आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला घटत्या लिंग गुणोत्तराचा गंभीर प्रश्न... ----------- पाटोदा (प्रतिनिधी) :- “ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जवळपास १५० तरुण लग्नासाठी तयार आहेत; पण मुली मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे सांगत बीड जिल्ह्यातील घटत्या लिंग गुणोत्तराचा धोकादायक प्रश्न आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ठामपणे उपस्थित केला. बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनकरीत्या घसरले होते. १००० पुरुषांमागे केवळ ६२८ मुली इतके कमी प्रमाण नोंदवले गेले होते. विशेषतः शिरूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात कमी असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, मुलींच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात सामाजिक संकट निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने तरुण लग्नासाठी तयार असतानाही त्यांना वधू मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून मुली आणून विवाह लावून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये फसवणूक होऊन अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणेही समोर येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात कठोरपणे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी सुरुवातीपासून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली. तसेच वर्षाताई देशपांडे आणि उपसभापती नीलमताई यांनी बीड जिल्ह्यात येऊन विशेषतः ऊसतोड कामगार महिलांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून या विषयावर अभ्यास केला होता, याचाही उल्लेख आमदार धस यांनी केला. समाजामध्ये मुलगी नकोशी अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळे लिंग गुणोत्तर चिंताजनक पातळीपर्यंत घसरले होते. मात्र शासन, सामाजिक संघटना आणि जनजागृतीमुळे आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला होता. मात्र त्या वेळी तो विषय विनोदाने घेतला गेला असल्याचे दिसले, असे नमूद करत आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागात हा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने यावर तातडीने कठोर आणि प्रभावी उपाय योजना करण्याची गरज आहे.
आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला घटत्या लिंग गुणोत्तराचा गंभीर प्रश्न... ----------- पाटोदा (प्रतिनिधी) :- “ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जवळपास १५० तरुण लग्नासाठी तयार आहेत; पण मुली मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे सांगत बीड जिल्ह्यातील घटत्या लिंग गुणोत्तराचा धोकादायक प्रश्न आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ठामपणे उपस्थित केला. बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनकरीत्या घसरले होते. १००० पुरुषांमागे केवळ ६२८ मुली इतके कमी प्रमाण नोंदवले गेले होते. विशेषतः शिरूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात कमी असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, मुलींच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात सामाजिक संकट निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने तरुण लग्नासाठी तयार असतानाही त्यांना वधू मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून मुली आणून विवाह लावून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये फसवणूक होऊन अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणेही समोर येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात कठोरपणे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी सुरुवातीपासून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली. तसेच वर्षाताई देशपांडे आणि उपसभापती नीलमताई यांनी बीड जिल्ह्यात येऊन विशेषतः ऊसतोड कामगार महिलांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून या विषयावर अभ्यास केला होता, याचाही उल्लेख आमदार धस यांनी केला. समाजामध्ये मुलगी नकोशी अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळे लिंग गुणोत्तर चिंताजनक पातळीपर्यंत घसरले होते. मात्र शासन, सामाजिक संघटना आणि जनजागृतीमुळे आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला होता. मात्र त्या वेळी तो विषय विनोदाने घेतला गेला असल्याचे दिसले, असे नमूद करत आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागात हा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने यावर तातडीने कठोर आणि प्रभावी उपाय योजना करण्याची गरज आहे.
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग1