जालना, दि. १५ सप्टेंबर २०२६ -* भारतीय जनता पार्टी जालना महानगर किसान मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे *भाजपा किसान मोर्चा जालना महानगर कार्यकारिणी जाहीर* *जिल्हाध्यक्षपदी सतीष सुधाकर केळकर यांची निवड* *जालना, दि. १५ सप्टेंबर २०२६ -* भारतीय जनता पार्टी जालना महानगर किसान मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ व प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे आणि आ.नारायण कुचे,माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या आदेशान्वये ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. नवनियुक्त कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी *मा. श्री. सतीष सुधाकर केळकर (मु.पो. वाघ्रूळ, ता.जि. जालना)* यांची निवड करण्यात आली असून उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे - *उपाध्यक्ष -* काकासाहेब रामभाऊ घुले (वखारी), सुभाष रामचंद्र भूतेकर (नाव्हा), गणेश सुखदेव शेवाळे (वरखेडा सिंदखेड), निवृत्ती सुखदेव लंके (लोंढेवाडी), बळीराम किसनराव शिंदे (अंतरवाला जा.), शिवाजी सर्जेराव गवारे (कुंभेफळ सु.), हरीभाऊ भास्करराव गोरे (भिलपुरी), योगेश्वर भगवान शिमगे (राममूर्ती) *सरचिटणीस -* महेश रामराव मुळे (सिंधीकाळेगाव), उद्धव परमेश्वर ढवळे (दरेगाव), सुशील गंगाधर बोर्डे (वाघ्रूळ), तुकाराम हरीचंद राठोड (सावंगी तांडा) *चिटणीस -* अशोक केशवराव वाघ (गोंदेगाव), कैलास आनंदराव सोळुंके (नंदापूर), गणेश कौराजी वाघमारे (गवळी पोखरी), विठ्ठल राधाकिसन इंदलकर (इंदलकरवाडी), गंगाधर कारभारी सिरसाठ (बोरखेडी), नवनाथ प्रल्हादराव मस्के (वरुड), कृष्णा तुकाराम खिल्लारे (पिरपिंपळगाव), जगदीश उत्तमराव खरात (वाघ्रूळ) *कोषाध्यक्ष -* तुषार शिवाजी गायकवाड (सोमनाथ ज.) *सदस्य -* महादूआप्पा सोनाआप्पा झारकंडे, हनुमान शिवाजी पडूळ, लक्ष्मण उत्तम राठोड, अशोक एकनाथ जाधव, छबुराव अबू राठोड, नारायण लक्ष्मण जाधव, बाबासाहेब श्रीधर शेळके, शिवशंकर अप्पासाहेब काळे, डॉ. तुकाराम कळकुंबे, संजय पोमा जाधव, सुखदेव तुळशीराम चांदगुडे, पंडीत आसाराम शिंदे, कृष्णा पांडुरंग शिंदे, विनायक बाबू पवार (पवार तांडा), कृष्णा हरीचंद्र इंगोले, सुरेश रावसाहेब एखंडे, प्रल्हादराव पाटील दांडाईत, श्रीराम वाघ, सतीष बाबासाहेब दाभाडे, प्रदीप हिम्मतराव देठे, दत्ता पाटील बागल, नानासाहेब देव्हडे, बाळू बाजीराव कावळे, अरुण शिवाजी गुळमंकर, उद्धव तुळशीराम डोंगरे, बाबुलाल हरदास चव्हाण, संजय भास्कर रंधवे, शिवाजी खरात, शिवाजी काशिनाथ जाधव, प्रभाकर सुखदेव घडलिंग, राजेश श्रीपत घोडके, श्रीराम वाघ, कृष्णा पांडुरंग शिंदे, मोतीराम लष्कर, कृष्णा रंगनाथ अंभोरे, अमोल कांताराव खांडेभराड एकूण 59 जणांच्या या कार्यकारिणीचा मुख्य उद्देश किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
जालना, दि. १५ सप्टेंबर २०२६ -* भारतीय जनता पार्टी जालना महानगर किसान मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे *भाजपा किसान मोर्चा जालना महानगर कार्यकारिणी जाहीर* *जिल्हाध्यक्षपदी सतीष सुधाकर केळकर यांची निवड* *जालना, दि. १५ सप्टेंबर २०२६ -* भारतीय जनता पार्टी जालना महानगर किसान मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ व प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे आणि आ.नारायण कुचे,माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या आदेशान्वये ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. नवनियुक्त कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी *मा. श्री. सतीष सुधाकर केळकर (मु.पो. वाघ्रूळ, ता.जि. जालना)* यांची निवड करण्यात आली असून उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे - *उपाध्यक्ष -* काकासाहेब रामभाऊ घुले (वखारी), सुभाष रामचंद्र भूतेकर (नाव्हा), गणेश सुखदेव शेवाळे (वरखेडा सिंदखेड), निवृत्ती सुखदेव लंके (लोंढेवाडी), बळीराम किसनराव शिंदे (अंतरवाला जा.), शिवाजी सर्जेराव गवारे (कुंभेफळ सु.), हरीभाऊ भास्करराव गोरे (भिलपुरी), योगेश्वर भगवान शिमगे (राममूर्ती) *सरचिटणीस -* महेश रामराव मुळे (सिंधीकाळेगाव), उद्धव परमेश्वर ढवळे (दरेगाव), सुशील गंगाधर बोर्डे (वाघ्रूळ), तुकाराम हरीचंद राठोड (सावंगी तांडा) *चिटणीस -* अशोक केशवराव वाघ (गोंदेगाव), कैलास आनंदराव सोळुंके (नंदापूर), गणेश कौराजी वाघमारे (गवळी पोखरी), विठ्ठल राधाकिसन इंदलकर (इंदलकरवाडी), गंगाधर कारभारी सिरसाठ (बोरखेडी), नवनाथ प्रल्हादराव मस्के (वरुड), कृष्णा तुकाराम खिल्लारे (पिरपिंपळगाव), जगदीश उत्तमराव खरात (वाघ्रूळ) *कोषाध्यक्ष -* तुषार शिवाजी गायकवाड (सोमनाथ ज.) *सदस्य -* महादूआप्पा सोनाआप्पा झारकंडे, हनुमान शिवाजी पडूळ, लक्ष्मण उत्तम राठोड, अशोक एकनाथ जाधव, छबुराव अबू राठोड, नारायण लक्ष्मण जाधव, बाबासाहेब श्रीधर शेळके, शिवशंकर अप्पासाहेब काळे, डॉ. तुकाराम कळकुंबे, संजय पोमा जाधव, सुखदेव तुळशीराम चांदगुडे, पंडीत आसाराम शिंदे, कृष्णा पांडुरंग शिंदे, विनायक बाबू पवार (पवार तांडा), कृष्णा हरीचंद्र इंगोले, सुरेश रावसाहेब एखंडे, प्रल्हादराव पाटील दांडाईत, श्रीराम वाघ, सतीष बाबासाहेब दाभाडे, प्रदीप हिम्मतराव देठे, दत्ता पाटील बागल, नानासाहेब देव्हडे, बाळू बाजीराव कावळे, अरुण शिवाजी गुळमंकर, उद्धव तुळशीराम डोंगरे, बाबुलाल हरदास चव्हाण, संजय भास्कर रंधवे, शिवाजी खरात, शिवाजी काशिनाथ जाधव, प्रभाकर सुखदेव घडलिंग, राजेश श्रीपत घोडके, श्रीराम वाघ, कृष्णा पांडुरंग शिंदे, मोतीराम लष्कर, कृष्णा रंगनाथ अंभोरे, अमोल कांताराव खांडेभराड एकूण 59 जणांच्या या कार्यकारिणीचा मुख्य उद्देश किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
- जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.1
- इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS बोरगाव सारवणी शाळा कार्यक्रमात मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचे धडाकेबाज भाषण | AQS NEWS1
- पाटोदा येथे भगवे वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला जनसागराचा महासागर, मुंबईकडे रवाना होण्याआधी ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन क्रेनच्या सहाय्याने ५० फुटी भव्य हार घालून संघर्ष योद्ध्याचे स्वागत एक मराठा-लाख मराठा च्या घोषणांनी पाटोदा दुमदुमले मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर लढाई लढण्यासाठी निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटोदा शहरात जंगी मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव पाटोदा शहरात लोटले होते. जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकेच डोके दिसत होते. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नसून, पाटोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, इतका प्रचंड जनसमुदाय एकाच ठिकाणी जमा झाला होता. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पाटोदा शहरात हा विराट जनसागर उसळला होता. क्रेनवरील भव्य हार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू दुपारच्या सुमारास पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हजारो युवकांनी डोक्यावर भगव्या टोप्या, कपाळावर भगवा टिळा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांवर, इमारतींच्या छतावर, टेरेसवर आणि क्रेनवर उभे राहून लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. या गर्दीच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली काळी-पांढरी फॉर्च्युनर गाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीच्या बॉनेटवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. गाडीवर उभे राहून मनोज जरांगे पाटील हात जोडून आणि हात उंचावून जनतेचे अभिवादन करत होते. पोलिसांना आणि स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते क्रेनच्या सहाय्याने घातलेला ५० फूट लांबीचा भव्य हार! एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा अवाढव्य फुलांचा हार जरांगे पाटलांच्या दिशेने खाली आणण्यात आला. हा हार गळ्यात पडताच उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. प्रत्येक ठिकाणी जनसागराचा महासागर मनोज जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे. मराठा आरक्षणासाठी ते जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे जनसागराचा महासागर होत आहे. अंतरवाली सराटी पासून मुंबई पर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक प्रवासात असेच लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर येत आहेत. पाटोदा येथे झालेला हा सत्कार म्हणजे केवळ स्वागत नव्हते, तर मराठा समाजाने दाखवलेले ऐक्य आणि ताकदीचे शक्ती प्रदर्शन होते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, या जरांगे पाटलांच्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला होता. या विराट जनसागराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाटोदा येथून हा जंगी सत्कार स्वीकारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो गाड्यांच्या ताफ्यासह आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.1
- भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.* *उपोषणकर्ते रामा जाधव यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच “ग्रामपंचायतीचा लिलाव करून माझे मानधन द्या” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.*1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च1
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1