Shuru
Apke Nagar Ki App…
इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
Imran Siddiqui
इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
- User1663Jalna, Maharashtra👏on 30 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.2
- मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.1
- Balaji Sontakke Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti1
- मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक) हे प्रत्यक्षात मुख्यालयी वास्तव्यास आहेत की नाही, तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या भाडे भत्त्याबाबत (HRA) मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड, मंठा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती मंठा यांना सविस्तर निवेदन सादर करून आठ दिवसांत संपूर्ण माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. यामागील उद्देश म्हणजे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे, नागरिकांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज प्रभावीपणे चालवणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी असून, तरीही ते शासनाकडून भाडे भत्ता घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, संबंधित अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे दर्शविण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करून त्याची सत्यप्रत (प्रोसिडिंग) पंचायत समितीकडे सादर करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा संशय व्यक्त करत, या सर्व कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाकडे मंठा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी अहवाल देणे, संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या भाडे भत्त्याची कालावधीसह सविस्तर माहिती जाहीर करणे, तसेच जे अधिकारी प्रत्यक्षात मुख्यालयी राहत नसूनही भाडे भत्ता घेत आहेत अशा प्रकरणांची चौकशी करून त्यावर केलेली किंवा होणारी कारवाई स्पष्ट करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ही माहिती नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित असून प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत संपूर्ण व अचूक माहिती उपलब्ध करून न दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.1
- माकड हाकलताना ३३ केवी लाईनचा करंट, क्षणातच झाला दुर्दैवी अंत ! छतरपूर (मध्य प्रदेश) मधील बमीठा पोलीस ठाणे हद्दीत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या रूम बॉयचा करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रदीप रैकवार उर्फ रानू रैकवार हे लोखंडी पाइपने माकड हाकलत असताना अचानक ३३ केवी वीज लाईनच्या संपर्कात आले. जोरदार विद्युत धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.1
- सिल्लोड: तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य मिरवणूक काढण्यात आली जयंती मध्ये सर्व धर्मीय गावकऱ्यांचा समावेश1
- ‘जयभीम’च्या गर्जनेने संभाजीनगर निळ्या रंगात न्हाले दरम्यान, विविध ठिकाणी अनुयायांकडून अभिवादन कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणारे फलक झळकले. प्रशासनाकडूनही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरभर सणासारखे वातावरण निर्माण झाले असून, ‘जयभीम’च्या घोषणांनी संपूर्ण संभाजीनगर निळ्या चैतन्याने भारावून गेले.4