Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- Post by Labour addaa.1
- Post by Amravati News Update1
- महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश! ३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!1
- Post by वैजनाथ पावडे1
- खामगाव : शहरातील हॉटेल, लॉजेस आणि कॅफेमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध खामगाव पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. 'ऑपरेशन मिशन परिवर्तन' अंतर्गत शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी कॅफे' वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मागील काही काळापासून संशयास्पद कॅफे आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक कॅफेमध्ये शाळा-महाविद्यालयातील मुले-मुली गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने आज शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी' कॅफेची झडती घेतली असता, तिथे काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. या प्रकरणी कॅफे मालक गौरव गावतरे याच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर आपली मुले वेळेवर घरी पोहोचतात की नाही, याची खात्री करावी. तसेच, शहरातील सर्व हॉटेल आणि कॅफे चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे की, त्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना थारा देऊ नये.असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी यापूर्वीच शहरातील सर्व कॅफे आणि हॉटेल्सना कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा कॅफे व हॉटेल चालकांना दिला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणिव डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.1
- Post by Labour addaa.1