Shuru
Apke Nagar Ki App…
मनोज जरांगे पाटील यांनी 'ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पोरांना मारताय' असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
मनोज जरांगे पाटील यांनी 'ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पोरांना मारताय' असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात 'देवेंद्र जन्मोत्सव हरित महोत्सव' अंतर्गत हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील १ लाख वृक्षांची लागवड ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. हा हरित सप्ताह संजय केणेकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत चालणारा हा उपक्रम म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची हरित भेट असेल, अशी माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.2
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील केळगाव मुर्डेश्वर डोंगरात अमरकंद या फळाची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील माहिती डॉक्टर संतोष पाटील यांनी वन विभागाला दिली होती. माहिती मिळताच वन विभागाने कारवाई करत तीन तरुणांना अटक केली आणि त्यांच्याकडून अमरकंद जप्त केले. यानंतर सिल्लोड वनविभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या या अमरकंद फळाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.1
- जालना येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. उपवर्गीकरणाच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आंबेडकरी समाज या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आला आहे.1
- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या CJP आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रसंगी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना सर्वांनी पूर्ण शांतता व संयम राखून लोकशाही मार्गानेच आपला हा लढा पुढे सुरू ठेवावा, असे आवाहन केले.1
- जालन्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत आंबेडकरी समाजाने या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आपला लढा पुकारला आहे.1
- खुलताबाद येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लेणी क्रमांक २९ मधील प्रसिद्ध 'सीता न्हाणी' धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याच्या प्रवाही जलधारेमुळे संपूर्ण परिसर अत्यंत नयनरम्य बनला असून येथे पर्यटकांना मनमोहक दृश्य अनुभवायला मिळत आहे. हिरवागार निसर्ग, दगडी लेणी आणि कोसळणारा धबधबा यामुळे वेरूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. पावसाळ्यातील हे रमणीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मारहाण झाल्यास किंवा त्यांना मारल्यास महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) एकाही नेत्याला फिरू दिले जाणार नाही, असा कडक आणि थेट इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही कारवाई खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट करत जरांगे यांनी भाजप नेत्यांना संपूर्ण राज्यात फिरण्यापासून रोखण्याचा इशारा दिला आहे.1