कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर..! नांदेड:- बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने समता परिषद कार्यालय, मयूर टॉकीज, नाईकनगर, नांदेड येथे आयोजित या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक प्रवीण जेठेवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील सहा हजार जातीना जोडून बहुजन समाजाची संकल्पना मांडणारे मान्यवर कांशीराम जी यांची प्रेरणा घेऊन "अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद" ही अराजकीय सामाजिक संघटना आपली वाटचाल सुरु ठेवणार आहे, याबद्दल सविस्तर विचारविनिमय या शिबिरातून करण्यात येणार आहे तसेच कांही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वेळेवर शिबीर सुरु होणार असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर..! नांदेड:- बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने समता परिषद कार्यालय, मयूर टॉकीज, नाईकनगर, नांदेड येथे आयोजित या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक प्रवीण जेठेवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील सहा हजार जातीना जोडून बहुजन समाजाची संकल्पना मांडणारे मान्यवर कांशीराम जी यांची प्रेरणा घेऊन "अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद" ही अराजकीय सामाजिक संघटना आपली वाटचाल सुरु ठेवणार आहे, याबद्दल सविस्तर विचारविनिमय या शिबिरातून करण्यात येणार आहे तसेच कांही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वेळेवर शिबीर सुरु होणार असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
- 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4
- Post by Nanded_71