जनतेला ‘त्याग’ करण्याचा उपदेश करण्यापेक्षा नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे' : हर्षवर्धन सपकाळ. मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का ? असा संतप्त प्रश्न विचारून, प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना हे महाशय टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
जनतेला ‘त्याग’ करण्याचा उपदेश करण्यापेक्षा नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे' : हर्षवर्धन सपकाळ. मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का ? असा संतप्त प्रश्न विचारून, प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना हे महाशय टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
- १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेने ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक व नोकरभरतीला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून, तातडीने निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.1
- ग्वालियर लॉ छात्रा अपहरण केस में बड़ा खुलासा, युवती बोली- पिस्टल की नोक पर बनवाया गया वीडियो प्रदेशभर में चर्चा का विषय बने ग्वालियर लॉ छात्रा अपहरण मामले में अब नया खुलासा हुआ है। पहले आरोपी का वीडियो सामने आया था, वहीं अब पीड़ित छात्रा का वीडियो वायरल हुआ है। वीडियो में छात्रा दावा कर रही है कि पिस्टल दिखाकर उसे धमकाया गया और जबरन वीडियो बनवाया गया। साथ ही उसने कहा कि उसका जीतू तोमर से किसी भी तरह का कोई संबंध नहीं है।1
- इंडियन्स सोशल मुव्हमेंटने कल्याणमधील मध्यवर्ती रुग्णालयासमोर एक महत्त्वाचे हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विशिष्ट मागणीसाठी नागरिकांचे समर्थन मिळवले जात आहे.1
- Post by Nirbhay Nagri1
- हिम्मत है तो मुस्लिम देशों से आने वाले पेट्रोल डीजल का बहिष्कार करो,जितेंद्र आव्हाड का बयान || Islamuddin Khan हिम्मत है तो मुस्लिम देशों से आने वाले पेट्रोल डीजल का बहिष्कार करो,जितेंद्र आव्हाड का बयान || Islamuddin Khan1
- Accident opp Jupiter Hospital, Thane West. More details awaited.1
- बिजनौर के कस्बा मंडावर में पेड़ पर चढ़ा गुलदार! वन विभाग ने घंटों बाद किया रेस्क्यू..!#mandawarnews #Mandawar #Leopard #Guldar #ForestDepartment #RescueOperation #Bijnor #BreakingNews #ViralVideo #Wildlife #UPNews #HindiNews #YouTubeShorts1
- ज्या बिल्डरची निवड स्वतःहा सोसाटीने केली त्या सोसायटीला विचारात न घेता बिल्डर पुनर्वसन इमारतीचा आराखडा कसा मंजूर करू शकतो..?? याला जबाबदार केवळ SRA चे अधिकारी आहेत. *पुनर्वसन आमचं म्हणता मग आमचं नियोजन आम्हाला न विचारता बिल्डर आणि अधिकारी कस करतो, हे नाही चालणार.1