पर्यावरण जपणुकीचा आदर्श निर्णय : धनावडे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम. कुसुंबी.दि.२.करंजे गावचे पितामह पांडूरंग धनावडे (गुरुजी) यांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मी पांडूरंग धनावडे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे करंजे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमळ, साधी आणि धार्मिक वृत्ती असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व गावातील सर्वांना आपलेसे वाटणारे होते. रविवारी वेण्णा नदी तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पारंपरिक हिंदू संस्कृतीनुसार अंत्यविधीनंतर अस्थिविसर्जन करताना अस्थी व राख नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. मात्र धनावडे परिवाराने पर्यावरण जपण्याचा अभिनव आणि विचारपूर्वक निर्णय घेतला. नदीमध्ये अस्थी व राख विसर्जित केल्यास पाणी प्रदूषण होऊ शकते, या जाणिवेतून त्यांनी वेगळा मार्ग अवलंबला. नदीमध्ये विसर्जन न करता वेण्णा नदीच्या तीरावर खोल खड्डा खोदून त्या खड्ड्यात अस्थी व राख विधीपूर्वक पुरण्यात आल्या. हा निर्णय परंपरेचा आदर राखत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. आजच्या काळात नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, याची जाणीव या कृतीतून समाजाला करून देण्यात आली. धनावडे परिवाराच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले. धार्मिक संस्कार आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा निर्णय समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
पर्यावरण जपणुकीचा आदर्श निर्णय : धनावडे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम. कुसुंबी.दि.२.करंजे गावचे पितामह पांडूरंग धनावडे (गुरुजी) यांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मी पांडूरंग धनावडे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे करंजे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमळ, साधी आणि धार्मिक वृत्ती असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व गावातील सर्वांना आपलेसे वाटणारे होते. रविवारी वेण्णा नदी तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पारंपरिक हिंदू संस्कृतीनुसार अंत्यविधीनंतर अस्थिविसर्जन करताना अस्थी व राख नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. मात्र धनावडे परिवाराने पर्यावरण जपण्याचा अभिनव आणि विचारपूर्वक निर्णय घेतला. नदीमध्ये अस्थी व राख विसर्जित केल्यास पाणी प्रदूषण होऊ शकते, या जाणिवेतून त्यांनी वेगळा मार्ग अवलंबला. नदीमध्ये विसर्जन न करता वेण्णा नदीच्या तीरावर खोल खड्डा खोदून त्या खड्ड्यात अस्थी व राख विधीपूर्वक पुरण्यात आल्या. हा निर्णय परंपरेचा आदर राखत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. आजच्या काळात नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, याची जाणीव या कृतीतून समाजाला करून देण्यात आली. धनावडे परिवाराच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले. धार्मिक संस्कार आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा निर्णय समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
- जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.1
- विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.1
- Post by Kishor subhash jadhav1
- पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues1
- मुंजोबा वस्ती येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Kishor subhash jadhav1