मालगव्हाण येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर. मालगव्हाण येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर. बोरगाव ता १ जिल्हा परिषद शाळा मालगव्हाण येथे केंद्राची मासिक शिक्षण परिषद नुकतीच उत्साहात संपन्न झाली.शिक्षण परिषदेला केंद्रप्रमुख राजेंद्र पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक केंद्रप्रमुख विनायक चौधरी मुख्याध्यापक, धर्मा बागुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोतीराम भोये यांनी प्रस्तावना केली.परिषदेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, स्पर्धा परीक्षांचे नियोजन आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हरिराम गावित यांनी मागील महिन्यात राबवण्यात आलेल्या सेतू अभ्यास आणि निपुण महाराष्ट्र अभियानाचा आढावा घेतला. PGI च्या निकषानुसार शाळांचा दर्जा सुधारणे आणि शैक्षणिक विचारांचे अनुमान लावून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. इयत्ता ४थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांना 'शिष्यवृत्ती परीक्षा' (Scholarship Exam) आणि 'जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षे'साठी प्रभावी मार्गदर्शन कसे करावे, याबाबत आनंदा बागुल यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शाळांमध्ये आनापान ध्यान उपक्रम प्रभावीपणे कसा राबवायचा, यावर सुनील सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तींवर आधारित आगामी महिन्याचे नियोजन, एकाच वर्गात एकापेक्षा जास्त इयत्तांचे विद्यार्थी असणाऱ्या (बहुवर्ग) शाळांमध्ये प्रभावी अध्यापन कसे करावे, यासाठीच्या तंत्रांवर आणि अध्यापन पद्धतींवर नियोजन कसे असावे, यावर खंडू मोरे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन व कार्य तसेच केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष स्थापन करण्यासंदर्भात भवान वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख राजेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळा व्यवस्थापन, पटनोंदणी आणि इतर प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मालगव्हाण येथील शिक्षक बापूराव पवार, हरिराम गावित, मोतीराम भोये, योगिता चव्हाण, कमलाकर भोये केंद्रस्तरीय शिक्षक कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मोतीराम भोये यांनी सूत्रसंचालन केले. चिंतामण गावित यांनी आभार मानले. फोटो ओळ- शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना केंद्रप्रमुख राजेंद्र पवार
मालगव्हाण येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर. मालगव्हाण येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर. बोरगाव ता १ जिल्हा परिषद शाळा मालगव्हाण येथे केंद्राची मासिक शिक्षण परिषद नुकतीच उत्साहात संपन्न झाली.शिक्षण परिषदेला केंद्रप्रमुख राजेंद्र पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक केंद्रप्रमुख विनायक चौधरी मुख्याध्यापक, धर्मा बागुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोतीराम भोये यांनी प्रस्तावना केली.परिषदेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, स्पर्धा परीक्षांचे नियोजन आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हरिराम गावित यांनी मागील महिन्यात राबवण्यात आलेल्या सेतू अभ्यास आणि निपुण महाराष्ट्र अभियानाचा आढावा घेतला. PGI च्या निकषानुसार शाळांचा दर्जा सुधारणे आणि शैक्षणिक विचारांचे अनुमान लावून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. इयत्ता ४थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांना 'शिष्यवृत्ती परीक्षा' (Scholarship Exam) आणि 'जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षे'साठी प्रभावी मार्गदर्शन कसे करावे, याबाबत आनंदा बागुल यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शाळांमध्ये आनापान ध्यान उपक्रम प्रभावीपणे कसा राबवायचा, यावर सुनील सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तींवर आधारित आगामी महिन्याचे नियोजन, एकाच वर्गात एकापेक्षा जास्त इयत्तांचे विद्यार्थी असणाऱ्या (बहुवर्ग) शाळांमध्ये प्रभावी अध्यापन कसे करावे, यासाठीच्या तंत्रांवर आणि अध्यापन पद्धतींवर नियोजन कसे असावे, यावर खंडू मोरे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन व कार्य तसेच केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष स्थापन करण्यासंदर्भात भवान वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख राजेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळा व्यवस्थापन, पटनोंदणी आणि इतर प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मालगव्हाण येथील शिक्षक बापूराव पवार, हरिराम गावित, मोतीराम भोये, योगिता चव्हाण, कमलाकर भोये केंद्रस्तरीय शिक्षक कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मोतीराम भोये यांनी सूत्रसंचालन केले. चिंतामण गावित यांनी आभार मानले. फोटो ओळ- शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना केंद्रप्रमुख राजेंद्र पवार
- भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.2
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे3
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया2