लोकशाही अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी राबविण्यात येत असलेली विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांना या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी न ठेवता जबाबदारीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मोहिमेत एकही पात्र मतदार वंचित राहू नये, हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुकानिहाय कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक बीएलओला आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून मतदारांच्या माहितीची अचूक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. घरोघरी जाऊन इन्युमरेशन फॉर्मचे वितरण, माहितीची अचूक पडताळणी आणि प्राप्त फॉर्मचे त्वरित डिजिटायझेशन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवावा, तसेच फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, नगर प्रशासन सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारी उपस्थित होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पर्यवेक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्यासाठी नियमित आढावा घेण्याच्या आणि बीएलओंना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लोकशाही अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी राबविण्यात येत असलेली विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांना या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी न ठेवता जबाबदारीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मोहिमेत एकही पात्र मतदार वंचित राहू नये, हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुकानिहाय कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक बीएलओला आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून मतदारांच्या माहितीची अचूक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. घरोघरी जाऊन इन्युमरेशन फॉर्मचे वितरण, माहितीची अचूक पडताळणी आणि प्राप्त फॉर्मचे त्वरित डिजिटायझेशन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवावा, तसेच फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, नगर प्रशासन सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारी उपस्थित होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पर्यवेक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्यासाठी नियमित आढावा घेण्याच्या आणि बीएलओंना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या पाऊस गायब झाला असून, विश्रांती घेतलेला हा पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार आणि कधी परतणार याविषयी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे।1
- बुलढाणा जिल्ह्यात आज शिक्षकांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढला. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, जिल्ह्यातील विविध संघटनांच्या शेकडो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला. शहरातील जिजामाता संकुल येथून निघालेला हा मोर्चा संगम चौक आणि जयस्तंभ चौक मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिक्षकांनी प्रामुख्याने अशैक्षणिक कामांपासून सुटका मिळावी, अशी ठाम मागणी केली आहे. याशिवाय टीईटीची सक्ती रद्द करणे आणि पदोन्नतीमधील जाचक व अन्यायकारक अटी काढून टाकणे या प्रमुख मागण्यांचाही समावेश आहे. विशेषतः बीएलओ (BLO) म्हणून शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या कामांचा मोठा वैताग असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. आंदोलक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून, शासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.1
- भागवत एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या पुढाकारातून मेंढपाळांच्या मुलांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या नरसी नामदेव येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी सर्व मुलांनी अत्यंत भक्तिभावाने संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता. वैजनाथ पावडे यांनी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मेंढपाळांच्या मुलांसाठी स्वतःच्या निवासस्थानी राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची निवासी सोय उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत ते मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना धार्मिक व सांस्कृतिक संस्कार देण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. या उपक्रमामुळे मुलांमध्ये भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा सुंदर संगम घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना वैजनाथ पावडे म्हणाले की, मेंढपाळांच्या हातातील काठीऐवजी त्यांना पुस्तक आणि पेन देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे परिसरातून तसेच धनगर समाजातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.1
- ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून अकोला जिल्ह्यातील पातूर येथे एका कलाकाराने खास रांगोळी साकारली. ही रांगोळी पहिल्यांदाच काढण्यात आली असून, त्याद्वारे सर्व महिलांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले आहे.1
- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांविरुद्ध मंठा पोलिसांनी गुरुवारी, ९ जुलै रोजी धडक मोहीम राबवत दोन स्वतंत्र छापे टाकले. या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली कारवाई सायंकाळी ७:४५ वाजता तळणी येथील 'राहुल किराणा अँड कोल्ड्रिंक्स' या दुकानावर करण्यात आली. या ठिकाणी राहुल बाबन पवार (वय २७, रा. तळणी) याच्याकडून २,८०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी कारवाई रात्री ९:०५ वाजता मंठा येथील सुगंधनगरमधील 'जनता किराणा' दुकानात झाली. येथे मेहबूब अली सय्यद (वय ५२, रा. सुगंधनगर) याच्या ताब्यातून ९०० रुपयांचा गोवा गुटखा जप्त करण्यात आला असून, त्याच्यावरही संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. भविष्यातही अवैध गुटखा विक्री आणि साठ्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.1
- महेश बिडगर मारहाण प्रकरणी परभणीच्या गंगाखेड शहरात सकल धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. महेश बिडगर यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल धनगर समाजाने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला.1
- अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथील वैष्णवी शिवण क्लासेसने आपल्या यशस्वी प्रवासाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत.1
- बीएलओ (BLO) कामाचा असलेला अतिताण आणि विविध अडचणींमुळे बुलढाण्यातील शिक्षक आता शासनाविरुद्ध आक्रमक झाले आहेत. गुरुवारी ९ जुलै रोजी जिल्ह्यातील शिक्षकांनी एकत्र येत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरात जिजामाता संकुल येथून सुरू झालेला हा मोर्चा संगम चौक आणि जयस्तंभ चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिथे शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या आंदोलनात 'शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, देश वाचवा' अशी घोषणा देत शिक्षकांनी आपल्या प्रमुख मागण्या रेटून धरल्या. यामध्ये शिक्षकांना बीएलओ कामातून कायमस्वरूपी मुक्त करणे, टीईटीची (TET) सक्ती रद्द करणे, पदोन्नतीमधील अन्यायकारक अटी आणि संच मान्यतेचे चुकीचे धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील शेकडो शिक्षकांनी यात सहभाग नोंदवला. अनेक शिक्षकांनी रजा टाकून किंवा सकाळची शाळा आटोपून बुलढाणा गाठले, तर काही ठिकाणी शाळा बंद ठेवून शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. शेगाव तालुका सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने देखील 'आम्हाला शिकवू द्या, मुलांना शिकू द्या' अशा फलकांसह या आंदोलनात पुढाकार घेतला. शासकीय धोरणांवर टीका करताना मोर्चातील एका शिक्षिकेने संताप व्यक्त केला की, अध्यापनाव्यतिरिक्त असैक्षणिक कामे लादली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. बीएलओ कामामुळे शिक्षक वर्गावर उपस्थित राहू शकत नाहीत, ज्यामुळे पालकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त आधार कार्डाचे कामही शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी पेन्शनच्या मुद्द्यावरही सरकारला धारेवर धरले. टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून निवृत्त करण्याची शासनाची धमकी चुकीची असल्याचे सांगत, 'आम्हाला पेन्शन द्या, आम्ही खुशाल घरी बसू,' अशी भूमिका शिक्षकांनी मांडली. शासनाने मागण्या मान्य न केल्यास यापुढे आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा मोर्चेकरी शिक्षकांनी दिला आहे.4