logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा ७ फेब्रुवारी १९५८ चा 'गणपतीचे रहस्य' हा लेख म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासातील एक 'क्रांतिकारी सत्यशोधक जाहीरनामा' महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 'सत्यशोधक' विचारांचा वारसा पुढे चालवत, प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीतून सनातनी पुरोहितशाहीच्या चिंधड्या उडवल्या आणि बहुजन समाजाला वैचारिक गुलामीतून जागे केले. पुरोहितशाहीच्या 'ब्राह्मणीकरणावर' थेट हल्ला!क्रांतिकारी विचार: प्रबोधनकारांनी अत्यंत प्रखर शब्दात मांडले की, "गणपती" हे मूळचे कोणतेही चमत्कारिक किंवा शेंदूर फाडलेले दैवत नव्हते. तो प्राचीन भारतातील प्रजासत्ताक 'गणराज्यांचा लोकनायक' (बुद्ध) होता. सत्यशोधक प्रहार: परंतु, नंतरच्या काळात स्वार्थी पुरोहितांनी या लोकनायकाचे 'ब्राह्मणीकरण' केले. काल्पनिक आणि अशक्य कोटीतील कथा रचून बहुजन समाजाला अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकवले, जेणेकरून आपली धार्मिक मक्तेदारी आणि दक्षिणेची व्यवस्था कायम राहील. बुद्ध म्हणजेच 'अष्टविनायक' हा ऐतिहासिक विस्फोट!प्रबोधनकारांनी इतिहासाची सत्यशोधक पुनर्मांडणी करताना बॉम्ब टाकला की, महाराष्ट्रातील आजची अष्टविनायक क्षेत्रे ही मूळची बौद्ध संस्कृतीची महान विहारे होती. बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर या विहारांचे हिंदूकरण करण्यात आले. बुद्ध जेव्हा लोकांना उपदेश करायचे, तेव्हा मानवी मनाच्या संदर्भात 'चित्त' (मन) आणि 'मल्ल' (अशुद्धता) या शब्दांचा वापर करायचेपुरोहितांनी या 'चित्त आणि मल्ल' या तात्विक शब्दांचे रूपांतर पौराणिक कथेतील 'चिंतामणी' आणि 'मयुरेश्वर' या देवांमध्ये करून टाकले. "बाप्पा मोरया" चा अर्थ मोरिया गोसावी नव्हे, 'चंद्रगुप्त मौर्य'!चिंचवडचे संत मोरिया गोसावी यांच्या नावावरून "मोरया" हा शब्द आला, हा दावा धुडकावून लावत प्रबोधनकारांनी सांगितले की, हा जयघोष थेट ख्रिस्तपूर्व काळातील सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या आणि मौर्य साम्राज्याच्या काळातील लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेचा गौरव करणारा आहे. विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एल्गारपौराणिक चमत्कारांचे खंडन: पार्वतीच्या मळापासून जन्माला आलेला मूल, त्याचे शीर धडावेगळे करणे आणि त्यावर हत्तीचे तोंड बसवणे... या सर्व भाकडकथा बुद्धीप्रामाण्यवादाला (Rationalism) धरून नाहीत. सत्यशोधक संदेश: माणसाचे कल्याण हे निर्जीव पाषाणाची पूजा करून किंवा देवाचे अवडंबर माजवून होणार नाही; तर ते बुद्धीचा वापर करून, समता, बंधुता आणि नैतिक आचरण (अष्टांग मार्ग) अंगीकारल्यानेच होईल. "ज्या महाराष्ट्राला प्रगती करायची आहे, त्याने देवाचे आणि उत्सवांचे केवळ कर्मकांड करून चालणार नाही. अंधश्रद्धा फेकून द्या, पुरोहितशाहीच्या गुलामीतून मुक्त व्हा आणि आपल्या गौरवशाली, लोकशाहीवादी खऱ्या इतिहासाचा शोध घ्या!"

13 hrs ago
user_Digambar Yadav
Digambar Yadav
Voice of people भुदरगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
13 hrs ago
58d0f2c6-502e-47b3-95d7-fd4338f69e22

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा ७ फेब्रुवारी १९५८ चा 'गणपतीचे रहस्य' हा लेख म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासातील एक 'क्रांतिकारी सत्यशोधक जाहीरनामा' महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 'सत्यशोधक' विचारांचा वारसा पुढे चालवत, प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीतून सनातनी पुरोहितशाहीच्या चिंधड्या उडवल्या आणि बहुजन समाजाला वैचारिक गुलामीतून जागे केले. पुरोहितशाहीच्या 'ब्राह्मणीकरणावर' थेट हल्ला!क्रांतिकारी विचार: प्रबोधनकारांनी अत्यंत प्रखर शब्दात मांडले की, "गणपती" हे मूळचे कोणतेही चमत्कारिक किंवा शेंदूर फाडलेले दैवत नव्हते. तो प्राचीन भारतातील प्रजासत्ताक 'गणराज्यांचा लोकनायक' (बुद्ध) होता. सत्यशोधक प्रहार: परंतु, नंतरच्या काळात स्वार्थी पुरोहितांनी या लोकनायकाचे 'ब्राह्मणीकरण' केले. काल्पनिक आणि अशक्य कोटीतील कथा रचून बहुजन समाजाला अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकवले, जेणेकरून आपली धार्मिक मक्तेदारी आणि दक्षिणेची व्यवस्था कायम राहील. बुद्ध म्हणजेच 'अष्टविनायक' हा ऐतिहासिक विस्फोट!प्रबोधनकारांनी इतिहासाची सत्यशोधक पुनर्मांडणी करताना बॉम्ब टाकला की, महाराष्ट्रातील आजची अष्टविनायक क्षेत्रे ही मूळची बौद्ध संस्कृतीची महान विहारे होती. बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर या विहारांचे हिंदूकरण करण्यात आले. बुद्ध जेव्हा लोकांना उपदेश करायचे, तेव्हा मानवी मनाच्या संदर्भात 'चित्त' (मन) आणि 'मल्ल' (अशुद्धता) या शब्दांचा वापर करायचेपुरोहितांनी या 'चित्त आणि मल्ल' या तात्विक शब्दांचे रूपांतर पौराणिक कथेतील 'चिंतामणी' आणि 'मयुरेश्वर' या देवांमध्ये करून टाकले. "बाप्पा मोरया" चा अर्थ मोरिया गोसावी नव्हे, 'चंद्रगुप्त मौर्य'!चिंचवडचे संत मोरिया गोसावी यांच्या नावावरून "मोरया" हा शब्द आला, हा दावा धुडकावून लावत प्रबोधनकारांनी सांगितले की, हा जयघोष थेट ख्रिस्तपूर्व काळातील सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या आणि मौर्य साम्राज्याच्या काळातील लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेचा गौरव करणारा आहे. विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एल्गारपौराणिक चमत्कारांचे खंडन: पार्वतीच्या मळापासून जन्माला आलेला मूल, त्याचे शीर धडावेगळे करणे आणि त्यावर हत्तीचे तोंड बसवणे... या सर्व भाकडकथा बुद्धीप्रामाण्यवादाला (Rationalism) धरून नाहीत. सत्यशोधक संदेश: माणसाचे कल्याण हे निर्जीव पाषाणाची पूजा करून किंवा देवाचे अवडंबर माजवून होणार नाही; तर ते बुद्धीचा वापर करून, समता, बंधुता आणि नैतिक आचरण (अष्टांग मार्ग) अंगीकारल्यानेच होईल. "ज्या महाराष्ट्राला प्रगती करायची आहे, त्याने देवाचे आणि उत्सवांचे केवळ कर्मकांड करून चालणार नाही. अंधश्रद्धा फेकून द्या, पुरोहितशाहीच्या गुलामीतून मुक्त व्हा आणि आपल्या गौरवशाली, लोकशाहीवादी खऱ्या इतिहासाचा शोध घ्या!"

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गणरायाच्या आगमनाने चोपडा दुमदुमले; ४०० मंडळांत उत्साह, विसर्जनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
    1
    गणरायाच्या आगमनाने चोपडा दुमदुमले; ४०० मंडळांत उत्साह, विसर्जनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उत्साह, आनंद, प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत..
    1
    उत्साह, आनंद, प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत..
    user_Shahaji patil
    Shahaji patil
    Karvir, Kolhapur•
    10 hrs ago
  • दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे तासगावच्या गणरायाला साकडे दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे तासगावच्या गणरायाला साकडे अंजनी ते तासगाव पायी प्रवास; महिला व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर यंदा दुष्काळाचे संकट येऊ नये, शेतकरी बांधवांना चांगला पाऊस मिळावा आणि शेती हिरवीगार व्हावी, यासाठी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी आज अंजनी ते तासगाव असा पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी साकडे घातले. या पायी प्रवासात मोठ्या संख्येने महिला, शेतकरी बांधव, युवक, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. महिला व शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पायी प्रवासाला मिळाला. दुष्काळाचे संकट टळावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला यंदा पावसाची साथ मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तासगाव येथे गणरायाचे दर्शन घेऊन आमदार रोहित पाटील यांनी मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या वतीने चांगला पाऊस पडावा, पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केली. यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, “आज शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. पावसाचे अनिश्चित वातावरण, पाण्याची कमतरता आणि शेतीसमोरील वाढते संकट पाहता शासनाने तातडीने शेतकऱ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शासनाने वेळीच ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास आम्ही तयार आहोत.” शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या पायी प्रवासामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची आस्था, श्रद्धा आणि संघर्षाची भूमिका एकाच वेळी अधोरेखित झाली.
    1
    दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे तासगावच्या गणरायाला साकडे

दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे तासगावच्या गणरायाला साकडे
अंजनी ते तासगाव पायी प्रवास; महिला व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर यंदा दुष्काळाचे संकट येऊ नये, शेतकरी बांधवांना चांगला पाऊस मिळावा आणि शेती हिरवीगार व्हावी, यासाठी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी आज अंजनी ते तासगाव असा पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी साकडे घातले.
या पायी प्रवासात मोठ्या संख्येने महिला, शेतकरी बांधव, युवक, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. महिला व शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पायी प्रवासाला मिळाला. दुष्काळाचे संकट टळावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला यंदा पावसाची साथ मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तासगाव येथे गणरायाचे दर्शन घेऊन आमदार रोहित पाटील यांनी मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या वतीने चांगला पाऊस पडावा, पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, “आज शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. पावसाचे अनिश्चित वातावरण, पाण्याची कमतरता आणि शेतीसमोरील वाढते संकट पाहता शासनाने तातडीने शेतकऱ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शासनाने वेळीच ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास आम्ही तयार आहोत.”
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या पायी प्रवासामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची आस्था, श्रद्धा आणि संघर्षाची भूमिका एकाच वेळी अधोरेखित झाली.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले
    1
    पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न
खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!
    1
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....  जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    41 min ago
  • निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    1
    निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास!
संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात
विशेष प्रतिनिधी :
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे.
संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.
त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे.
रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा.
🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या.
पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल
    1
    सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल
सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.