Shuru
Apke Nagar Ki App…
संकनपूरी येथे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत थेट सरपंचासोबत चर्चा केली आहे.
स्वराज्य वार्ता
संकनपूरी येथे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत थेट सरपंचासोबत चर्चा केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जर तुम्ही तुमची गाडी विकत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गाडी विकताना सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. ही सावधगिरीची माहिती स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही नक्की सांगा.1
- पुण्यातील मावळ तालुक्यातील आडले बुद्रुक येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. राज्यात अजितदादांचा पहिला अर्धाकृती पुतळा याच गावात उभारण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला सलाम केला. या प्रसंगी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या फळ्यावर अजितदादांचे तैलचित्र साकारत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. गुरुकुल संस्थेच्या उभारणीत अजितदादांनी दिलेल्या सहकार्याचे स्मरण करत ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांची जयंती अत्यंत कृतज्ञतेने साजरी केली.1
- नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.4
- भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.1
- पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 'इन्कलाब जिंदाबाद'च्या जोरदार घोषणांनी परिसर पूर्णपणे दणाणून गेला आहे. या दरम्यान एका तरुणीने थेट पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या मांडला आहे.1
- समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. सरकारच्या भूमिकेवर आणि कारभारावर अत्यंत आक्रमक होत त्यांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत.1
- पुण्यात आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी त्वरित इस्तफा द्यावा, या मागणीसाठी आंदोलनकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.1
- मुंडव्यात ५ ते ६ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत धुडगूस घातला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेतील दोषींवर कडक पोलिस कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.1