साई भक्तांकडून साईबाबांच्या पवित्र धुनीसाठी १००० गावरान गोवऱ्यांचे अर्पण; पुणे येथील भक्तांचा सन्मान पाथरी (प्रतिनिधी) : शहरातील साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे सोमवार (दि. ९ मार्च) रोजी साई भक्तांनी श्रद्धेने पवित्र धुनीसाठी गावरान गोवऱ्यांचे अर्पण केले. पुणे येथील साई भक्त श्रीमती उषा अनंतराव घोटणकर व श्रीमती मिना संजय राव देशपांडे यांनी साईबाबा यांच्या पवित्र धुनीसाठी प्रत्येकी ५०० अशा एकूण १००० गावरान गाईच्या गोवऱ्या अर्पण केल्या. या भक्तीपूर्ण अर्पणाबद्दल मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने मंदिर अधीक्षक सौ. छाया कुलकर्णी यांच्या हस्ते दोन्ही साई भक्तांचा शाल, श्रीफळ व साईबाबांच्या पवित्र धुनीतील उदी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर अधीक्षक सौ. छाया कुलकर्णी यांनी सांगितले की, द्वारकामाई येथे साईबाबांचे वास्तव्य होते. त्यांच्या समोर अखंड धुनी प्रज्वलित असायची. त्या धुनीतील पवित्र उदी साईबाबा भक्तांना देत असत. या उदीमुळे आजार तसेच विविध प्रापंचिक अडचणी दूर होतात, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. आजही साई भक्त पाथरी येथील प्रतिकात्मक द्वारकामाई असलेल्या धुनीमध्ये लाकूड, गावरान गाईच्या गोवऱ्या व श्रीफळ अर्पण करून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. साईकृपेने त्या पूर्ण होतात, अशी भावना भक्तांमध्ये आहे. याबाबत अधिक माहिती देताना साईबाबा जन्मस्थान मंदिराचे कार्यकारी अधिकारी मुकुंद दिनकरराव चौधरी यांनी सांगितले की, देशभरातून येणारे साई भक्त येथे धुनीसाठी विविध प्रकारे अर्पण करून साईबाबांप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात.
साई भक्तांकडून साईबाबांच्या पवित्र धुनीसाठी १००० गावरान गोवऱ्यांचे अर्पण; पुणे येथील भक्तांचा सन्मान पाथरी (प्रतिनिधी) : शहरातील साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे सोमवार (दि. ९ मार्च) रोजी साई भक्तांनी श्रद्धेने पवित्र धुनीसाठी गावरान गोवऱ्यांचे अर्पण केले. पुणे येथील साई भक्त श्रीमती उषा अनंतराव घोटणकर व श्रीमती मिना संजय राव देशपांडे यांनी साईबाबा यांच्या पवित्र धुनीसाठी प्रत्येकी ५०० अशा एकूण १००० गावरान गाईच्या गोवऱ्या अर्पण केल्या. या भक्तीपूर्ण अर्पणाबद्दल मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने मंदिर अधीक्षक सौ. छाया कुलकर्णी यांच्या हस्ते दोन्ही साई भक्तांचा शाल, श्रीफळ व साईबाबांच्या पवित्र धुनीतील उदी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर अधीक्षक सौ. छाया कुलकर्णी यांनी सांगितले की, द्वारकामाई येथे साईबाबांचे वास्तव्य होते. त्यांच्या समोर अखंड धुनी प्रज्वलित असायची. त्या धुनीतील पवित्र उदी साईबाबा भक्तांना देत असत. या उदीमुळे आजार तसेच विविध प्रापंचिक अडचणी दूर होतात, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. आजही साई भक्त पाथरी येथील प्रतिकात्मक द्वारकामाई असलेल्या धुनीमध्ये लाकूड, गावरान गाईच्या गोवऱ्या व श्रीफळ अर्पण करून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. साईकृपेने त्या पूर्ण होतात, अशी भावना भक्तांमध्ये आहे. याबाबत अधिक माहिती देताना साईबाबा जन्मस्थान मंदिराचे कार्यकारी अधिकारी मुकुंद दिनकरराव चौधरी यांनी सांगितले की, देशभरातून येणारे साई भक्त येथे धुनीसाठी विविध प्रकारे अर्पण करून साईबाबांप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात.
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- Post by Ramesh Mulgir1
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी1