logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेनेची ताकद वाढवत मान्यवरांना पक्षात घेतले आहे माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago

माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेनेची ताकद वाढवत मान्यवरांना पक्षात घेतले आहे माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने

39f02bdc-e048-4a8e-a147-64a1264973f5

रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून

29f1ed6a-b287-4ad8-9278-ca1e003b1356

दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना,

d3b96fcc-36c3-4be9-89a3-ffa79e9af8d1

प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
    1
    लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी,  रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना  आमदार अमित  देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित  देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक   झाली.  यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत  बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण,  वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख,  आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी  सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित  देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष सोमवंशी यांचा हार घालून केला सत्कार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी  उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक  शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठी पकड मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे लातूरच्या जनतेतून बोलले जात आहे. संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी कौतुकास्पद काम केले होते. अशा एका उमद्या, तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट आज मुकला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला
    2
    उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष सोमवंशी यांचा हार घालून केला सत्कार.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी  उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक  शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठी पकड मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे लातूरच्या जनतेतून बोलले जात आहे. 
संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी कौतुकास्पद काम केले होते. अशा एका उमद्या, तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट आज मुकला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • क्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भिमज्योत कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील युवकांना मिळणार नवीन प्रेरणा- अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजीत अनिल गायकवाड
    1
    क्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भिमज्योत कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील युवकांना मिळणार नवीन प्रेरणा- अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजीत अनिल गायकवाड
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • कछरा का दिकत
    1
    कछरा का दिकत
    user_Ajay Pawar
    Ajay Pawar
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    1
    परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.