सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत इतर जिल्हा मार्ग क्रमांक ९६ चे काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांच्या सहकार्याने या रस्त्याच्या उभारणीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच या मार्गावरून वाहतूक पूर्णपणे सुरू होईल. कवठे एकंद पाणीपुरवठा जॅकवेल ते बिसूर या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे, तर जॅकवेल ते तासगाव या रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून तेही लवकरच पूर्ण होईल. तासगाव, कवठे एकंद, बेंद्री, शिरगाव कवठे, कावजी खोतवाडी येथून सांगलीकडे ये-जा करणारी वाहतूक या मार्गावरून सुरू झाली आहे. हे सर्वांच्या तळमळीचे आणि सहकार्याचे यश आहे. या मार्गामुळे प्रवाशांचे सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतर वाचणार असून, वाहनातील इंधनाचीही बचत होणार आहे, त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रस्ता तासगाव कॉलेजच्या मागील बाजूने बेंद्री रस्त्याला लागून सुरू होतो आणि उपाध्ये वस्तीमार्गे जुना सांगली रोड बिसूरमार्गे बुधगावच्या वरच्या जुन्या नाक्याजवळ पोहोचतो. हा मार्ग अत्यंत सुखकर असून शेतकऱ्यांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या मताप्रमाणे, रस्त्यांमुळेच अमेरिकेने प्रगती साधली, त्याच धर्तीवर आपणही रस्त्यांच्या बाबतीत सक्षम बनत चाललो आहोत. या मार्गाची लांबी सुमारे दहा ते बारा किलोमीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती असून, जवळपासच्या अंतर्गत गावांकडे जाणाऱ्या अनेक शेतरस्त्यांच्या बाबतीत तासगावच्या तहसीलदारांच्या आदेशानुसार लवकरच मोजणी व पुढील कामाला गती मिळेल अशी आशा आहे. या रस्त्याच्या उभारणीत अनेक अडथळे आले. श्री बाबा पाटणे (शेतकरी चळवळ) आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या टीममधील मा. सागर पाटील साहेब, मा. वाघमोडे साहेब, मा. महेश पाटील साहेब, वरिष्ठ अभियंता, अधिकारी आणि रस्त्याचे ठेकेदार यांचे काम कौतुकास्पद ठरले. हा संपूर्ण रस्ता काळ्या रानातून गेल्याने साध्या पावसाच्या झिरमाटीनेही चिखल व्हायचा आणि काम बंद पडायचे. ओढ्या-ओघळींच्या पाण्यामुळे अनेकदा समस्या निर्माण झाल्या. वासुंबे ओढ्यावरील अर्धवट बांधलेला पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला होता, ज्यामुळे सहा ते सात महिने काम बंद पडले होते आणि ये-जा करण्याचे मार्ग बंद झाले होते. नंतर हा पूल पुन्हा बांधण्यात आला, ज्यात वीस मोठ्या पाईपांचा वापर करण्यात आला आहे. पूर्वी हा जुना सांगली रस्ता देवबाभूळ व काट्याकुट्याच्या झुडपांनी वेढलेला होता, तसेच ट्रॅक्टरमुळे खोलवर चाकोऱ्या पडल्या होत्या आणि ओढ्यांच्या प्रवाहाने अनेक ठिकाणी सात-आठ फूट खड्डे पडले होते. तासगावपासून बिसूरपर्यंत अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते, ज्यामुळे ३३ फुटांचा रस्ता अनेक ठिकाणी आठ ते दहा फुटांवर आला होता, तर बिसूर कवठे एकंद हद्दीत केवळ पाऊलवाट उरली होती. अनेकांनी हे काम थांबवण्यासाठी कोर्टात जाण्याची धमकी दिली होती कारण त्यांना रस्त्याची हद्द मान्य नव्हती. मात्र, सकारात्मक विचारसरणीच्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तसेच अभियंत्यांनी घेतलेल्या कडक निर्णयामुळे अशा अनेक सकारात्मक आणि नकारात्मक अवस्थांमधून हे काम पूर्णत्वास गेले. सध्या बिसूर भागातील या रस्त्यास बाजूची पट्टी (साईडपट्टी) अपुरी पडत असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला होता. पुढारी, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रांनी आणि त्यांचे पत्रकार मा. प्रदीप पोतदार, मा. अमोल तुंगे, सकाळचे मा. शिरोटे, जनप्रवासचे मा. विनायक कदम, होनाई न्यूजचे मा. अधिकराव आबा लोखंडे, स्वराज्यचे अमोल कदम, प्रसाद वारे, अक्षय शिंदे यांनी या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कवठे एकंदचे मा. सरपंच राजेंद्र शिरोटे, सध्याचे सरपंच मा. कुलदीप शिरतोडे, बिसूरच्या सरपंच सौ. एल. टी. पाटील मॅडम, कावजी खोतवाडीच्या उपसरपंच सौ. सुनंदा मुळीक मॅडम, शिरगाव कवठेचे सरपंच श्री अनिल पाटील साहेब, कोळी साहेब, बेंद्रीचे मा. सरपंच विकास पाटील व सध्याच्या सरपंच सौ. पाटील मॅडम, श्री प्रकाश पाटील, मुकुंद परदेशी, कै. धनपाल उपाध्ये हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत इतर जिल्हा मार्ग क्रमांक ९६ चे काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांच्या सहकार्याने या रस्त्याच्या उभारणीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच या मार्गावरून वाहतूक पूर्णपणे सुरू होईल. कवठे एकंद पाणीपुरवठा जॅकवेल ते बिसूर या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे, तर जॅकवेल ते तासगाव या रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून तेही लवकरच पूर्ण होईल. तासगाव, कवठे एकंद, बेंद्री, शिरगाव कवठे, कावजी खोतवाडी येथून सांगलीकडे ये-जा करणारी वाहतूक या मार्गावरून सुरू झाली आहे. हे सर्वांच्या तळमळीचे आणि सहकार्याचे यश आहे. या मार्गामुळे प्रवाशांचे सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतर वाचणार असून, वाहनातील इंधनाचीही बचत होणार आहे, त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रस्ता तासगाव कॉलेजच्या मागील बाजूने बेंद्री रस्त्याला लागून सुरू होतो आणि उपाध्ये वस्तीमार्गे जुना सांगली रोड बिसूरमार्गे बुधगावच्या वरच्या जुन्या नाक्याजवळ पोहोचतो. हा मार्ग अत्यंत सुखकर असून शेतकऱ्यांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या मताप्रमाणे, रस्त्यांमुळेच अमेरिकेने प्रगती साधली, त्याच धर्तीवर आपणही रस्त्यांच्या बाबतीत सक्षम बनत चाललो आहोत. या मार्गाची लांबी सुमारे दहा ते बारा किलोमीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती असून, जवळपासच्या अंतर्गत गावांकडे जाणाऱ्या अनेक शेतरस्त्यांच्या बाबतीत तासगावच्या तहसीलदारांच्या आदेशानुसार लवकरच मोजणी व पुढील कामाला गती मिळेल अशी आशा आहे. या रस्त्याच्या उभारणीत अनेक अडथळे आले. श्री बाबा पाटणे (शेतकरी चळवळ) आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या टीममधील मा. सागर पाटील साहेब, मा. वाघमोडे साहेब, मा. महेश पाटील साहेब, वरिष्ठ अभियंता, अधिकारी आणि रस्त्याचे ठेकेदार यांचे काम कौतुकास्पद ठरले. हा संपूर्ण रस्ता काळ्या रानातून गेल्याने साध्या पावसाच्या झिरमाटीनेही चिखल व्हायचा आणि काम बंद पडायचे. ओढ्या-ओघळींच्या पाण्यामुळे अनेकदा समस्या निर्माण झाल्या. वासुंबे ओढ्यावरील अर्धवट बांधलेला पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला होता, ज्यामुळे सहा ते सात महिने काम बंद पडले होते आणि ये-जा करण्याचे मार्ग बंद झाले होते. नंतर हा पूल पुन्हा बांधण्यात आला, ज्यात वीस मोठ्या पाईपांचा वापर करण्यात आला आहे. पूर्वी हा जुना सांगली रस्ता देवबाभूळ व काट्याकुट्याच्या झुडपांनी वेढलेला होता, तसेच ट्रॅक्टरमुळे खोलवर चाकोऱ्या पडल्या होत्या आणि ओढ्यांच्या प्रवाहाने अनेक ठिकाणी सात-आठ फूट खड्डे पडले होते. तासगावपासून बिसूरपर्यंत अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते, ज्यामुळे ३३ फुटांचा रस्ता अनेक ठिकाणी आठ ते दहा फुटांवर आला होता, तर बिसूर कवठे एकंद हद्दीत केवळ पाऊलवाट उरली होती. अनेकांनी हे काम थांबवण्यासाठी कोर्टात जाण्याची धमकी दिली होती कारण त्यांना रस्त्याची हद्द मान्य नव्हती. मात्र, सकारात्मक विचारसरणीच्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तसेच अभियंत्यांनी घेतलेल्या कडक निर्णयामुळे अशा अनेक सकारात्मक आणि नकारात्मक अवस्थांमधून हे काम पूर्णत्वास गेले. सध्या बिसूर भागातील या रस्त्यास बाजूची पट्टी (साईडपट्टी) अपुरी पडत असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला होता. पुढारी, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रांनी आणि त्यांचे पत्रकार मा. प्रदीप पोतदार, मा. अमोल तुंगे, सकाळचे मा. शिरोटे, जनप्रवासचे मा. विनायक कदम, होनाई न्यूजचे मा. अधिकराव आबा लोखंडे, स्वराज्यचे अमोल कदम, प्रसाद वारे, अक्षय शिंदे यांनी या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कवठे एकंदचे मा. सरपंच राजेंद्र शिरोटे, सध्याचे सरपंच मा. कुलदीप शिरतोडे, बिसूरच्या सरपंच सौ. एल. टी. पाटील मॅडम, कावजी खोतवाडीच्या उपसरपंच सौ. सुनंदा मुळीक मॅडम, शिरगाव कवठेचे सरपंच श्री अनिल पाटील साहेब, कोळी साहेब, बेंद्रीचे मा. सरपंच विकास पाटील व सध्याच्या सरपंच सौ. पाटील मॅडम, श्री प्रकाश पाटील, मुकुंद परदेशी, कै. धनपाल उपाध्ये हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
- अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याभोवती लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. आपल्या नेत्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या प्रचंड गर्दीमुळे तेथील मोबाईल टॉवर काम करत नसल्याने सर्व मोबाईल नेटवर्कची रेंज पूर्णपणे गेलेली आहे. सध्या केवळ 'व्ही आय' या कंपनीची रेंज सुरू असल्याची माहिती मिळत आहे.1
- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाने मराठा समाजाला एससी-एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी भूमिका पूर्वीपासूनच घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली. मराठा समाजातील गरीब घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी अधोरेखित केले. मात्र, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणणे न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांच्याशी तातडीने बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आवाहन केले. यासोबतच, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी असे सांगत, मराठा-ओबीसी समन्वयासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास समिती स्थापन करण्याची तयारीही आठवले यांनी दर्शवली. दरम्यान, आठवले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. यासाठी त्यांनी विधान परिषदेची एक जागा आणि किमान दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी केली. याव्यतिरिक्त, बुद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजात शांतता आणि समन्वयाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, "आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे" असा संदेशही त्यांनी दिला.1
- इचलकरंजीतील टाकवडे वेस येथील घरफोडी प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ॲडव्होकेट रियाज बाणदार यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला, ज्यामुळे त्यांचा युक्तिवाद यशस्वी ठरला.1
- सातारा जिल्ह्यातील बावधन, ता. वाई येथील तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेणुका गुरुरंजितानायक पुणेकर यांना 'राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026' प्रदान करण्यात येणार आहे. महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना दिला जात आहे. सौ. रेणुका पुणेकर यांचे तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी, सामाजिक जनजागृतीसाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी असलेले कार्य प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे, जो समाजातील अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे फाऊंडेशनने म्हटले आहे. महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी सौ. रेणुका पुणेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या सामाजिक कार्याला भविष्यात अधिक यश, कीर्ती आणि सन्मान लाभो तसेच त्या असेच समाजहिताचे कार्य करत राहाव्यात, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.1
- अंतरवाली येथे मराठा समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला असून, कोणतीही परिस्थिती यापुढे सहन होणार नाही, अशी तीव्र भावना मराठ्यांमध्ये आहे.1
- आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, सीआयडी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीये, कारण त्यांच्यावर सरकार आणि गृह खात्याचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसते. या संदर्भात माहिती अधिकार (RTI) अर्जांनाही उत्तरे दिली जात नसल्याचे पवार यांनी नमूद केले. यामुळे आता स्वतः रोहित पवार आरटीआय अर्ज दाखल करणार आहेत. जर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर लवकरच एक व्हिडिओ समोर आणून 'या फोटोतील सॉली कोणाच्या गळ्यात आहेत' याचा खुलासा केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पवार यांच्या म्हणण्यानुसार, सीआयडीकडून योग्य तपासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे, कारण अजित दादांच्या प्रकरणात सीआयडीवर गृह खात्याचा दबाव आहे.1
- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- सांगलीतील माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावर, एलसीबी (लोकल क्राईम ब्रँच) पथकाने गावठी बनावटीची हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर फॅक्टरीच्या उत्तरेस ओढ्यात छापा टाकून ही धडक मोहीम राबवण्यात आली, ज्यात हातभट्टीचा संपूर्ण अड्डा जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान, ७५० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे दारूचे रसायन आणि इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच, २०० लिटर क्षमतेचे पाच लोखंडी बॅरल, डबे आणि कोळशाची पोती असा एकूण ३१,६५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी, रा. कंजारभाट वस्ती, कर्नाळ यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मोहिमेत अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, श्रीधर वाघमोडे आदी पोलिसांनी सहभाग घेतला.1