पालघर-ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन महिन्यांपासून पोषण आहार बंद; श्रमजीवी संघटनेची मुख्यमंत्रींकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी शहापूर : पालघर व ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जून-जुलै २०२६ या दोन महिन्यांपासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धान्य, कडधान्य, खाद्यतेल तसेच स्वयंपाकासाठीचा निधी (कुकिंग कॉस्ट) उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचा पोषण आहार पूर्णपणे ठप्प झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत श्रमजीवी संघटना-महाराष्ट्रने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने पोषण आहारासाठी आवश्यक निधी व साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये पुरवठा झालेला नाही. परिणामी ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांचा पोषण आहार खंडित झाला असून त्याचा त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै २०२६ रोजी शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून "रिकाम्या ताटल्यांसह ताटली मोर्चा" काढून शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनास लक्ष्मण चौधरी - जिल्हा उपाध्यक्ष मालु हुमणे - तालुका अध्यक्ष विशाल मुकणे - तालुका उपाध्यक्ष रुपेश आहिरे - तालुका उपाध्यक्ष कैलास घाटाळ - तालुका उपाध्यक्ष प्रकाश खोडका - तालुका सचिव कमलाकर शिंदे - कार्यालय सचिव कैलास मुकणे - संघटक संजय मुकणे - कातकरी प्रमुख एकनाथ वाघ - युवक प्रमुख सुरेखा गोडे - महिला प्रमुख हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
पालघर-ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन महिन्यांपासून पोषण आहार बंद; श्रमजीवी संघटनेची मुख्यमंत्रींकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी शहापूर : पालघर व ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जून-जुलै २०२६ या दोन महिन्यांपासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धान्य, कडधान्य, खाद्यतेल तसेच स्वयंपाकासाठीचा निधी (कुकिंग कॉस्ट) उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचा पोषण आहार पूर्णपणे ठप्प झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत श्रमजीवी संघटना-महाराष्ट्रने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने पोषण आहारासाठी आवश्यक निधी व साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये पुरवठा झालेला नाही. परिणामी ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांचा पोषण आहार खंडित झाला असून त्याचा त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै २०२६ रोजी शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून "रिकाम्या ताटल्यांसह ताटली मोर्चा" काढून शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनास लक्ष्मण चौधरी - जिल्हा उपाध्यक्ष मालु हुमणे - तालुका अध्यक्ष विशाल मुकणे - तालुका उपाध्यक्ष रुपेश आहिरे - तालुका उपाध्यक्ष कैलास घाटाळ - तालुका उपाध्यक्ष प्रकाश खोडका - तालुका सचिव कमलाकर शिंदे - कार्यालय सचिव कैलास मुकणे - संघटक संजय मुकणे - कातकरी प्रमुख एकनाथ वाघ - युवक प्रमुख सुरेखा गोडे - महिला प्रमुख हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
- केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे3
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS1
- अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"? अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"?1
- शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan1
- मुम्ब्रा के शिमला पार्क पर टीम नजीब मुल्ला की मेहनत लाई रंग लगा ट्रैफिक सिग्नल क्या बोले पदाधिकारी.1
- श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.1