जी रामजी योजनेअंतर्गत नवीन विकास कामे सुरू करून रखडलेली कुशलची बिले तात्काळ द्या,सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले सेनगाव तालुक्यातील जी रामजी योजनेअंतर्गत नवीन विकास कामे चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी जी रामजी योजनेअंतर्गत फळबाग लागवड माहिती व विहिरीसाठी ऑनलाईन प्रक्रिया केली असुन अद्यापही शेतकऱ्यांना मंजूरी मिळाली नाही, तसेच कामे चालू झाली नसल्याने विकास कामे लवकरात लवकर चालू करून त्यांचे मस्टर चालू करण्यात यावे तसेच अनेक दिवसापासून लाभार्थ्यांचे कुशनचे बिल रखडले असुन ती बिले तात्काळ देण्यात यावी ही मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पैसे व्याजाने काढून जी रामजी योजनेअंतर्गत पूर्वीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे पूर्ण केली असताना सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. सेनगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट असून त्यामुळे रखडलेली बिले तात्काळ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. तसेच लवकरात लवकर रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी व तसेच शेतकऱ्यांचे रखडलेली कुशलचे बिल त्याच्या खात्यावर तात्काळ पडावीत ही मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रयत संकल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष परमेश्वर इंगोले यांनी केली आहे.
जी रामजी योजनेअंतर्गत नवीन विकास कामे सुरू करून रखडलेली कुशलची बिले तात्काळ द्या,सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले सेनगाव तालुक्यातील जी रामजी योजनेअंतर्गत नवीन विकास कामे चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी जी रामजी योजनेअंतर्गत फळबाग लागवड माहिती व विहिरीसाठी ऑनलाईन प्रक्रिया केली असुन अद्यापही शेतकऱ्यांना मंजूरी मिळाली नाही, तसेच कामे चालू झाली नसल्याने विकास कामे लवकरात लवकर चालू करून त्यांचे मस्टर चालू करण्यात यावे तसेच अनेक दिवसापासून लाभार्थ्यांचे कुशनचे बिल रखडले असुन ती बिले तात्काळ देण्यात यावी ही मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पैसे व्याजाने काढून जी रामजी योजनेअंतर्गत पूर्वीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे पूर्ण केली असताना सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. सेनगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट असून त्यामुळे रखडलेली बिले तात्काळ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. तसेच लवकरात लवकर रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी व तसेच शेतकऱ्यांचे रखडलेली कुशलचे बिल त्याच्या खात्यावर तात्काळ पडावीत ही मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रयत संकल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष परमेश्वर इंगोले यांनी केली आहे.
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1