Shuru
Apke Nagar Ki App…
केदारखेडा शिवारात शेतकरी दिलीप भानुदास जाधव यांच्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत त्यांच्या ७ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक बैलजोडीसह इतर जनावरेही भाजल्याने जखमी झाली आहेत. आगीत गोठ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने बाधित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
Bharat 24Taas News
केदारखेडा शिवारात शेतकरी दिलीप भानुदास जाधव यांच्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत त्यांच्या ७ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक बैलजोडीसह इतर जनावरेही भाजल्याने जखमी झाली आहेत. आगीत गोठ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने बाधित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना स्थानिक गुन्हे शाखेने मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन वाहनांमधून एकूण रु.25,84,042/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.1
- मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.1
- देवस्थानांच्या जमिनी सुरक्षित राहिल्या तरच मंदिरे आणि धर्मकार्य सुरक्षित राहील, असा ठाम व स्पष्ट इशारा देत भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान आणि अष्टविनायक समितीसह पुणे पंचक्रोशीतील शेकडो प्रमुख देवस्थानांनी सरकारला लक्ष्य केले आहे. 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६' या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात पुण्यातून मंदिर विश्वस्तांनी थेट रणशिंग फुंकले आहे. या जाचक कायद्याला कडाडून विरोध करण्यासाठी आणि सरकारला वेळेत पावले उचलण्याची चेतावणी देण्यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने पुण्यात महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या. या कायद्याविरोधात पुढील २५ दिवसांत लाखो कायदेशीर हरकती नोंदवण्यासह, राज्यभर व्यापक स्वाक्षरी अभियान, प्रत्येक मंदिरात महाआरती, आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर 'घंटानाद आंदोलन' आणि गरज पडल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर 'महाआंदोलन' छेडण्याचा एकमुखाने निर्धार करत मंदिर विश्वस्तांनी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. तसेच लवकरच 'राज्यस्तरीय देवस्थान भूमी संरक्षक परिषद' आयोजित केली जाईल. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी हा लढा मंदिरांच्या अस्मितेचा असल्याचे सांगत, २ जून रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन राज्यभर आंदोलनाचा श्रीगणेशा केला जाईल, अशी सरकारला चेतावणी दिली आहे. पुण्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर (सारसबाग), खंडोबा मंदिर (आकुर्डी) आणि श्री सियाराम मंदिर, गोशाळा (हडपसर) येथे पार पडलेल्या या बैठकांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अधिवक्ता एस. के. जैन यांनी देवस्थानांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या जमिनी सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी या कायद्यामागील शासनाचा हेतू संशयास्पद वाटत असल्याचे सांगत विश्वस्तांना जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहन केले. रांजणगाव महागणपती देवस्थानचे विश्वस्त डॉ. तुषार पाटील पाचुंदकर यांनी अष्टविनायक मंदिरांचा या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला, तर भीमाशंकर देवस्थानचे अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी सेवाधाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली. या आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक मंदिरात जनजागृतीचे फलक लावून व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख विश्वस्त एकवटले आहेत. या बैठकांना भीमाशंकर देवस्थानचे कार्याध्यक्ष मधुकर गवांदे, प्रसाद गवांदे, ग्रामदैवत कसबा गणपतीच्या संगीताताई ठकार, भवानीपेठ पालखी मंदिराचे प्रमोद बेंगरूट, कानिफनाथ मंदिराचे ज्ञानोबा व सुरेश फडतरे, श्रीमंत सरदार खासगीवाले लिमये, निलेश वाळावे (शिरवळ), निवृत्ती बडदे (कोडीत), अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे वांजळे, जेजुरी मार्तंड देवस्थान व दगडूशेठ दत्त मंदिरचे अधिवक्ता थोरवे, आकुर्डी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर व उपाध्यक्ष पंढरीनाथ काळभोर, तसेच चतुःश्रृंगी देवस्थानचे ट्रस्टी आणि अधिवक्ता वृषाली दातार यांसह विधी व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- जालना जिल्ह्यातील सेवली येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. हे अभिवादन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले.1
- मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी वैभव ज्ञानदेव काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून या विद्यार्थिनीने भीतीपोटी चालू शैक्षणिक वर्षातील बारावीच्या शेवटच्या दोन परीक्षा देखील दिल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीचे लग्न ठरले होते. मात्र, आरोपी वैभव काळे याने लग्न ठरलेल्या युवकाला वारंवार फोन करून मुलीबाबत चुकीची माहिती दिली, ज्यामुळे हे लग्न मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतरही आरोपीने विद्यार्थिनीचा पाठलाग करणे, तिला त्रास देणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे सुरूच ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीच्या या सततच्या छळामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली गेली होती आणि याच भीतीमुळे तिने बारावीच्या शेवटच्या दोन परीक्षा न देता घरीच राहणे पसंत केले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तलवार फिरवत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी वेगाने हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1