बांधकाम कामगार लाभार्थी निवडीसाठी १५ मे रोजी पाथरीत बैठक परभणी (प्रतिनिधी): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांच्या निवडीसाठी १५ मे रोजी पाथरी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेश विटेकर यांनी दिली. पाथरी विधानसभा मतदारसंघातील (पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी) बांधकाम कामगारांसाठी स्थानिक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, या समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी राजेश विटेकर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.मंडळाच्या निर्देशानुसार समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांच्या अर्जांची छाननी करून त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समितीची पहिली बैठक परभणी येथील जिल्हा बांधकाम अधिकारी कार्यालयात पार पडली.दरम्यान, पाथरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांच्या अंतिम निवडीसाठी १५ मे रोजी पाथरी येथे समितीची मंजुरी बैठक होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बांधकाम कामगारांनी १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही विटेकर यांनी केले आहे.या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेश विटेकर, सदस्य सचिव तात्याराव कराड, सदस्य विकास वडकर, रवी परांडे, सौ. रागिणी गोपाल सुरवसे, विठ्ठल घाडगे तसेच नोंदणी अधिकारी सौदागर, पारखे आदी उपस्थित होते.
बांधकाम कामगार लाभार्थी निवडीसाठी १५ मे रोजी पाथरीत बैठक परभणी (प्रतिनिधी): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांच्या निवडीसाठी १५ मे रोजी पाथरी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेश विटेकर यांनी दिली. पाथरी विधानसभा मतदारसंघातील (पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी) बांधकाम कामगारांसाठी स्थानिक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, या समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी राजेश विटेकर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.मंडळाच्या निर्देशानुसार समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांच्या अर्जांची छाननी करून त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू
करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समितीची पहिली बैठक परभणी येथील जिल्हा बांधकाम अधिकारी कार्यालयात पार पडली.दरम्यान, पाथरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांच्या अंतिम निवडीसाठी १५ मे रोजी पाथरी येथे समितीची मंजुरी बैठक होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बांधकाम कामगारांनी १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही विटेकर यांनी केले आहे.या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेश विटेकर, सदस्य सचिव तात्याराव कराड, सदस्य विकास वडकर, रवी परांडे, सौ. रागिणी गोपाल सुरवसे, विठ्ठल घाडगे तसेच नोंदणी अधिकारी सौदागर, पारखे आदी उपस्थित होते.
- Post by Today One Live1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by M B B1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1