रेल्वे स्थानक परिसरातील चर्मोद्योग कामगारांवर कारवाई करण्यास राष्ट्रीय चर्मकार संघाचा विरोध मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे स्थानकांच्या दिडशे मीटर परिघात ग्राहकांना तात्काळ सेवा पुरवणाऱ्या गटई चर्मोद्योग कामगारांवर मुंबई पालिकेकडून होत असलेल्या कारवाईस राष्ट्रीय चर्मकार संघाने तीव्र विरोध केला आहे. ही कारवाई पालिकेने ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. याबाबत योग्य ती माहिती घेऊन अशा कामगारांवर कारवाई न करण्याच्या सूचना पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जातील असे आश्वासन गगराणी यांनी बाबुराव यांना दिले आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भूषण गगराणी यांची महापालिकेत भेट घेऊन त्यांना गटई चर्मोद्योग कामगारांवरील कारवाई थांबवण्याबाबतचे एक निवेदन सादर केले. त्यात ही मागणी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात आपला पारंपारिक व्यवसाय करणारे गटई चर्मोद्योग कामगार हे फेरीवाले- हॉकर्स नाहीत. ते ग्राहकांच्या पादत्राणांची तात्काळ दुरुस्ती व सेवा करणारे कारागीर आहेत. ही वस्तूस्थिती आहे.याकडे बाबुराव माने यांनी आयुक्त भूषण गगराणी यांचे लक्ष वेधले. तसेच रेल्वे स्थानकांच्या परिसरात कारवाई करण्याबाबतचा न्यायालयाचा आदेश हा फेरीवाल्यांबाबत आहे.तो आदेश गटई चर्मोद्योग कामगारांबाबत नाही. चर्मोद्योग कामगार हे हॉकर्स नसून ते कोणत्याही वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत नाही..तर ते ग्राहकांची तुटलेली पादत्राणे दुरुस्ती करण्याचे त्यांच्या बूट-चप्पलचे पाॅलिश करण्याचे काम करीत असल्याने अशा गटई चर्मोद्योग कामगारांवर होत असलेली कारवाई ताबडतोब थांबवावी अशी जोरदार मागणी बाबुराव माने यांनी भूषण गगराणी यांच्याकडे केली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाबुराव माने यांच्यासोबत राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजेश खाडे,मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर,मुंबई प्रदेश महासचिव गणेश खिलारे,माजी अध्यक्ष राम कदम,मोहित मोरे, राहुल हजारे,अमर शिंदे, मिलिंद अगावणे आदी उपस्थित होते.
रेल्वे स्थानक परिसरातील चर्मोद्योग कामगारांवर कारवाई करण्यास राष्ट्रीय चर्मकार संघाचा विरोध मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे स्थानकांच्या दिडशे मीटर परिघात ग्राहकांना तात्काळ सेवा पुरवणाऱ्या गटई चर्मोद्योग कामगारांवर मुंबई पालिकेकडून होत असलेल्या कारवाईस राष्ट्रीय चर्मकार संघाने तीव्र विरोध केला आहे. ही कारवाई पालिकेने ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. याबाबत योग्य ती माहिती घेऊन अशा कामगारांवर कारवाई न करण्याच्या सूचना पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जातील असे आश्वासन गगराणी यांनी बाबुराव यांना दिले आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भूषण गगराणी यांची महापालिकेत भेट घेऊन त्यांना गटई चर्मोद्योग कामगारांवरील कारवाई थांबवण्याबाबतचे एक निवेदन सादर केले. त्यात ही मागणी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात आपला पारंपारिक व्यवसाय करणारे गटई चर्मोद्योग कामगार हे फेरीवाले- हॉकर्स नाहीत. ते ग्राहकांच्या पादत्राणांची तात्काळ दुरुस्ती व सेवा करणारे कारागीर आहेत. ही वस्तूस्थिती आहे.याकडे बाबुराव माने यांनी आयुक्त भूषण गगराणी यांचे लक्ष वेधले. तसेच रेल्वे स्थानकांच्या परिसरात कारवाई करण्याबाबतचा न्यायालयाचा आदेश हा फेरीवाल्यांबाबत आहे.तो आदेश गटई चर्मोद्योग कामगारांबाबत नाही. चर्मोद्योग कामगार हे हॉकर्स नसून ते कोणत्याही वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत नाही..तर ते ग्राहकांची तुटलेली पादत्राणे दुरुस्ती करण्याचे त्यांच्या बूट-चप्पलचे पाॅलिश करण्याचे काम करीत असल्याने अशा गटई चर्मोद्योग कामगारांवर होत असलेली कारवाई ताबडतोब थांबवावी अशी जोरदार मागणी बाबुराव माने यांनी भूषण गगराणी यांच्याकडे केली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाबुराव माने यांच्यासोबत राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजेश खाडे,मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर,मुंबई प्रदेश महासचिव गणेश खिलारे,माजी अध्यक्ष राम कदम,मोहित मोरे, राहुल हजारे,अमर शिंदे, मिलिंद अगावणे आदी उपस्थित होते.
- *सांस्कृतिक कलादर्पण च्या मराठी नाट्य महोत्सवाची अंतिम नाटकं जाहीर*. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २८ व्या" २०२६ च्या "सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार" सोहळ्यातील मराठी व्यावसायिक नाटक विभागातील स्पर्धेतील एकूण २२ नाटकांमधून अंतिम ५ नाटकांची "निवड मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सवात" जाहीर झाली आहेत.जाहीर झालेली नाटकं पुढील प्रमाणे आहेत. १) सविता दामोदर परांजपे २) फिल्टर कॉफी ३) ठरलंय Foreverr ४) गोष्ट तिच्या घटस्फोटाची ५) लागली पैज वरील नाटकांचा महोत्सव दिनांक १० ते १३ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. ◆दिनांक : १० मार्च रोजी , रात्रौ ८ वा. *सविता दामोदर परांजपे* हा प्रयोग हाऊसफ़ुल्ल गर्दीत संपन्न झाला... ◆ ११ मार्च रात्रौ ८ वा. *फिल्टर कॉफी* ◆ १२ मार्च रात्रौ ८ वा. *ठरलंय Foreverr* ◆ १३ मार्च दुपारी ४ वा. *गोष्ट तिच्या घटस्फोटाची* ◆ दिनांक १३ मार्च रात्रौ ८ वा. *सविता दामोदर परांजपे* या वेळे नुसार सादर होणार आहेत. व्यावसायिक नाटकांच्या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या शुभ हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे झाले .या वेळी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.. यंदाच्या व्यावसायिक नाट्य विभागाचे परिक्षणाचे काम रमेश मोरे, संकेत तांडेल,रविंद्र आवटी, अमित फाटक, चंद्रशेखर सांडवे आणि शिरीष घाग यांनी पाहिले तसेच प्रायोगिक नाटकाचे परीक्षणाचे काम मनोहर सरवणकर ,विकास मोजर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी पाहिले. वरील मराठी नाटकें दरवर्षी प्रमाणे यंदाही रसिक प्रेक्षकांना कमी दरात दर्जेदार नाटकं फक्त १००, २००, ३०० रुपयात पहायला मिळणार आहेत. नाटकाची बुकिंग बुक माय शो वर उपलब्ध असून फोन बुकिंगसाठी विकास मोजर ( 9594993031 ) यांच्याकडून तिकीट मिळतील असे संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी जाहीर केले आहे.1
- खौफनाक कदम। नवी मुंबई के वाशी खाड़ी पुल पर चलती ट्रेन से युवती ने पानी में लगाई छलांग।1
- Jogeshwari East ke ilake se yah bhikhari Paisa jama karke Jogeshwari West mein jakar sharab pita Hai....1
- देखिए कैसे सभी लोग मिलकर माँ की ज्योति जलाते हैं और कैसे अपने भीतर दिव्यता का आह्वान करते हैं, यह जरूरी धार्मिक अनुष्ठान कैसे नर को नारायण से जोड़ता है और आपके भीतर धार्मिक आस्था को जगाता है।1
- वाराणसी के भेलूपुर थाना अंतर्गत महमूरगंज चौकी का यह वारदात है एक सिपाही जो की महमूरगंज चौकी पर पोस्टेड है रात में एक एक्सीडेंट हुआ था जिसमें पब्लिक को गाली देते हुए नजर आया कहने पर बोला जो आपको करना है कर लीजिए हम किसी से नहीं डरते हमें वर्दी अपने मेहनत से मिली है ना कि पब्लिक से1
- मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली–गो अर्ली” सुविधा लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून महिलांना सन्मान, समान संधी आणि सुरक्षितता मिळेल असा समाज निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.आंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.सुनेत्रा पवार म्हणाल्या की कम अर्ली–गो अर्ली या सुविधेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचारी सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन काम सुरू करू शकतील.त्यांनी जितक्या मिनिटे लवकर काम सुरू केले.तितक्याच मिनिटे त्यांना संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली जाईल. या सुविधेमुळे महिलांना जास्तीत जास्त ३० मिनिटांपर्यंत सवलत मिळू शकणार आहे.या निर्णयामुळे पीक अवरच्या काळात महिलांना प्रवास करताना भेडसावणाऱ्या अडचणी कमी होतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.विधान परिषदेत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानताना त्यांनी सांगितले की महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण सूचना समोर आल्या असून सरकार त्या सकारात्मक दृष्टीने विचारात घेऊन आवश्यक पावले उचलणार आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान १४ मोहिमा राबविण्यात आल्या असून त्यातून राज्यभरातील ४२,५९४ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेद्वारे ५,०६६ महिला आणि २,७७१ मुलांचा शोध लावण्यात आला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत असून महिलांशी संबंधित प्रकरणांच्या निवारणासाठी ५१ भरोसा सेल स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याचे सांगताना त्यांनी लाडकी बहिण, नमो महिला सशक्तीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा आणि लखपती दीदी या योजनांचा उल्लेख केला.स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आले असून ही उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.आंगणवाडी सेविका, सहायिकांच्या मानधन तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील १७,२५४ आंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरीवली रेल्वे स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिला सरकारी कर्मचाऱ्यांना १८० दिवसांच्या प्रसूती रजेची मंजुरी देण्यात आली असून त्यानंतर आवश्यक असल्यास महिलांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय कमाल एक वर्षापर्यंत अर्ध्या वेतनावर रजा घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात चौथी महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गावे निर्माण करणे आणि मुलींचे शिक्षण टिकविणे हा त्याचा उद्देश आहे.महिलांचे सक्षमीकरण केवळ आर्थिक पातळीवर मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक सक्षमीकरण तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.जिजाबाई,सावित्रीमाई फुले, अहिल्याबाई होळकर,महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या प्रगतीसाठी पुढे जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- दूरदर्शन की पुरानी यादें 😮💨😔😥1
- मुंबई में गैस सिलेंडर न मिलने के कारण कितने. होटल बंद हो चुके हैं1