहिती भगवानराव कापसे यांनी दिली. आंबा लागवडीचे क्लस्टर विकसित करण्यावर भर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबा लागवड केल्यास आंबा लागवड क्लस्टर विकसित होऊ शकतो. सामूहिक उत्पादन, दर्जेदार माल आणि बाजारपेठेचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देणे शक्य आहे. भविष्यात दर्जेदार केशर आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून त्याला देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यातीची संधी निर्माण होऊ शकते, असे कापसे यांनी सांगितले. युवक आणि तरुण शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड हा रोजगारनिर्मितीबरोबरच दीर्घकालीन आर्थिक उत्पन्नाचा प्रभावी पर्याय ठरू शकतो. यापूर्वी विविध भागांतील शेतकऱ्यांना आंबा लागवडीबाबत केलेल्या मार्गदर्शनातून झालेल्या आर्थिक फायद्याची उदाहरणेही कापसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडली. स्वतः १० एकरांवर लागवड करून दिला आदर्श कार्यशाळेचे आयोजक महेंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतामध्ये १० एकर क्षेत्रावर आंबा लागवड करून परिसरातील युवक व तरुण शेतकऱ्यांनीही या पिकाकडे वळावे, असे आवाहन केले. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतीतून अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळवावे, यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सव्वाशे यांनी आंबा लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक व व्यावसायिक शेतीचा स्वीकार करून आंबा लागवडीकडे वळावे, असे त्यांनी सांगितले. युवक शेतकऱ्यांमध्ये उत्साह कार्यशाळेस परिसरातील प्रगतशील शेतकरी, युवक आणि तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान, घनपद्धतीची लागवड, क्लस्टर निर्मिती, शासकीय अनुदान आणि निर्यातीच्या संधी याबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आंबा लागवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली. “पारंपरिक शेतीसोबत आधुनिक फळबाग लागवडीचा स्वीकार करा; घनपद्धतीच्या केशर आंब्यातून अधिक उत्पादन, अधिक उत्पन्न आणि भविष्यात निर्यातीची नवी संधी साधा,” असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
आधुनिक घनपद्धतीने केशर आंबा लागवडीला चालना ! १० एकरांवर आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक आधुनिक घनपद्धतीने केशर आंबा लागवडीला चालना राहेरा शिवारात १० एकरांवर आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक; क्लस्टर निर्मितीतून निर्यातीची संधी घनसावंगी प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील राहेरा शिवारातील जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष व प्रगतशील शेतकरी महेंद्र पवार यांच्या शेतात आधुनिक पद्धतीने केशर आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. गटशेती प्रणेते तथा आंबा लागवड तज्ज्ञ भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १० एकर क्षेत्रावर घनपद्धतीने केशर आंब्याची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. या कार्यशाळेत पारंपरिक पिकांसोबत आधुनिक व व्यावसायिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. केशर आंब्याची १० x ५ फूट अंतरावर घनपद्धतीने लागवड केल्यास मर्यादित क्षेत्रात अधिक झाडांची लागवड करून उत्पादन वाढविण्याची संधी उपलब्ध होते, अशी माहिती भगवानराव कापसे यांनी दिली. आंबा लागवडीचे क्लस्टर विकसित करण्यावर भर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबा लागवड केल्यास आंबा लागवड क्लस्टर विकसित होऊ शकतो. सामूहिक उत्पादन, दर्जेदार माल आणि बाजारपेठेचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देणे शक्य आहे. भविष्यात दर्जेदार केशर आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून त्याला देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यातीची संधी निर्माण होऊ शकते, असे कापसे यांनी सांगितले. युवक आणि तरुण शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड हा रोजगारनिर्मितीबरोबरच दीर्घकालीन आर्थिक उत्पन्नाचा प्रभावी पर्याय ठरू शकतो. यापूर्वी विविध भागांतील शेतकऱ्यांना आंबा लागवडीबाबत केलेल्या मार्गदर्शनातून झालेल्या आर्थिक फायद्याची उदाहरणेही कापसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडली. स्वतः १० एकरांवर लागवड करून दिला आदर्श कार्यशाळेचे आयोजक महेंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतामध्ये १० एकर क्षेत्रावर आंबा लागवड करून परिसरातील युवक व तरुण शेतकऱ्यांनीही या पिकाकडे वळावे, असे आवाहन केले. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतीतून अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळवावे, यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सव्वाशे यांनी आंबा लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक व व्यावसायिक शेतीचा स्वीकार करून आंबा लागवडीकडे वळावे, असे त्यांनी सांगितले. युवक शेतकऱ्यांमध्ये उत्साह कार्यशाळेस परिसरातील प्रगतशील शेतकरी, युवक आणि तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान, घनपद्धतीची लागवड, क्लस्टर निर्मिती, शासकीय अनुदान आणि निर्यातीच्या संधी याबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आंबा लागवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली. “पारंपरिक शेतीसोबत आधुनिक फळबाग लागवडीचा स्वीकार करा; घनपद्धतीच्या केशर आंब्यातून अधिक उत्पादन, अधिक उत्पन्न आणि भविष्यात निर्यातीची नवी संधी साधा,” असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!* शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है। सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।" *क्या बोले स्थानीय लोग?* इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया। *प्रशासन की नींद कब खुलेगी?* युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। *सामूहिक प्रयास ही असली समाधान* प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी बीड : एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करत संबंधित प्रकरणातील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार हे समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, सत्य परिस्थिती उजेडात आणताना पत्रकारांवर दबाव अथवा पोलिस कारवाई होणे ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणारी असल्याचे निदर्शकांनी म्हटले. यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पत्रकार मंदार गोंजरी यांच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी केली. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. पत्रकारांवरील कारवाईचा निषेध करत निदर्शकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1
- Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!1
- 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ; महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.1