आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला घटत्या लिंग गुणोत्तराचा गंभीर प्रश्न... ----------- पाटोदा (प्रतिनिधी) :- “ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जवळपास १५० तरुण लग्नासाठी तयार आहेत; पण मुली मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे सांगत बीड जिल्ह्यातील घटत्या लिंग गुणोत्तराचा धोकादायक प्रश्न आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ठामपणे उपस्थित केला. बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनकरीत्या घसरले होते. १००० पुरुषांमागे केवळ ६२८ मुली इतके कमी प्रमाण नोंदवले गेले होते. विशेषतः शिरूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात कमी असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, मुलींच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात सामाजिक संकट निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने तरुण लग्नासाठी तयार असतानाही त्यांना वधू मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून मुली आणून विवाह लावून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये फसवणूक होऊन अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणेही समोर येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात कठोरपणे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी सुरुवातीपासून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली. तसेच वर्षाताई देशपांडे आणि उपसभापती नीलमताई यांनी बीड जिल्ह्यात येऊन विशेषतः ऊसतोड कामगार महिलांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून या विषयावर अभ्यास केला होता, याचाही उल्लेख आमदार धस यांनी केला. समाजामध्ये मुलगी नकोशी अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळे लिंग गुणोत्तर चिंताजनक पातळीपर्यंत घसरले होते. मात्र शासन, सामाजिक संघटना आणि जनजागृतीमुळे आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला होता. मात्र त्या वेळी तो विषय विनोदाने घेतला गेला असल्याचे दिसले, असे नमूद करत आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागात हा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने यावर तातडीने कठोर आणि प्रभावी उपाय योजना करण्याची गरज आहे.
आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला घटत्या लिंग गुणोत्तराचा गंभीर प्रश्न... ----------- पाटोदा (प्रतिनिधी) :- “ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जवळपास १५० तरुण लग्नासाठी तयार आहेत; पण मुली मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे सांगत बीड जिल्ह्यातील घटत्या लिंग गुणोत्तराचा धोकादायक प्रश्न आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ठामपणे उपस्थित केला. बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनकरीत्या घसरले होते. १००० पुरुषांमागे केवळ ६२८ मुली इतके कमी प्रमाण नोंदवले गेले होते. विशेषतः शिरूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात कमी असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, मुलींच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात सामाजिक संकट निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने तरुण लग्नासाठी तयार असतानाही त्यांना वधू मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून मुली आणून विवाह लावून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये फसवणूक होऊन अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणेही समोर येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात कठोरपणे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी सुरुवातीपासून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली. तसेच वर्षाताई देशपांडे आणि उपसभापती नीलमताई यांनी बीड जिल्ह्यात येऊन विशेषतः ऊसतोड कामगार महिलांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून या विषयावर अभ्यास केला होता, याचाही उल्लेख आमदार धस यांनी केला. समाजामध्ये मुलगी नकोशी अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळे लिंग गुणोत्तर चिंताजनक पातळीपर्यंत घसरले होते. मात्र शासन, सामाजिक संघटना आणि जनजागृतीमुळे आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला होता. मात्र त्या वेळी तो विषय विनोदाने घेतला गेला असल्याचे दिसले, असे नमूद करत आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागात हा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने यावर तातडीने कठोर आणि प्रभावी उपाय योजना करण्याची गरज आहे.
- Balu MaskeBeed, Maharashtra🙏on 16 March
- Balu MaskeBeed, Maharashtra🙏on 16 March
- Post by Sanjhsuyog News Channel1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- Post by Sominath Kolhe1
- धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ### **उत्सवाची वैशिष्ट्ये:** * **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. * **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. * **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत. या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- 180 लड़कियां, 350 अश्लील वीडियो... 19 साल का मास्टरमाइंड अयान अहमद कौन है? महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया है, जहां एक 19 वर्षीय युवक पर नाबालिग लड़कियों का यौन शोषण करने और उनके वीडियो बनाकर ब्लैकमेल करने का आरोप है। इस मामले ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है और लोगों में भारी गुस्सा देखा जा रहा है। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच तेज कर दी गई है। पुलिस के अनुसार, आरोपी की पहचान अयान अहमद तनवीर अहमद के रूप में हुई है, जिसे मंगलवार को गिरफ्तार किया गया और 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजा गया है।1
- Post by Sominath Kolhe1