दहशत माजवणारा दुसरा बिबटही अखेर जेरबंद, वनविभागाची संयुक्त कारवाई दहशत माजवणारा बिबट जेरबंद • अर्जुनी मोरगाव, १९ एप्रिल तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यातील एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर दुसऱ्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रविवारी १९ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास वनविभाग व शीघ्र बचाव पथकाने संयुक्त कारवाई करत दुसऱ्या बिबट्यालाही जेरबंद करून विबट्याच्या दहशतीला पूर्णविराम लावला आहे. धाबेटेकडी / आदर्श परिसर जंगल शिवाराला लागून असून गेल्या आठवड्यात १० एप्रिल रोजी एका बिबट्याने सहा वर्षीय बालकाला घराच्या अंगणातून उचलून नेत ठार केल्याची घटना घडली जेरबंद करण्यात आलेला बिबट होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर वनविभागाने परिसरात पिंजरे लावून १४ एप्रिल रोजी त्या बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना झाले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत कायम होती. दरम्यान, वनविभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि वनविभागाच्या सतर्कतेमुळे रविवारी पहाटे या दुसऱ्या बिबट्यालाही जेरबंद करण्यात यश आले. ही कारवाई उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग तसेच नवेगावबांध येथील अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात व अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्रसिंग बहुरे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक प्रवीण केलवतकर, वनरक्षक सतीश शेंद्रे, अमित राऊत, पुरुषोत्तम पटले यांच्यासह शीघ्र बचाव दलाच्या सदस्यांनी केली.
दहशत माजवणारा दुसरा बिबटही अखेर जेरबंद, वनविभागाची संयुक्त कारवाई दहशत माजवणारा बिबट जेरबंद • अर्जुनी मोरगाव, १९ एप्रिल तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यातील एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर दुसऱ्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रविवारी १९ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास वनविभाग व शीघ्र बचाव पथकाने संयुक्त कारवाई करत दुसऱ्या बिबट्यालाही जेरबंद करून विबट्याच्या दहशतीला पूर्णविराम लावला आहे. धाबेटेकडी / आदर्श परिसर जंगल शिवाराला लागून असून गेल्या आठवड्यात १० एप्रिल रोजी एका बिबट्याने सहा वर्षीय बालकाला घराच्या अंगणातून उचलून नेत ठार केल्याची घटना घडली जेरबंद करण्यात आलेला बिबट होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर वनविभागाने परिसरात पिंजरे लावून १४ एप्रिल रोजी त्या बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना झाले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत कायम होती. दरम्यान, वनविभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि वनविभागाच्या सतर्कतेमुळे रविवारी पहाटे या दुसऱ्या बिबट्यालाही जेरबंद करण्यात यश आले. ही कारवाई उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग तसेच नवेगावबांध येथील अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात व अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्रसिंग बहुरे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक प्रवीण केलवतकर, वनरक्षक सतीश शेंद्रे, अमित राऊत, पुरुषोत्तम पटले यांच्यासह शीघ्र बचाव दलाच्या सदस्यांनी केली.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.1
- Post by मनिषा विजय काशीवार1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by कु सुषमा डबराल1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1