Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यात धक्कादायक प्रकार! देवपूर अमरधाममधून राख चोरी; सोन्यासाठी चोरीचा संशय धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Dhule News 24
धुळ्यात धक्कादायक प्रकार! देवपूर अमरधाममधून राख चोरी; सोन्यासाठी चोरीचा संशय धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- Post by Kishor k Patil Patil2
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली.1