दादांचा शब्द पूर्ण… बीडकरांचं स्वप्न साकार! आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. दादांचा शब्द पूर्ण… बीडकरांचं स्वप्न साकार! आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी ‘झिरो वन फोर झिरो वन’ रेल्वेच्या प्रस्थानाची घोषणा, शिट्टीचा तीव्र स्वर आणि इंजिनाची गर्जना यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आदरणीय अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या काळात रेल्वे जोडणीला प्राधान्य दिलं होतं. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना बीडकरांना पुढील वर्षी पुण्याला रेल्वेनं जाता येईल, असा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण होताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान आणि समाधान व्यक्त केलं. येत्या काही महिन्यांत बीड-पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानसही व्यक्त केला. बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग दक्षिण भारताशी जोडला जाईल आणि मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जुन्या भिंती कायम ठेवून अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत. धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचा तारांगण आणि विज्ञान उद्यान प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची माहिती मिळणार आहे. यावेळी ‘भारतीय रेल्वेचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान’ या विषयावरील निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील उत्तीर्ण शाळकरी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले. तसेच, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन केलं. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
दादांचा शब्द पूर्ण… बीडकरांचं स्वप्न साकार! आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. दादांचा शब्द पूर्ण… बीडकरांचं स्वप्न साकार! आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी ‘झिरो वन फोर झिरो वन’ रेल्वेच्या प्रस्थानाची घोषणा, शिट्टीचा तीव्र स्वर आणि
इंजिनाची गर्जना यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आदरणीय अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या काळात रेल्वे जोडणीला प्राधान्य दिलं होतं. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना बीडकरांना पुढील वर्षी पुण्याला रेल्वेनं जाता येईल, असा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण होताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान आणि समाधान व्यक्त केलं. येत्या काही महिन्यांत बीड-पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानसही व्यक्त केला. बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग दक्षिण
भारताशी जोडला जाईल आणि मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जुन्या भिंती कायम ठेवून अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत. धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचा तारांगण आणि विज्ञान
उद्यान प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची माहिती मिळणार आहे. यावेळी ‘भारतीय रेल्वेचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान’ या विषयावरील निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील उत्तीर्ण शाळकरी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले. तसेच, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन केलं. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी1
- फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.2
- नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1
- जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.1
- जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप1