नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिव्यांगाच्या संदर्भात बारा बैठका एक सुनावणी चे आदेश, निर्देशाला कनिष्ठ अधिकारी केराची टोपली दाखविणाऱ्या वर दप्तर दिरगांई कायदा, दिव्यांग कायद्याप्रमाणे का कार्यवाही झाली नाही त्यांचे पंधरा दिवसात लेखि ऊतर द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी साठी जिल्हाधिकारी दालनात धरने आंदोलनाचा ईशारा चंपतराव डाकोरे पाटील प्रतिनिधी. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाला न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी निवासी जिल्हाधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नांदेड यांची भेट घेऊन मा. जिल्हाधिकारी नांदेड मा. राऊत सरानी आठ बैठका, एक सुनावणी व आपण चार बैठका घेऊन आदेश, निर्देश,व इतिवृतातील एकाही प्रश्नाचे साधे ऊतर मिळत नसेल,आपले आदेश, निर्देश न पाळणाऱ्या कनिष्ठ अधिकारी यांना दप्तर दिरगांई कायदा, दिव्यांग कायदा लागू आहे काय? लागु असेल तर आपण काय कार्यवाही केली त्याची त्वरीत माहिती द्यावी. १) दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी घेतलेल्या बैठकीतील इतिवृतातील किती प्रश्न सुटलात? किती प्रश्न का सुटले? किती सुटले नाहीत यांची लेखि माहिती पंधरा दिवसात द्या नसेल तर आपल्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत धरने आंदोलन करण्याचे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळाने ईशारा जाने, फेब्रुवारी महिन्यात देऊन त्यांचे आठ महिन्यात साधे ऊतर मिळत नाही. नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी संबधित अधिकारी ऑफिस मध्ये भेटत नाहि. फोन केला तर उचलत नाहित, दिव्यांग बांधव उठत बसत चेकरा मारून वैतागून एक दिव्यांग लोहा तहसिल कार्यालयात दिव्यांगास आत्महत्या करण्याची वेळ आली. संघटनेच्या निवेदन स्व ईच्छा मरण्याची परवानगीचे निवेदन प्रत्यक्ष भेटुन त्या निवेदनाची साधे ऊतर मिळत नाही. यांचा अर्थ दिव्यांग आत्महत्या करावे अशी मुक संमती अधिकाऱ्याची आहे काय? वर्ष न वर्ष ते प्रश्न इतिवृतातील का सुटत नाही. आपल्याकडून सुटत नसेल तर त्यांचे लेखि ऊतर का मिळत नाहि. त्याबद्दल आपल्या कार्यालयाकडून दोषी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही का होत नाही? मे. कर्तव्य दक्ष अधिकारी साहेब आपल्या समवेत संबधित अधिकारी, दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधी सोबत बारा बैठका एक सुनावणी तील इतिवृतातील किती प्रश्न सुटलेत व किती सुटलेच नाहि संबधित अधिकारी ऊतर दिले का नाहित ?यांची चौकशी त्वरित करून दोषावर योग्य ती कार्यवाही करा दिव्यांग हक्क द्या? नसेल तर स्व ईच्छा परवानगी साठी आपल्या दालनात पंधरा दिवसानंतर कोणतीही पुर्व सुचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिला यावेळी आदित्य पाटिल, राजाभाऊ शेरकुरवार, मनोहरराव येरपुरवार, सुधाकर पिलगुंडे इत्यादी कार्यकर्त्यानी दिला.
नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिव्यांगाच्या संदर्भात बारा बैठका एक सुनावणी चे आदेश, निर्देशाला कनिष्ठ अधिकारी केराची टोपली दाखविणाऱ्या वर दप्तर दिरगांई कायदा, दिव्यांग कायद्याप्रमाणे का कार्यवाही झाली नाही त्यांचे पंधरा दिवसात लेखि ऊतर द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी साठी जिल्हाधिकारी दालनात धरने आंदोलनाचा ईशारा चंपतराव डाकोरे पाटील प्रतिनिधी. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाला न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी निवासी जिल्हाधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नांदेड यांची भेट घेऊन मा. जिल्हाधिकारी नांदेड मा. राऊत सरानी आठ बैठका, एक सुनावणी व आपण चार बैठका घेऊन आदेश, निर्देश,व इतिवृतातील एकाही प्रश्नाचे साधे ऊतर मिळत नसेल,आपले आदेश, निर्देश न पाळणाऱ्या कनिष्ठ अधिकारी यांना दप्तर दिरगांई कायदा, दिव्यांग कायदा लागू आहे काय? लागु असेल तर आपण काय कार्यवाही केली त्याची त्वरीत माहिती द्यावी. १) दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी घेतलेल्या बैठकीतील इतिवृतातील किती प्रश्न सुटलात? किती प्रश्न का सुटले? किती सुटले नाहीत यांची लेखि माहिती पंधरा दिवसात द्या नसेल तर आपल्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत धरने आंदोलन करण्याचे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळाने ईशारा जाने, फेब्रुवारी महिन्यात देऊन त्यांचे आठ महिन्यात साधे ऊतर मिळत नाही. नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी संबधित अधिकारी ऑफिस मध्ये भेटत नाहि. फोन केला तर उचलत नाहित, दिव्यांग बांधव उठत बसत चेकरा मारून वैतागून एक दिव्यांग लोहा तहसिल कार्यालयात दिव्यांगास आत्महत्या करण्याची वेळ आली. संघटनेच्या निवेदन स्व ईच्छा मरण्याची परवानगीचे निवेदन प्रत्यक्ष भेटुन त्या निवेदनाची साधे ऊतर मिळत नाही. यांचा अर्थ दिव्यांग आत्महत्या करावे अशी मुक संमती अधिकाऱ्याची आहे काय? वर्ष न वर्ष ते प्रश्न इतिवृतातील का सुटत नाही. आपल्याकडून सुटत नसेल तर त्यांचे लेखि ऊतर का मिळत नाहि. त्याबद्दल आपल्या कार्यालयाकडून दोषी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही का होत नाही? मे. कर्तव्य दक्ष अधिकारी साहेब आपल्या समवेत संबधित अधिकारी, दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधी सोबत बारा बैठका एक सुनावणी तील इतिवृतातील किती प्रश्न सुटलेत व किती सुटलेच नाहि संबधित अधिकारी ऊतर दिले का नाहित ?यांची चौकशी त्वरित करून दोषावर योग्य ती कार्यवाही करा दिव्यांग हक्क द्या? नसेल तर स्व ईच्छा परवानगी साठी आपल्या दालनात पंधरा दिवसानंतर कोणतीही पुर्व सुचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिला यावेळी आदित्य पाटिल, राजाभाऊ शेरकुरवार, मनोहरराव येरपुरवार, सुधाकर पिलगुंडे इत्यादी कार्यकर्त्यानी दिला.
- अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड4
- श्री क्षेत्र माहुर गडावर परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल भक्तांचा महासागर लोटला होता तसेच प्रशासनाचे नियोजन अपुरे पडल्याचे चित्र पहावयास मिळाले1
- *आईसोबत भांडण.. अन् थेट टॉवरवर! तासभराच्या थरारानंतर तरुणाची सुखरूप सुटका* *हरसूल-सावंगी परिसरात खळबळ; पोलिस व अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली* *छत्रपती संभाजीनगर :* आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका तरुणाने थेट उंच टॉवर गाठल्याने हरसूल-सावंगी परिसरात सोमवारी मोठी खळबळ उडाली. तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. करण शिवाजी माळी असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, करण माळी याचे आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या वादानंतर तो संतप्त झाला आणि रागाच्या भरात थेट परिसरातील टॉवरवर चढला. तो नशेच्या अवस्थेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. टॉवरवर तरुण चढल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच दोन्ही विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उंच टॉवरवर असलेल्या तरुणाला सुरक्षितपणे खाली आणणे हे पथकांसमोर मोठे आव्हान होते. कोणतीही घाई न करता जवानांनी आणि पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. सुमारे एक तास सुरू असलेल्या या प्रयत्नांनंतर अखेर करण माळी याला टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निःश्वास सोडला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुन्हा हरसूल-सावंगी येथे तरुणाच्या टॉवरवर चढण्याच्या घटनेने शहरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे यावेळीही संभाव्य मोठी दुर्घटना टळली.1
- मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान1
- 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes1
- *देगलूर येथील आधार केंद्र चालू करण्याच्या मागणीसाठी*शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बोंब मारो आंदोलन संपन्न* देगलूर येथील पोस्ट ऑफीस मधील आधार कार्ड नोंदणी केंद्र गेल्या 4 महीन्या पासून बंद असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. सदरील केंद्र त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील पोस्ट ऑफिस समोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोंबा बोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आधार केंद्र मागील 4 महीन्या पासून बंद असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस अधिकारी यांना घेराव घालून व नांदेडच्या मुख्य अधिक्षक पाठक, व उपमुख्य अधिक्षक कुलकर्णी यांना निवेदन देऊन आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अन्यथा पोस्ट ऑफीस समोर निदर्शने धरणे बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते, तरीपण अद्याप पर्यंत आधार केंद्र चालू न झाल्याने दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पोस्ट ऑफीस समोर निदर्शने व बोंबा बोंब बोंबमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या. शैक्षणिक व इतर शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याने आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, लहान बालके, सकाळी पाच वाजतापासून सर्व कामधंदे सोडून भुकताण विसरून रांगेमध्ये उभे रहावे लागत होते, त्यामुळे 4 महिन्यांपासून बंद असलेले एकमेव आधार कार्ड नोंदणी केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस समोर तीव्र बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर, मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर, मष्णाजी पैलावार, विनोद सोनकांबळे, अशोक कांबळे, मानाजी लोणे पाटील लोणीकर, गंगाधर पाटील चाकूरकर, राजु उल्लेवार,हाणमंत राजुरे लख्खेकर, संजय पाटील मंगरुळे लख्खेकर,अशोक मारवाडे कावळगड्डेकर, शिवाजी पाटील, दत्ता राजुरे.शिवाजी चव्हाण, शंकरराव जाधव, अर्जुन लूटे, राजु जाधव आदींसह इतर पदाधिकारी व स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशिक्षण पोलिस निरीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यावेळी पोस्ट ऑफीसर पवार यांनी लवकरच आधार केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिले.2
- शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर1
- नांदेड महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार..... उपमहापौर दीपक सिंह रावत, प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक तुलजेश यादव, बजरंग ठाकूर नगरसेवक प्रतिनिधी यांनी केले स्टिंग ऑपरेशन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी पहा पूर्ण प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे1