भिमा कृषी व पशु प्रदर्शनात सांस्कृतिक उत्सवाचा जल्लोष..! कोल्हापूर / प्रतिनिधी भिमा कृषी व पशु प्रदर्शनाच्या निमित्ताने शहरात संस्कृती,कला आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. सागर बगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याने प्रदर्शनाला वेगळीच उंची मिळवून दिली.या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच कोल्हापूर महानगरपालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध सादरीकरण आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पालक आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे सादर झालेल्या आणि प्रथम क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातील कलाकारांची उपस्थिती. दिल्ली गाजवणाऱ्या या नामवंत कलाकारांनी आपल्या बहारदार नृत्याने आणि प्रभावी सादरीकरणाने प्रदर्शनाची शोभा अधिकच वाढवली. कोल्हापूरकरांना ही कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचा गौरव केला.संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता. कृषी आणि पशुपालन प्रदर्शनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड मिळाल्याने हा उपक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. शालेय विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि व्यावसायिक कलाकारांचे कौशल्य यांचा संगम साधत हा सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.भिमा कृषी व पशु प्रदर्शनाने यंदा केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संस्कृतीचा महोत्सव साजरा करत कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला.
भिमा कृषी व पशु प्रदर्शनात सांस्कृतिक उत्सवाचा जल्लोष..! कोल्हापूर / प्रतिनिधी भिमा कृषी व पशु प्रदर्शनाच्या निमित्ताने शहरात संस्कृती,कला आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. सागर बगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याने प्रदर्शनाला वेगळीच उंची मिळवून दिली.या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच कोल्हापूर महानगरपालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध सादरीकरण आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पालक आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे सादर झालेल्या आणि प्रथम क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातील कलाकारांची उपस्थिती. दिल्ली गाजवणाऱ्या या नामवंत कलाकारांनी आपल्या बहारदार नृत्याने आणि प्रभावी सादरीकरणाने प्रदर्शनाची शोभा अधिकच वाढवली. कोल्हापूरकरांना ही कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचा गौरव केला.संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता. कृषी आणि पशुपालन प्रदर्शनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड मिळाल्याने हा उपक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. शालेय विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि व्यावसायिक कलाकारांचे कौशल्य यांचा संगम साधत हा सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.भिमा कृषी व पशु प्रदर्शनाने यंदा केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संस्कृतीचा महोत्सव साजरा करत कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला.
- महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत व उपाध्यक्षपदी चांदभैय शेख यांची निवड झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सांगोला येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता.1
- *सातारा नगर परिषदेचे स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती श्री.धनंजय बाजीराव जांभळे यांना विनंतीपूर्वक अर्ज करत आहे या विषयी लवकरात लवकर मार्गी लावावा सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन* सातारा शहरात अनेक परिसरामध्ये व गल्लीबोळांमध्ये पाळीव गाय व म्हैस फिरत असतात रस्त्यावर कधी बसतात तर कधी रस्त्यावर उभे राहतात कधी गल्लीबोळ्यामध्ये जाऊन घराघराच्या दरवाज्यात उभे राहून घरातील नागरिकांकडून चपाती भाकरी अशा प्रकारचे पदार्थ घेऊन खातात आणि कोणताही पदार्थ घेतल्याशिवाय तिकडून हलतही नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना खूप त्रास होत आहेत हे पाळीव गाय म्हैस हे ज्यांच्या मालकीचे आहेत ते सकाळी या गाय म्हैस यांचे अतिप्रमाणात दूध धारा मार्फत काढतात. आणि त्या जनावरांना मोकाट सोडतात त्यामुळे परिसरात दिवसभर त्यांचा शहरातील नागरिकांना त्रास होतो तसेच संध्याकाळ झाली की या गाय आणि म्हैस आपल्या मालकाकडे परत जातात आणि संध्याकाळी परत दूध धारा मार्फत काढले जाते. अशाप्रकारे या फिरत असणारे पाळीव गाय आणि म्हैस यांचा नागरिकांना खूपच त्रास होत आहे तसेच जागोजागी अति प्रमाणात गाय आणि म्हैस यांचे मूत्र व शेण पसरलेले असते त्यामुळे परिसर ही घाण होत असतो अशातच पाऊसही भरपूर पडतो त्यामुळे हे सर्व घाण प्रत्येकाच्या चपलांना लागून आपापल्या घरात जात असते. पाळीव गाय म्हैस यांचे जे मालक आहेत ते यांचं सकाळ संध्याकाळ दूध काढतात आणि दिवसभर भटकायला बाहेर सोडतात तसेच त्या गाय म्हैस बरोबर त्यांचा मालक नसतोच मुळीच, त्यामुळे कुठे शाळेची मुलं व महिला वृद्ध व्यक्ती व नागरिक रस्त्यावर जात असतात किंवा गाड्या जात असतात त्यांना अडचणी निर्माण होत आहेत आणि हे सरासर चुकीच्या पद्धतीने चालू आहे. सातारा नगरपरिषदेने याविषयी लवकरात लवकर कारवाई करावी ज्या गाय आणि म्हैस आहेत त्यांच्या मालकांना भेटून या सर्व गोष्टींची पूर्व सूचना द्यावी. भटक्या कायम आहेस असत्या तर शासनाला ताब्यात दिले असत्या पण पाळीव असल्यामुळे त्यांच्या मालकांना त्याची पूर्व सूचना द्यावी लागणार आहे त्यांचे मालक कोण आहेत तेही माहीत नसतं लवकरात लवकर सातारा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांनी यावर काही उपाययोजना कराव्या जेणेकरून नागरिकांमध्ये त्रास होणार नाही अन्यथा नागरिकांनाच हा विषय हातात घेऊन काही कारवाई करावी लागणार आहे. कृपया करून सातारा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.1
- वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- विक्रम शिंदे /भोर दि.16 कापुरहोळ भोर वाई हा बहुचर्चित रस्ता अंतिम टप्प्यात आहे.मात्र आधी केलेल्या रस्ता खचण्याच्या घटना वारंवार घडत असून माळवाडी ते नेकलेस पॉईंट दरम्यान मोरी वरील रस्ता खचल्याने पोकलेनच्या सहायाने रस्ता उखडून आज (दि.16) दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.मात्र या बाबत रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.रस्त्याच्या गुणवतेबाबत शंका व्यक्त केली आहे.1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1