Shuru
Apke Nagar Ki App…
आज सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे वणीत आज सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे वणीत
वणी न्यूज एक्सप्रेस
आज सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे वणीत आज सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे वणीत
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- नागपूरच्या जिल्हा परिषद समोर रज्जु परिपगार आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार महाराष्ट्रातील 48 कर्मचारी सात महिन्यापासून मानधनापासून वंचित नागपुर न्यूज़ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण अधिकारी वर्ग ऐैकत नाही ! असा आरोप सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत लावला -रज्जु परिपगार महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील योजना ही 2017 पासून सुरू झाली. परंतु 6 सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय जीआर निघाला की, महिला बाल विकास विभाग योजनेत हस्तांतरण करण्यात आले. 1 एप्रिल 2025 पासून योजना अंमलात आली. 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मनुष्यबळ मंजूर झालेले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यानुसार 2023 मध्ये मनुष्यबळ राहणार नाही असे सुद्धा नमूद केले होते. राज्य शासनाने गेल्या 7 महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवले आहे म्हणून आरोग्य विभागाचे उदासीन धोरणामुळे मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, येथे दाद मागितली. माननीय उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 च्या कोर्ट आदेशानुसार समायोजन करावे. आणि 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ऐकून अधिकारी वर्गांना आदेश दिला व सांगितले. परंतु अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप रज्जु परिपगार यांनी पत्र परिषदेत लावला. जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हा सर्वांना 7 महिन्याचा पगार देणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करणार ! असे पत्रकारांना सांगितले. मा. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य सचिव समावेश समायोजन करावेत असे निर्देश दिले होते. त्यानंतर हैद्राबाद हाऊस सचिवालयात आशा पठाण यांना पत्र दिले. केंद्रीय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संदीप जोशी या सर्वांना यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु आम्हाला न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव घ्यावी लागली. कारण आम्ही आमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करू, कसे जगू, यासाठी हक्काचा पगार आम्हाला मिळावा व कार्यादेश देण्यात यावा. त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनवणी करीत आहे की, आमचा सात महिन्याचा पगार देण्यात यावा व कार्यादेश द्यावा असे सांगितले. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटुचे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि कॉस्ट्राईबचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, रज्जू परिपगार, पौर्णिमा गजभिये, संगीता वासेवार, निता दांडेकर, निलेश अडुळकर, कैलास खांडेकर आणि प्रिती मेश्राम यांची उपस्थिती होती.1
- शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध . भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया1
- जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"1
- Post by कु सुषमा डबराल1
- - नमो उद्याणास करण्यात आला विरोध - भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबिय २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्म सन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास त्यांनी विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात ही मागणी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by Dinesh kambli3