पाळधीत धाडसी चोरी; ४.५ तोळे सोने व दीड लाखांची रोकड लंपास पाळधी (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४.५ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर परिसरात राहणारे सुरेश तुकाराम पाटील हे मंगळवारी (१० मार्च) सकाळी काही कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली. बुधवारी (११ मार्च) सकाळी सुमारे ७ वाजता सुरेश पाटील अमळनेर येथून घरी परतले असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता कपाटातील साडेचार तोळे सोने व सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपास पाळधी पोलीस करीत आहेत.
पाळधीत धाडसी चोरी; ४.५ तोळे सोने व दीड लाखांची रोकड लंपास पाळधी (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४.५ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर परिसरात राहणारे सुरेश तुकाराम पाटील हे मंगळवारी
(१० मार्च) सकाळी काही कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली. बुधवारी (११ मार्च) सकाळी सुमारे ७ वाजता सुरेश पाटील अमळनेर येथून घरी परतले असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर
कपाट अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता कपाटातील साडेचार तोळे सोने व सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपास पाळधी पोलीस करीत आहेत.
- धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- #marathi#newsjalna#1
- धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली.1