अजब. प्रेमप्रकरणाची खळबळ चार मुलांची आई अन् दोन मुलांचा बाप पळून गेले केज तालुक्यात अनोख्या प्रेमप्रकरणाची खळबळ चार मुलांची आई अन् दोन मुलांचा बाप पळून गेले केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खेड्यात अत्यंत संवेदनशील घटना समोर आली आहे. २६ वर्षीय विवाहित महिला आपल्या चार मुलांची आई असताना, तीन मुलांना घरी सोडून एका लहान मुलासह घराशेजारी राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित तरुणासोबत पळून गेली आहे. ही महिला तिच्या तीन मुलांना घरात सोडून एका लहान मुलाला सोबत घेऊन गेली आहे. तरुण हा दोन मुलांचा बाप असून, दोघेही भावकीतील आहेत. प्रेमसंबंधातून दोघेही पळून गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी दोघांना बेपत्ता झाल्याची स्वतंत्र तक्रार युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे केज तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. दोघेही विवाहित असून, मुला-बाळांसह कुटुंबीयांची जबाबदारी असताना घडलेल्या या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरू युसुफवडगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोघांच्या मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
अजब. प्रेमप्रकरणाची खळबळ चार मुलांची आई अन् दोन मुलांचा बाप पळून गेले केज तालुक्यात अनोख्या प्रेमप्रकरणाची खळबळ चार मुलांची आई अन् दोन मुलांचा बाप पळून गेले केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खेड्यात अत्यंत संवेदनशील घटना समोर आली आहे. २६ वर्षीय विवाहित महिला आपल्या चार मुलांची आई असताना, तीन मुलांना घरी सोडून एका लहान मुलासह घराशेजारी राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित तरुणासोबत पळून गेली आहे. ही महिला तिच्या तीन मुलांना घरात सोडून एका लहान मुलाला सोबत घेऊन गेली आहे. तरुण हा दोन मुलांचा बाप असून, दोघेही भावकीतील आहेत. प्रेमसंबंधातून दोघेही पळून गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी दोघांना बेपत्ता झाल्याची स्वतंत्र तक्रार युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे केज तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. दोघेही विवाहित असून, मुला-बाळांसह कुटुंबीयांची जबाबदारी असताना घडलेल्या या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरू युसुफवडगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोघांच्या मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
- मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधीतील मराठी भाषणाची सोशल मीडियावर धूम किंवा मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा1
- सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू1
- बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर येथे एक महिना पुरेल एवढा धान्य व किराणा साठा भेट देत निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि आधाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले. गेल्या चार वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार, वयोवृद्ध, भिक्षा मागणारे आजी-आजोबा तसेच डिपेंडंट व्यक्तींसाठी निःस्वार्थपणे मोफत सेवा दिली जात आहे. अनेकांना जिथे स्वतःच्या कुटुंबाकडून आधार मिळत नाही, अशा वृद्धांसाठी हा आश्रम मायेची सावली बनला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, वाढदिवसावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजातील गरजू, निराधार आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी हातभार लावणे हीच खरी मानवसेवा आहे. संघर्ष, समर्पण, अभ्यास आणि माणुसकीचा अखंड वाहणारा झरा… म्हणजे अनिलभाऊ - प्रशांत ढोरे पाटील केमिस्ट विश्वातील लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर! काही व्यक्ती या केवळ व्यक्ती नसतात… त्या एक विचार असतात… एक प्रेरणा असतात… एक चळवळ असतात… आणि हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देणारं विद्यापीठ असतात…! केमिस्ट कोहिनूर अनिलभाऊ नावंदर हे असंच एक नाव… ज्यांचा उल्लेख झाला की संघर्षालाही बळ मिळतं, अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धैर्य निर्माण होतं आणि हजारो केमिस्ट बांधवांच्या डोळ्यात विश्वासाची नवी पहाट उगवते…! गेली अनेक दशके त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य केमिस्ट, फार्मासिस्ट आणि औषध व्यवसायाशी निगडित प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी समर्पित केलं आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात निर्भीड भूमिका घेत त्यांनी केमिस्ट चळवळीला नवं बळ दिलं. ई-फार्मसीविरोधातील संघर्ष असो किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कासाठीचा लढा प्रत्येक वेळी अनिलभाऊ खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या प्रत्येक शब्दात अभ्यासाची ताकद आहे… प्रत्येक भाषणात सत्याची धार आहे… प्रत्येक निर्णयात संघटनप्रेम आहे… आणि प्रत्येक कृतीत कार्यकर्त्यांविषयीची अपार आत्मीयता दडलेली आहे…! यावेळी केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे, सचिव विनोदजी नागवाणी, जिल्हा प्रतिनिधी सुनीलजी पारसकर, उपाध्यक्ष बद्रीभाऊ पानगोळे, जयंत शर्माजी, सुचित भराड, अभिमन्यू जगताप आदी उपस्थित होते. तसेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेसाठी समाजातील दात्यांनी पुढे येऊन भरीव मदत करावी, असे आवाहन केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी केले. तर कुठेही निराधार, बेघर वृद्ध, मुलं-मुली किंवा नातेवाईक असूनही सांभाळ केला जात नसलेल्या वृद्धांनी 8855850378 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.2
- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीच्या अनास्थेमुळे गावातील अनेक मूलभूत सोयीसुविधांची कामे रखडली असून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.4
- छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1