घरगुती कारणातून वाद; मारहाणीत एकाचा मृत्यू दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघांना अटक नातेवाईकांकडे ठेवलेली भांडी परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आव्हाळवाडी येथे घडली. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. भास्कर मोहन राठोड (वय ५८, सध्या रा. आव्हाळवाडी, मूळ जिंतूर, परभणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आनंद रवींद्र वर्मा (वय २६) व मालुबाई उर्फ शीला आनंद वर्मा (वय २४, दोघे रा. आव्हाळवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत श्रावण भास्कर राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी परिसरात राठोड यांनी भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. त्यांच्या शेजारी त्यांचे साडू असलेले वर्मा दाम्पत्य राहत होते. वर्मा दाम्पत्याकडे ठेवलेली भांडी परत मागितल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला. आरोपी दाम्पत्याने राठोड यांना डोक्यावर व पोटात जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या राठोड यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
घरगुती कारणातून वाद; मारहाणीत एकाचा मृत्यू दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघांना अटक नातेवाईकांकडे ठेवलेली भांडी परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आव्हाळवाडी येथे घडली. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. भास्कर मोहन राठोड (वय ५८, सध्या रा. आव्हाळवाडी, मूळ जिंतूर, परभणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आनंद रवींद्र वर्मा (वय २६) व मालुबाई उर्फ शीला आनंद वर्मा (वय २४, दोघे रा. आव्हाळवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत श्रावण भास्कर राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी परिसरात राठोड यांनी भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. त्यांच्या शेजारी त्यांचे साडू असलेले वर्मा दाम्पत्य राहत होते. वर्मा दाम्पत्याकडे ठेवलेली भांडी परत मागितल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला. आरोपी दाम्पत्याने राठोड यांना डोक्यावर व पोटात जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या राठोड यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
- शिक्षा सस्ता करने की मांग1
- रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.1
- गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवात त्यांचे बालरूप असलेला पाळणा झुलवला, याप्रसंगी जिजाऊंच्या लेकींनी मायेने पाळणा गायला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- घोटावडे वरून मुठा आणि पुढे पानशेत रोड ओसाडे असा रिंग रोड वरदाडे गाव आणि पुढे सिंहगड घेरा जवळून कल्याण2
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहेत्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशञ करण्यात आला आहे ासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची डाक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1
- पुण्यातील बिगवन परिसरातील1
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1