जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांबाबत दोषी कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद हिंगोलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई प्रतिदिन 55 लिटर प्रमाणे शुद्ध व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने जिल्ह्यात एकूण 619 नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित योजनांची कामे कंत्राटदारांना ब-1 करारावर देण्यात आली असून कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मुदत संपूनही काही कंत्राटदारांकडून कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. वारंवार सूचना देऊनही कामे पूर्ण न करणाऱ्या अशा एकूण 68 कामांच्या कंत्राटदारांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये संबंधित कंत्राटदारांना 31 मार्च 2026 अखेरपर्यंत अपूर्ण कामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नोटीस प्राप्त होऊनही कामे पूर्ण न केल्यास ब-1 करारातील अटी व शर्तींनुसार संबंधित कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी दिला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांबाबत दोषी कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद हिंगोलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई प्रतिदिन 55 लिटर प्रमाणे शुद्ध व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने जिल्ह्यात एकूण 619 नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित योजनांची कामे कंत्राटदारांना ब-1 करारावर देण्यात आली असून कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मुदत संपूनही काही कंत्राटदारांकडून कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. वारंवार सूचना देऊनही कामे पूर्ण न करणाऱ्या अशा एकूण 68 कामांच्या कंत्राटदारांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये संबंधित कंत्राटदारांना 31 मार्च 2026 अखेरपर्यंत अपूर्ण कामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नोटीस प्राप्त होऊनही कामे पूर्ण न केल्यास ब-1 करारातील अटी व शर्तींनुसार संबंधित कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी दिला आहे.
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by वैजनाथ पावडे1