पुण्यातील लोहगाव चौकातील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटून अनेक दिवसांपासून उघडे पडले आहे. यामुळे त्या ठिकाणी मोठा जीवघेणा खड्डा निर्माण झाला असून दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चेंबरचे तुटलेले झाकण बाजूला पडून असून त्यावर केवळ तात्पुरता पत्रा ठेवण्यात आला आहे. मात्र तो अपुरा ठरत असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप दुरुस्ती केलेली नाही. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने चेंबरची दुरुस्ती करून हा जीवघेणा खड्डा कायमस्वरूपी बुजवावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पुण्यातील लोहगाव चौकातील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटून अनेक दिवसांपासून उघडे पडले आहे. यामुळे त्या ठिकाणी मोठा जीवघेणा खड्डा निर्माण झाला असून दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चेंबरचे तुटलेले झाकण बाजूला पडून असून त्यावर केवळ तात्पुरता पत्रा ठेवण्यात आला आहे. मात्र तो अपुरा ठरत असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप दुरुस्ती केलेली नाही. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने चेंबरची दुरुस्ती करून हा जीवघेणा खड्डा कायमस्वरूपी बुजवावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
- पुण्यातील लोहगाव चौकातील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटून अनेक दिवसांपासून उघडे पडले आहे. यामुळे त्या ठिकाणी मोठा जीवघेणा खड्डा निर्माण झाला असून दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चेंबरचे तुटलेले झाकण बाजूला पडून असून त्यावर केवळ तात्पुरता पत्रा ठेवण्यात आला आहे. मात्र तो अपुरा ठरत असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप दुरुस्ती केलेली नाही. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने चेंबरची दुरुस्ती करून हा जीवघेणा खड्डा कायमस्वरूपी बुजवावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.1
- पुण्यातील हडपसर साडेसतरानळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अमनोरा पार्क आणि मुंढवा या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या समस्येकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन केले. या वेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यात आला असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- पिंपरी-चिंचवडमध्ये जातपंचायतीच्या बेकायदेशीर कारभाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील एका विवाहितेला न्यायालयाला डावलून जातपंचायतीने एकतर्फी घटस्फोट दिला असून तिला सामाजिक बहिष्काराची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतरही सातारा आणि इचलकरंजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे. जातपंचायतीच्या या अघोरी कारभाराविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून, दोषींवर तातडीने कारवाई करून पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा लढा सुरू असून या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. या लढ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संपूर्ण देशातून अन्न आणि पाण्याच्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे.1
- मुंबईमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले असून या वेळी आंदोलकांनी सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.1
- आचेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक शिवभक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे स्मारक शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.1
- जंतर-मंतरवर झालेल्या लाठीचार्जनंतर सध्या 'Thank You' ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण घटनेशी संबंधित एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमके काय आहे यावरून उत्सुकता निर्माण झाली असून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.1