वृषाली गावंडे खून प्रकरण सीबीआय चौकशीची मागणी मुर्तक वृषाली गावंडे यांचे भाऊ सुमित जोशी यांची प्रशासनाकडे मागणी वृषाली गावंडे खून प्रकरणात सी.बी.आय.चौकशीची मागणी मृतक वृषाली गावंडे यांचे भाऊ सुमित डोसे यांची प्रशासनाकडे मागणी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातोडा येथील रहिवाशी शिक्षिका हिची हत्या ही काळजाला भिडणारी अशी घटना होळीच्या सणाच्या दिवशी घडली.. मृतक वृषाली गावंडे यांचा बनावट पद्धतीच्या अपघातातुन तिच्या पतीने सहकार्याचे मदतीने तिची हत्या घडून आणली ... या पूर्वनियोजित कटामध्ये आणखी अनेक आरोपी सहभागी असण्याची शक्यता मृतकेचे भाऊ सुमित डोसे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी मृतक वृषाली गावंडे या शिक्षिकेचा तिच्या पतीनेचे कटकारस्थान रचून खून केल्याची धक्कदायक घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ मार्च रोजी घडली होती.... या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे... परंतु या पूर्व नियोजित कटामध्ये या व्यतिरिक्त आणखीही काही आरोपींचा सहभाग असल्याचा व मृतक वृषाली गावंडे यांच्या पतीने इतर आरोपी यांना दिलेल्या सुपारीच्या रक्कम ही एक लाख पासून दहा लाख असल्याचा आरोप मृतक शिक्षिकेचा भाऊ सुमित डोसे यांनी केला आहे... त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी डोसे यांनी प्रशासनाकडे केली आहे.... पाहूयात मृतक वृषाली गावंडे यांचा भाऊ सुमित डोसे यांनी यांनी दिलेली प्रतिक्रिया
वृषाली गावंडे खून प्रकरण सीबीआय चौकशीची मागणी मुर्तक वृषाली गावंडे यांचे भाऊ सुमित जोशी यांची प्रशासनाकडे मागणी वृषाली गावंडे खून प्रकरणात सी.बी.आय.चौकशीची मागणी मृतक वृषाली गावंडे यांचे भाऊ सुमित डोसे यांची प्रशासनाकडे मागणी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातोडा येथील रहिवाशी शिक्षिका हिची हत्या ही काळजाला भिडणारी अशी घटना होळीच्या सणाच्या दिवशी घडली.. मृतक वृषाली गावंडे यांचा बनावट पद्धतीच्या अपघातातुन तिच्या पतीने सहकार्याचे मदतीने तिची हत्या घडून आणली ... या पूर्वनियोजित कटामध्ये आणखी अनेक आरोपी सहभागी असण्याची शक्यता मृतकेचे भाऊ सुमित डोसे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी मृतक वृषाली गावंडे या शिक्षिकेचा तिच्या पतीनेचे कटकारस्थान रचून खून केल्याची धक्कदायक घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ मार्च रोजी घडली होती.... या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे... परंतु या पूर्व नियोजित कटामध्ये या व्यतिरिक्त आणखीही काही आरोपींचा सहभाग असल्याचा व मृतक वृषाली गावंडे यांच्या पतीने इतर आरोपी यांना दिलेल्या सुपारीच्या रक्कम ही एक लाख पासून दहा लाख असल्याचा आरोप मृतक शिक्षिकेचा भाऊ सुमित डोसे यांनी केला आहे... त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी डोसे यांनी प्रशासनाकडे केली आहे.... पाहूयात मृतक वृषाली गावंडे यांचा भाऊ सुमित डोसे यांनी यांनी दिलेली प्रतिक्रिया
- User5955Ramtek, Nagpur🙏on 23 March
- Rashid PardesiMhasla, Raigad😤on 22 March
- User9528Maharashtra😡on 19 March
- ओ़छतIndia🤝on 19 March
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1
- Post by Shivaji Bhosale1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ बदनापूर (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.2
- *चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या आणि भाजपसोबतच्या चर्चांवर अत्यंत परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते, त्या सर्व चर्चांचा बोंद्रे यांनी आज समाचार घेतला. राहुल बोंद्रे म्हणाले की, भाजपची देशभरात एकच 'पॉलिसी' आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल सतत वावड्या उठवायच्या, चर्चा चालू ठेवायची आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करून त्यांना पक्षात ओढायचे. ही एक 'सोची समझी साजिश' (ठरवून केलेला कट) असल्याचे त्यांनी म्हटले आहे. *संजय गायकवाड यांच्या भेटीचे सत्य:* संजय गायकवाड यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी देवीची यात्रा होती आणि ते केवळ पाहुणे म्हणून घरी आले होते. यात्रेत हवशे-नवशे आणि नवस फेडणारे सर्वच येतात. या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. चिखलीची ही परंपरा आहे की आम्ही राजकारण केवळ निवडणुकीपुरते करतो, एरवी एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागतोनगरपालिका निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत बोंद्रे म्हणाले की, भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी काँग्रेसने १३ जागा जिंकून त्यांना तोडीस तोड टक्कर दिली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही काँग्रेस तिथे पाय रोवून उभी आहे, हे भाजपला सहन होत नाहीये. म्हणूनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना चिखलीत बोलावले जात असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीशेवटी, जर कोणी भाजपला कमजोर करण्यासाठी प्रस्ताव देत असेल तर त्याचे स्वागत आहे, परंतु आम्ही काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठीच काम करत राहू, असा विश्वास राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस1