Shuru
Apke Nagar Ki App…
सततधार पावसामुळे ईसापुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरण आता 60 टक्के भरले, संततधार पावसामुळे ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने विविध नद्या व नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत आहे. दि.1 ऑगष्ट रोजी सकाळी 6 वाजेच्या अहवालानुसार ईसापूर धरणात 573.55 दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला असून तो 59.49 टक्के इतका आहे. ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. पाऊस अशीच साथ देत राहिल्यास आगामी काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. इसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने भविष्यातील मोठी चिंता दूर होणार आहे.
Shankar mulgir
सततधार पावसामुळे ईसापुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरण आता 60 टक्के भरले, संततधार पावसामुळे ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने विविध नद्या व नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत आहे. दि.1 ऑगष्ट रोजी सकाळी 6 वाजेच्या अहवालानुसार ईसापूर धरणात 573.55 दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला असून तो 59.49 टक्के इतका आहे. ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. पाऊस अशीच साथ देत राहिल्यास आगामी काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. इसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने भविष्यातील मोठी चिंता दूर होणार आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!1
- अमरावतीत वाढत्या अवैध वाहतुकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; दोषी RTO निलंबनाची मागणी1
- जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.1
- Daryapur Robbery | दर्यापूरात Gun Point वर सराफा दुकानावर धाडसी दरोडा! दर्यापूर शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स येथे अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 👉 अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Lok Najar News ला Like 👍 Share ↗️ Comment 💬 आणि Follow/Subscribe 🔔 नक्की करा.1