*डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श* *अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. वंदना दुधमल यांच्या अभिनव पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड, दि. २९ एप्रिल :- वैद्यकीय शिक्षणात अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदर्शी शैक्षणिक नेतृत्वाखाली शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “भविष्यातील सक्षम व कौशल्यसंपन्न डॉक्टर घडविण्यासाठी अनुभवाधारित आणि विश्लेषणात्मक शिक्षणपद्धती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना दुधमल(कंधारे)यांच्या अभिनव संकल्पना, शैक्षणिक नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम संस्थेच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांपैकी एक ठरला असून, वैद्यकीय शिक्षणात “Learning by Doing” संकल्पनेचे प्रभावी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. प्रथम वर्ष एमबीबीएसच्या २० गटांतील १५१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत मानवी शरीरक्रियेतील गुंतागुंतीच्या संकल्पना वैज्ञानिक, त्रिमितीय आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सद्वारे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन या स्पर्धेत घडले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण व आधुनिक वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना पारंपरिक अध्यापनाबरोबरच अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या दृष्टीकोनातूनच ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याचे मानले जाते. प्रास्ताविकात डॉ. वंदना दुधमल (कंधारे) यांनी शरीरक्रियाशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, आकर्षक आणि समजण्यासारखा करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. *स्पर्धेतील मानकरी विजेते* प्रथम क्रमांक : गट क्र. ०५ (सर विल्यम मॅडॉक बेलीस) कृत्रिम मूत्रपिंड आणि डायलिसिस , द्वितीय क्रमांक : गट क्र. १५ (लुईस अँटोइन रनवीर) प्रकाश प्रतिक्षेप, तृतीय क्रमांक गट क्र. ०७ जॉन स्कॉट हलदणे- प्रतिप्रवाह यंत्रणा स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. समीर व डॉ. बोडके यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड, डॉ. इस्माईल इनामदार,डॉ. हुमेरा, डॉ. भावना,डॉ. कदम, डॉ. देशमुख जे बी, डॉ. डाके, डॉ. माने, सतिश इंगळे ,मेट्रोन मुदिराज तसेच विविध विभागांतील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शरीरक्रियाशास्त्र विभागातील प्राध्यापक, डॉ मसरत फिरदोस, डॉ. सीमा टाकरस, डॉ. नौशिन, निवासी डॉक्टर डॉ भागवत, डॉ अनुब्रता, डॉ अक्षय, डॉ अनिरुद्ध, डॉ. अली, डॉ. दीपक, डॉ सीमा, डॉ. सावंत,डॉ.यशस, डॉ इनशा लीपिक इंगोले,प्रयोगशाळा तंत्रज्ञ केंद्रे ,फोटोग्राफर रवी हिवाळे, इलेक्ट्रिशन चव्हाण तसेच श्रीमती पाटील व इतर कर्मचारी विजू मावशी, फुलकली मावशी आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श* *अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. वंदना दुधमल यांच्या अभिनव पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड, दि. २९ एप्रिल :- वैद्यकीय शिक्षणात अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदर्शी शैक्षणिक नेतृत्वाखाली शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “भविष्यातील सक्षम व कौशल्यसंपन्न डॉक्टर घडविण्यासाठी अनुभवाधारित आणि विश्लेषणात्मक शिक्षणपद्धती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना दुधमल(कंधारे)यांच्या अभिनव संकल्पना, शैक्षणिक नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम संस्थेच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांपैकी एक ठरला असून, वैद्यकीय शिक्षणात “Learning by Doing” संकल्पनेचे प्रभावी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. प्रथम वर्ष एमबीबीएसच्या २० गटांतील १५१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत मानवी शरीरक्रियेतील गुंतागुंतीच्या संकल्पना वैज्ञानिक, त्रिमितीय आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सद्वारे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन या स्पर्धेत घडले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण व आधुनिक वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना पारंपरिक अध्यापनाबरोबरच अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या दृष्टीकोनातूनच ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याचे मानले जाते. प्रास्ताविकात डॉ. वंदना दुधमल (कंधारे) यांनी शरीरक्रियाशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, आकर्षक आणि समजण्यासारखा करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. *स्पर्धेतील मानकरी विजेते* प्रथम क्रमांक : गट क्र. ०५ (सर विल्यम मॅडॉक बेलीस) कृत्रिम मूत्रपिंड आणि डायलिसिस , द्वितीय क्रमांक : गट क्र. १५ (लुईस अँटोइन रनवीर) प्रकाश प्रतिक्षेप, तृतीय क्रमांक गट क्र. ०७ जॉन स्कॉट हलदणे- प्रतिप्रवाह यंत्रणा स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. समीर व डॉ. बोडके यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड, डॉ. इस्माईल इनामदार,डॉ. हुमेरा, डॉ. भावना,डॉ. कदम, डॉ. देशमुख जे बी, डॉ. डाके, डॉ. माने, सतिश इंगळे ,मेट्रोन मुदिराज तसेच विविध विभागांतील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शरीरक्रियाशास्त्र विभागातील प्राध्यापक, डॉ मसरत फिरदोस, डॉ. सीमा टाकरस, डॉ. नौशिन, निवासी डॉक्टर डॉ भागवत, डॉ अनुब्रता, डॉ अक्षय, डॉ अनिरुद्ध, डॉ. अली, डॉ. दीपक, डॉ सीमा, डॉ. सावंत,डॉ.यशस, डॉ इनशा लीपिक इंगोले,प्रयोगशाळा तंत्रज्ञ केंद्रे ,फोटोग्राफर रवी हिवाळे, इलेक्ट्रिशन चव्हाण तसेच श्रीमती पाटील व इतर कर्मचारी विजू मावशी, फुलकली मावशी आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Post by Today One Live1
- नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे4
- कछरा का दिकत1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- जळकोट1
- टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष1
- Post by नागनाथ ससाने1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.3