logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महागाव तालुक्यातील काळी दौलतसह परीसरातील गावात उष्णतेची लाट महागाव तालुक्यातील काळी दौलत परीसरात उष्णतेची लाट जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट उसळली आहे. तापमानात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असह्य होत असून रस्त्यांवरही नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजाराने ग्रस्त असलेल्यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, अंगावर हलके व सैल कपडे घालूनच बाहेर पडावे, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, सरबत यांसारखे द्रवपदार्थ सेवन करणे, तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हात दीर्घकाळ काम करणाऱ्या कामगारांनी व शेतकऱ्यांनी मधूनमधून विश्रांती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास जसे की चक्कर येणे, मळमळ, अंग गरम होणे, घाम न येणे, तत्काळ सावलीत जाऊन थंड पाणी द्यावे व जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक असून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे उत्तम ठरणार आहे.

2 hrs ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
2 hrs ago
2f8c5115-192f-43f9-a066-45bb441589ba

महागाव तालुक्यातील काळी दौलतसह परीसरातील गावात उष्णतेची लाट महागाव तालुक्यातील काळी दौलत परीसरात उष्णतेची लाट जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट उसळली आहे. तापमानात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असह्य होत असून रस्त्यांवरही नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजाराने ग्रस्त असलेल्यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, अंगावर हलके व सैल कपडे घालूनच बाहेर पडावे, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, सरबत यांसारखे द्रवपदार्थ सेवन करणे, तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हात दीर्घकाळ काम करणाऱ्या कामगारांनी व शेतकऱ्यांनी मधूनमधून विश्रांती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास जसे की चक्कर येणे, मळमळ, अंग गरम होणे, घाम न येणे, तत्काळ सावलीत जाऊन थंड पाणी द्यावे व जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक असून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे उत्तम ठरणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे
    4
    काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले 
काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Lakhandur, Bhandara•
    3 hrs ago
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.
    user_Satyajit Gajbhiye
    Satyajit Gajbhiye
    Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक भिवापूर । उमरेड भिवापूर तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे. गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.
    1
    कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक
भिवापूर । उमरेड
भिवापूर तालुक्यात 
कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग  कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने  जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे.  गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी
कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    3
    कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! 
अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… 
मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे…
नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत…
इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे…
सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे!
स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    1
    जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान
म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले.
सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली.
पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    57 min ago
  • बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.
    1
    बकरी करते मिरचीची दंडीकट !
भिवापूर । उमरेड
सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे.
सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.