कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या 48 गुणवंत कामगारांचा जाहीर सत्कार करून गौरव करण्यात आला कामगार दिनानिमित्त महावितरणच्या ४८ गुणवंत कामगारांचा गौरव लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महावितरणच्या परिमंडल कार्यालयात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कामगार दिनानिमित्त आयोजित गुणवंत कामगार गौरव समारंभात ४८ तांत्रिक कामगारांचा सन्मान करण्यात आला. मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते ७ यंत्रचालक व ४१ तंत्रज्ञ कामगारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहाय्यक विधी अधिकारी श्रीकांत चेडे, उपव्यवस्थापक मासं प्रिया शितोळे, सहाय्यक अभियंता सुदर्शन बोळेगावे, निम्नस्तर लिपिक अमीत नाचणे तसेच स्वाभिमानी संघटनेचे प्रशांत खंडागळे उपस्थित होते. गौरव सोहळ्यात उल्लेखनीय वीजसेवा देत ग्राहकांमध्ये महावितरणची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये लातूर जिल्ह्यातील २०, बीड जिल्ह्यातील १५ तर धाराशीव जिल्ह्यातील १३ कामगारांचा समावेश होता. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी सांगितले की, बदलत्या वीजसेवा क्षेत्रात ग्राहकाभिमुख सेवा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातमुक्त व सुरक्षित सेवा देण्यासाठी सतर्क राहून काम करणे आवश्यक असून, वीजयंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीदरम्यान सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच महसूल वाढीसाठी वीजबिल वसुलीचे कार्यही तितक्याच जबाबदारीने पार पाडावे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र चुनारकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ कुसभागे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशोदा पालकर यांनी मानले.
कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या 48 गुणवंत कामगारांचा जाहीर सत्कार करून गौरव करण्यात आला कामगार दिनानिमित्त महावितरणच्या ४८ गुणवंत कामगारांचा गौरव लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महावितरणच्या परिमंडल कार्यालयात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कामगार दिनानिमित्त आयोजित गुणवंत कामगार गौरव समारंभात ४८ तांत्रिक कामगारांचा सन्मान करण्यात आला. मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते ७ यंत्रचालक व ४१ तंत्रज्ञ कामगारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहाय्यक विधी अधिकारी श्रीकांत चेडे, उपव्यवस्थापक मासं प्रिया शितोळे, सहाय्यक अभियंता सुदर्शन बोळेगावे, निम्नस्तर लिपिक अमीत नाचणे तसेच स्वाभिमानी संघटनेचे प्रशांत खंडागळे उपस्थित होते. गौरव सोहळ्यात उल्लेखनीय वीजसेवा देत ग्राहकांमध्ये महावितरणची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये लातूर जिल्ह्यातील २०, बीड जिल्ह्यातील १५ तर धाराशीव जिल्ह्यातील १३ कामगारांचा समावेश होता. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी सांगितले की, बदलत्या वीजसेवा क्षेत्रात ग्राहकाभिमुख सेवा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातमुक्त व सुरक्षित सेवा देण्यासाठी सतर्क राहून काम करणे आवश्यक असून, वीजयंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीदरम्यान सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच महसूल वाढीसाठी वीजबिल वसुलीचे कार्यही तितक्याच जबाबदारीने पार पाडावे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र चुनारकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ कुसभागे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशोदा पालकर यांनी मानले.
- Post by नागनाथ ससाने1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!1
- लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.1