नॅशनल हायस्कूलमध्ये १० व्या उन्हाळी अनिवासी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन उदघाटन सोहळा २२ एप्रिलला; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णसंधी खामगाव : तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी श्री. अ. खि. नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे दहाव्या 'उन्हाळी अनिवासी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत शाळेच्या मैदानावर पार पडणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी या शिबिरात विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रनिंग, क्रिकेट, स्केटिंग, लॉन टेनिस,शिवकालीन युद्धकला (लाठी-काठी), लेझीम, पोल व रोप मल्लखांब, योगासने, झुंबा, शारीरिक कवायत, कराटे, जिम्नॅस्टिक,बौद्धिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असेल.हे शिबिर दररोज सकाळी ६.०० ते ११.०० या वेळेत संपन्न होईल. सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या प्रशिक्षकांचे थेट मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरादरम्यान दररोज सकस अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच प्रत्येक क्रीडा प्रकारातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना प्रथम व द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात येईल.संपूर्ण शिबिरातील 'सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी' (मुलगा व मुलगी) निवडून त्यांना विशेष बक्षीस दिले जाईल. या शिबिराचा दिमाखदार उदघाटन सोहळा बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ५.३० वाजता नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात पार पडणार आहे. "विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही एक उत्तम संधी असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा सहभाग नोंदवावा," असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. अ. खि. नॅशनल हायस्कूलच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
नॅशनल हायस्कूलमध्ये १० व्या उन्हाळी अनिवासी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन उदघाटन सोहळा २२ एप्रिलला; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णसंधी खामगाव : तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी श्री. अ. खि. नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे दहाव्या 'उन्हाळी अनिवासी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत शाळेच्या मैदानावर पार पडणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी या शिबिरात विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रनिंग, क्रिकेट, स्केटिंग, लॉन टेनिस,शिवकालीन युद्धकला (लाठी-काठी), लेझीम, पोल व रोप मल्लखांब, योगासने, झुंबा, शारीरिक कवायत, कराटे, जिम्नॅस्टिक,बौद्धिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असेल.हे शिबिर दररोज सकाळी ६.०० ते ११.०० या वेळेत संपन्न होईल. सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या प्रशिक्षकांचे थेट मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरादरम्यान दररोज सकस अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच प्रत्येक क्रीडा प्रकारातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना प्रथम व द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात येईल.संपूर्ण शिबिरातील 'सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी' (मुलगा व मुलगी) निवडून त्यांना विशेष बक्षीस दिले जाईल. या शिबिराचा दिमाखदार उदघाटन सोहळा बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ५.३० वाजता नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात पार पडणार आहे. "विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही एक उत्तम संधी असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा सहभाग नोंदवावा," असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. अ. खि. नॅशनल हायस्कूलच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
- खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए. सरकारने महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मांडले.मात्र, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरणाऱ्या या विधेयकास काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने विरोध दर्शवल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधी मानसिकतेचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. भारतामध्ये महिलांना आदराचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण विधेयक आणले. या विधेयकामुळे महिलांना संसदेत आणि विधानसभांमध्ये आरक्षणाची दारे उघडणार आहेत. असे असतानाही, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी याला विरोध करून आपली महिलाविरोधी भूमिका स्पष्ट केली असल्याची टीका यावेळी करण्यात आली. सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना निषेध व्यक्त करताना पदाधिकारी म्हणाले की,"महिलांचे सक्षमीकरण हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. मात्र,राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस आणि इंडिया यूआघाडीने या प्रक्रियेत अडथळा आणला आहे. त्यांची ही मानसिकता महिला शक्तीचा अपमान करणारी आहे. या नेत्यांना भविष्यात योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी ईश्वर देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो, यावेळी काँग्रेस व मित्रपक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला.1
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!1
- बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- Post by Ahem Raza1
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1