logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव: हॉटेल मालक घरी गेल्याची संधी साधून कार, लॅपटॉप आणि टॅब घेऊन पसार झालेल्या नोकराला शिवाजी नगर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२, रा. दालफैल, खामगाव) यांचे शहरात हॉटेल व लॉजिंग आहे. त्यांच्याकडे सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३०, रा. सजनपुरी) हा तरुण नोकर म्हणून कामाला होता. १ एप्रिल २०६ रोजी श्रीकांत देशमुख हे अंघोळीसाठी घरी गेले असता, आरोपी सुनील याने काउंटरवरील मोटोरोला कंपनीचा टॅब, एचपीचा लॅपटॉप आणि मालकाची रेनॉल्ड क्विड कार क्रमांक MH 12 TD 5295 असा एकूण ३,०५,००० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.​या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३०५, ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने वेगाने चक्र फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुना टोल नाका परिसरात एक मोरपंखी रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेऊन पाहणी केली असता, चोरी गेलेली कार आणि त्यामध्ये आरोपी सुनील नेमाणे मिळून आला.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​ही धडक कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुरी, पोहेकों संदीप टाकसाळ, पोकों केशव झाल्टे, मपोकों पल्लवी बोर्डे, चालक विशाल,पोहेकों राजू आडवे व पोकों कैलास ठोंबरे यांनी केली आहे.

6 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
6 hrs ago

खामगाव: हॉटेल मालक घरी गेल्याची संधी साधून कार, लॅपटॉप आणि टॅब घेऊन पसार झालेल्या नोकराला शिवाजी नगर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२, रा. दालफैल, खामगाव) यांचे शहरात हॉटेल व लॉजिंग आहे. त्यांच्याकडे सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३०, रा. सजनपुरी) हा तरुण नोकर म्हणून कामाला होता. १ एप्रिल २०६ रोजी श्रीकांत देशमुख हे अंघोळीसाठी घरी गेले असता, आरोपी सुनील याने काउंटरवरील मोटोरोला कंपनीचा टॅब, एचपीचा लॅपटॉप आणि मालकाची रेनॉल्ड क्विड कार क्रमांक MH 12 TD 5295 असा एकूण ३,०५,००० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.​या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३०५, ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने वेगाने चक्र फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुना टोल नाका परिसरात एक मोरपंखी रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेऊन पाहणी केली असता, चोरी गेलेली कार आणि त्यामध्ये आरोपी सुनील नेमाणे मिळून आला.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​ही धडक कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुरी, पोहेकों संदीप टाकसाळ, पोकों केशव झाल्टे, मपोकों पल्लवी बोर्डे, चालक विशाल,पोहेकों राजू आडवे व पोकों कैलास ठोंबरे यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shivaji Bhosale
    1
    Post by Shivaji Bhosale
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आडगाव राजा जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा
    1
    आडगाव राजा जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पंढरपूर - पंढरपुरातील ३०० वर्ष जुना दोन एकरातील होळकर वाडा एकदा पहाच
    1
    पंढरपूर - पंढरपुरातील ३०० वर्ष जुना दोन एकरातील होळकर वाडा एकदा पहाच
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • उकळी ग्रामपंचायत कारभारावर सवाल; अमोल बोरे यांचे अर्धनग्न आंदोलन.. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; प्रशासनासमोर वाढले आव्हान... मेहकर :-पंचायत समिती अंतर्गत उकळी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात अमोल बोरे यांनी पंचायत समिती समोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.... ग्रामसेवक दारूच्या नशेत कार्यालयात येत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, गरिबाकडून घकुलासाठी 10 हजार रुपयाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करण्यात आलाय.. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, संबंधित ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास सहपरिवार आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे...
    1
    उकळी ग्रामपंचायत कारभारावर सवाल; अमोल बोरे यांचे अर्धनग्न आंदोलन..
कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; प्रशासनासमोर वाढले आव्हान...
मेहकर :-पंचायत समिती अंतर्गत उकळी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात अमोल बोरे यांनी पंचायत समिती समोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.... ग्रामसेवक दारूच्या नशेत कार्यालयात येत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, गरिबाकडून घकुलासाठी 10 हजार रुपयाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करण्यात आलाय..  या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, संबंधित ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास सहपरिवार आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे...
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • 🔥 पतसंस्थाओं का काला बाजार: मजबूरी या लूट? 🔥 17% ब्याज का जाल! सच्चाई जानकर दंग रह जाओगे 🔥 लाइसेंस के नाम पर लूट! DDR ऑफिस की बड़ी सच्चाई 🔥 बैंक vs पतसंस्था: कौन कर रहा है जनता के साथ धोखा? 🔥 गरीब फंसा कर्ज के जाल में! असली खेल अब सामने 🔥 12% vs 17% ब्याज! आखिर सच क्या है? 🔥 पतसंस्था का काला सच | जनता क्यों हो रही बर्बाद? 🔥 DDR ऑफिस के नीचे क्या चल रहा है? 🔥 कर्ज के नाम पर ठगी! पूरा सिस्टम एक्सपोज 🔥 इन्कलाब 24 न्यूज की बड़ी पड़ताल | सच देखकर चौंक जाओगे #पतसंस्था #कर्ज #ब्याज #17प्रतिशत #लूट #बैंक #DDR #सरकारी_सिस्टम #FinancialScam #LoanTrap #BreakingNews #Inquilab24News #IndiaNews #Corruption #BlackTruth #ViralNews #YouTubeIndia #TrendingNow #Expose #Finance #MoneyTrap #LoanScam #PublicVoice #Justice #IndianEconomy #RealityCheck #NewsUpdate #HindiNews #ViralVideo #TruthRevealed
    1
    🔥 पतसंस्थाओं का काला बाजार: मजबूरी या लूट?
🔥 17% ब्याज का जाल! सच्चाई जानकर दंग रह जाओगे
🔥 लाइसेंस के नाम पर लूट! DDR ऑफिस की बड़ी सच्चाई
🔥 बैंक vs पतसंस्था: कौन कर रहा है जनता के साथ धोखा?
🔥 गरीब फंसा कर्ज के जाल में! असली खेल अब सामने
🔥 12% vs 17% ब्याज! आखिर सच क्या है?
🔥 पतसंस्था का काला सच | जनता क्यों हो रही बर्बाद?
🔥 DDR ऑफिस के नीचे क्या चल रहा है?
🔥 कर्ज के नाम पर ठगी! पूरा सिस्टम एक्सपोज
🔥 इन्कलाब 24 न्यूज की बड़ी पड़ताल | सच देखकर चौंक जाओगे
#पतसंस्था #कर्ज #ब्याज #17प्रतिशत #लूट #बैंक #DDR #सरकारी_सिस्टम #FinancialScam #LoanTrap #BreakingNews #Inquilab24News #IndiaNews #Corruption #BlackTruth #ViralNews #YouTubeIndia #TrendingNow #Expose #Finance #MoneyTrap #LoanScam #PublicVoice #Justice #IndianEconomy #RealityCheck #NewsUpdate #HindiNews #ViralVideo #TruthRevealed
    user_Inquilab24 News
    Inquilab24 News
    Dhaba Owner बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे
    1
    भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; तिसऱ्या दिवशीही तणाव कायम सोलापूर (माढा तालुका), ३ एप्रिल २०२६ — सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे मराठा आणि धनगर समाजात निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही शमलेला नाही. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जमावबंदी लागू करण्यात आली असून, दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनाही घडल्या आहेत. वादाची पार्श्वभूमी खेलोबा मंदिर परिसरात (पालखी मार्गावर) मंगळवारी रात्री अंधारात पुतळा बसवण्यात आला. धनगर समाजाकडून याला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवस्थानच्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण झाले असून, पालखी मार्ग अडवला जाईल. त्यामुळे पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाकडून मात्र पुतळा सन्मानाने ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा-अर्चा करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने-सामने आले. संतप्त जमावाने तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. मोजमाप (सर्व्हे) सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतल्याचेही दिसले. गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “खेलोबा मंदिरालगत चुकीच्या पद्धतीने (रात्री अंधारात) पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही. पुतळा बसवायची जबाबदारी माझ्यावर सोपवा — वाजत-गाजत, दिवसा सन्मानाने बसवू.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत “सात गुंठे जागा उपलब्ध आहे, तिथे पुतळा बसवू” असे सूचित केल्याचे पडळकर यांनी सांगितले. त्यांनी यात राजकारण सुरू असल्याचा आरोपही केला. या वक्तव्यानंतर काही मराठा आंदोलकांनी पडळकरांची “जीभ घसरली” अशी टीका केली. लक्ष्मण हाके यांची भूमिका धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन तीव्र केले. “छत्रपतींच्या पुतळ्याला नव्हे, त्या जागेला विरोध आहे,” असे सांगत त्यांनी पुतळा हटवण्यावर ठाम राहिले. “गोळ्या घातल्या तरी माघार नाही,” असेही त्यांनी म्हटले. आज मोजणी सुरू असताना हाके यांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. इतर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले. प्रशासन दोन्ही बाजूंसोबत चर्चा करत आहे, पण तोडगा अद्याप निघालेला नाही. गावातील काही स्थानिकांनी “सर्व समाज मंदिराचे भक्त आहेत, जातीय तेढ कशी निर्माण झाली?” असा प्रश्न उपस्थित केला. शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यावरून समाजात भांडणे होणे आणि राजकीय रंग चढणे हे दुर्दैवी आहे. दोन्ही समाजांनी शांतता राखून, प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    1
    अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; तिसऱ्या दिवशीही तणाव कायम
सोलापूर (माढा तालुका), ३ एप्रिल २०२६ — सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे मराठा आणि धनगर समाजात निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही शमलेला नाही. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जमावबंदी लागू करण्यात आली असून, दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनाही घडल्या आहेत.
वादाची पार्श्वभूमी
खेलोबा मंदिर परिसरात (पालखी मार्गावर) मंगळवारी रात्री अंधारात पुतळा बसवण्यात आला. धनगर समाजाकडून याला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवस्थानच्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण झाले असून, पालखी मार्ग अडवला जाईल. त्यामुळे पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाकडून मात्र पुतळा सन्मानाने ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा-अर्चा करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने-सामने आले. संतप्त जमावाने तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. मोजमाप (सर्व्हे) सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतल्याचेही दिसले.
गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “खेलोबा मंदिरालगत चुकीच्या पद्धतीने (रात्री अंधारात) पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही. पुतळा बसवायची जबाबदारी माझ्यावर सोपवा — वाजत-गाजत, दिवसा सन्मानाने बसवू.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत “सात गुंठे जागा उपलब्ध आहे, तिथे पुतळा बसवू” असे सूचित केल्याचे पडळकर यांनी सांगितले. त्यांनी यात राजकारण सुरू असल्याचा आरोपही केला. या वक्तव्यानंतर काही मराठा आंदोलकांनी पडळकरांची “जीभ घसरली” अशी टीका केली.
लक्ष्मण हाके यांची भूमिका
धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन तीव्र केले. “छत्रपतींच्या पुतळ्याला नव्हे, त्या जागेला विरोध आहे,” असे सांगत त्यांनी पुतळा हटवण्यावर ठाम राहिले. “गोळ्या घातल्या तरी माघार नाही,” असेही त्यांनी म्हटले. आज मोजणी सुरू असताना हाके यांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.
इतर प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
प्रशासन दोन्ही बाजूंसोबत चर्चा करत आहे, पण तोडगा अद्याप निघालेला नाही.
गावातील काही स्थानिकांनी “सर्व समाज मंदिराचे भक्त आहेत, जातीय तेढ कशी निर्माण झाली?” असा प्रश्न उपस्थित केला.
शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यावरून समाजात भांडणे होणे आणि राजकीय रंग चढणे हे दुर्दैवी आहे. दोन्ही समाजांनी शांतता राखून, प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • खामगांव : जन सामान्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वकांशी योजना सुरू केल्या आहेत, या योजणांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा,त्यांना त्यांचा लाभ द्या आणि जनसंघापासून भाजपाचे देशासाठी असलेले अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास आज 3 मार्च रोजी श्रीहरी लॉन्स खामगाव येथे प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ना. अँड. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आले त्यावेळी ते भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. जनसंघापासून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. पक्षासाठी अनेकांनी दिलेले बलिदान व सतत झटणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. देश सेवेसाठी नेहमी सतत करत असलेले कार्य व जनहितासाठी आपल्या सरकारने आणलेल्या योजना व त्या प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना दिलेला त्यांचा लाभ या लोकांना माहिती असाव्या व ज्या गरजूना लाभ मिळाला नाही अश्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रशिक्षण वर्ग सातत्याने भाजपाच्या वतीने राबविण्याचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत व त्या प्रभावीपणे राबविले सुद्धा जात आहेत. परंतु अजूनही अनेक गरजू व्यक्तींना या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा व योजना कशा आहेत याची काहीच माहिती नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक वंचित गोरगरीब प्रत्येक नागरिकाला या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा आणि जो ज्या योजनेत बसत असेल त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची मदत करा जेणेकरून आपल्याला सुद्धा पुण्य लाभेल व गरजू व्यक्तींचे सुद्धा आयुष्य उज्वल होईल. प्रधानमंत्री आवास योजना, पी एम किसान योजना,कौशल्य विकास योजना,जलजीवन योजना अशा शेकडो अनेक योजना मार्फत शेतकरी व इतर सर्व घटकातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विद्यार्थी,नोकरदार असो वा इतर क्षेत्रातील प्रत्येकासाठी कोणती न कोणती चांगल्या लाभाची योजना सरकारने आणलेल्या आहेत. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा आरोग्य संबंधितही योजनेमार्फत कोट्यावधी रुग्णांना याचा लाभ होत आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आपण महामारीवर मात केली. देशातील करोडो नागरिकांनाच नव्हे तर जगातील अनेक देशांना आपण व्हॅक्सिन देऊन जीवनदान दिले व मानवता जोपसली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली त्या अंतर्गत देशातील सुमारे 50 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते आजही देणे सुरू आहे. असे अनेक कल्याणकारी कार्य आपले सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करत आहे याची माहिती प्रचार व प्रसार करून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा जेणेकरून भाजपाचे देशसेवा व समाजसेवा हेच कार्य आहे असे अभिमानाने सांगून पटवून द्या. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी दिलेला शत प्रतिषद भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला मेरा बूथ सबसे मजबूत हा नारा सदैव लक्षात ठेवून जनसेवेसाठी सदैव तत्पर रहा व भारतीय जनता पार्टीचा पक्ष विस्तार आणखी वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा यावेळी ना. अँड. आकाश फुंडकर यांनी केले. या उद्घाटनचा सत्रास भाजपा खामगाव जिल्हा व खामगाव मतदार संघातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या प्रशिक्षण वर्गास आपली (कार्यकर्ता सांभाळणे ) या विषयावर भाजपा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, मन की बात बूथ व्यवस्थापन भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, SIR विशेष सखोल निरीक्षण या विषयावर याचे खामगाव प्रमुख तथा भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, कार्य विस्तार आमची दृष्टी खामगाव तालुका सरचिटणीस वैभव डवरे, वैचारिक अधिष्ठान शेखर कुलकर्णी, केंद्र व राज्य सरकार योजना व सरकारची कामगिरी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, इतिहास व विकास ज्येष्ठ नेते संतोषराव देशमुख, व मीडिया, सोशल मीडिया, AI, नमो ॲप या विषयावर सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
    2
    खामगांव :  जन सामान्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वकांशी  योजना सुरू केल्या आहेत, या योजणांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा,त्यांना त्यांचा लाभ द्या आणि जनसंघापासून भाजपाचे देशासाठी असलेले अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय  प्रशिक्षण वर्गास आज 3 मार्च रोजी श्रीहरी लॉन्स खामगाव येथे प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ना. अँड. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आले त्यावेळी ते भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. जनसंघापासून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. पक्षासाठी अनेकांनी दिलेले बलिदान व सतत झटणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. देश सेवेसाठी नेहमी सतत करत असलेले कार्य व जनहितासाठी आपल्या सरकारने आणलेल्या योजना व त्या प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना दिलेला त्यांचा लाभ या लोकांना माहिती असाव्या व ज्या गरजूना लाभ मिळाला नाही अश्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रशिक्षण वर्ग सातत्याने भाजपाच्या वतीने राबविण्याचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत व त्या प्रभावीपणे राबविले सुद्धा जात आहेत. परंतु अजूनही अनेक गरजू व्यक्तींना या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा व योजना कशा आहेत याची काहीच माहिती नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक वंचित गोरगरीब प्रत्येक नागरिकाला या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा आणि जो ज्या योजनेत बसत असेल त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची मदत करा जेणेकरून आपल्याला सुद्धा पुण्य लाभेल व गरजू व्यक्तींचे सुद्धा आयुष्य उज्वल होईल. प्रधानमंत्री आवास योजना, पी एम किसान योजना,कौशल्य विकास योजना,जलजीवन योजना अशा शेकडो अनेक योजना मार्फत शेतकरी व इतर सर्व घटकातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विद्यार्थी,नोकरदार असो वा  इतर क्षेत्रातील प्रत्येकासाठी कोणती न कोणती चांगल्या लाभाची योजना सरकारने आणलेल्या आहेत. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा आरोग्य संबंधितही योजनेमार्फत कोट्यावधी रुग्णांना याचा लाभ होत आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आपण महामारीवर मात केली. देशातील करोडो नागरिकांनाच नव्हे तर जगातील अनेक देशांना आपण व्हॅक्सिन देऊन जीवनदान दिले व मानवता जोपसली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली त्या अंतर्गत देशातील सुमारे 50 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते आजही देणे सुरू आहे. असे अनेक कल्याणकारी कार्य आपले सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करत आहे याची माहिती प्रचार व प्रसार करून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा जेणेकरून भाजपाचे देशसेवा व समाजसेवा हेच कार्य आहे असे अभिमानाने सांगून पटवून द्या. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी दिलेला शत प्रतिषद भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला मेरा बूथ सबसे मजबूत हा नारा सदैव लक्षात ठेवून जनसेवेसाठी सदैव तत्पर रहा व भारतीय जनता पार्टीचा पक्ष विस्तार आणखी वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा यावेळी ना. अँड. आकाश फुंडकर यांनी केले. या उद्घाटनचा सत्रास भाजपा खामगाव जिल्हा व खामगाव मतदार संघातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या प्रशिक्षण वर्गास आपली (कार्यकर्ता सांभाळणे ) या विषयावर भाजपा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, मन की बात बूथ व्यवस्थापन भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, SIR विशेष सखोल निरीक्षण या विषयावर याचे खामगाव प्रमुख तथा भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, कार्य विस्तार आमची दृष्टी  खामगाव तालुका सरचिटणीस  वैभव डवरे, वैचारिक अधिष्ठान शेखर कुलकर्णी, केंद्र व राज्य सरकार योजना व सरकारची कामगिरी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, इतिहास व विकास ज्येष्ठ नेते संतोषराव देशमुख, व मीडिया, सोशल मीडिया, AI, नमो ॲप या विषयावर सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.