धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवून जयंती साजरा करावे.- सपोनी.शिंदे कुंडलवाडी प्रतिनिधी महा पुरूषांचे कार्य महान आहे.त्यांचे योगदान फार मोठे आहे.त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.जयंती मंडळांनी जयंती साजरा करतांना जबाबदारीने पुढे जायचे आहे.पारंपारिक वाद्याचा वापर करून डि.जे मुक्त वातावरणात जयंती साजरा करायत धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवा असे दि.14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.11 एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलिस ठाणे सभागृहात आयोजित शांतता समितीचा बैठकीत सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित जयंती मंडळांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे होते.प्रमुख अथिती नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,पोउनी.गजेंद्र मांजरमकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,पोलिस ठाणे हद्दीत 26 गावे आणि कुंडलवाडी शहराचा समावेश आहे.त्यापैकी 14 गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते.रासह नव्याने ईतर गावात जयंती साजरा करायचे असेल तर धर्मदाय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून परवांगी घ्यावे.जयंतीत डि.जे मुक्त,पारंपारिक वाद्याचा वापर करून साजरा करावे.जयंतीत रक्तदान,संस्कृत कार्यक्रम,तसेच गावातील होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून मदत,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यांना सहाय्य करावे.यातून धार्मिक सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.ज्या जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबून जयंती साजरा करतील अशा मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देवेन सन्मान सत्कार करण्यात येईल. जयंती मिरवणूकीत दारूपिऊन गोंधळ घालणा-यावर मंडळांनी नजर ठेवावे.ज्या पद्धतीने जयंती मंडळाची तयारी चालू आहे.तशाच पद्धतीत पोलिस प्रशासनाची सुद्धा प्रत्येक मंडळाची माहिती जमाकरणे चालू आहे.कोबिंग ऑपरेशन तसेच रात्री अपरात्री संशयित व्यक्ती आढळताच त्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येणार.तसेच पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले,पोलिस पाटील गाव सोडून कुठेच जावूनय गावातील सर्व माहिती आमच्या पर्यंत पोहचवावे अशा सुचना दिले. यावेळी गजानन कोटलावार म्हणाले.मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण करावे.डी.जे.मुक्त वातावरणात मिरवणूक शांततेत पारपाडावे.तसेच दि.21 एप्रिल रोजी शहरातील अंबेकर नगर येथे अंबेकर जयंती निमित्त आयोजित संस्कृतीत कार्यक्रमात मोठ्यासंख्येत नागरीक उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल डाॅ.प्रा.माधव हळदेकर यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास पोलिस ठाणे हद्दीतील डाॅ.बाबासाहेब अंबेकर जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य पोलिस पाटील,पत्रकार मोठ्यासंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.
धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवून जयंती साजरा करावे.- सपोनी.शिंदे कुंडलवाडी प्रतिनिधी महा पुरूषांचे कार्य महान आहे.त्यांचे योगदान फार मोठे आहे.त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.जयंती मंडळांनी जयंती साजरा करतांना जबाबदारीने पुढे जायचे आहे.पारंपारिक वाद्याचा वापर करून डि.जे मुक्त वातावरणात जयंती साजरा करायत धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवा असे दि.14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.11 एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलिस ठाणे सभागृहात आयोजित शांतता समितीचा बैठकीत सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित जयंती मंडळांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे होते.प्रमुख अथिती नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,पोउनी.गजेंद्र मांजरमकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,पोलिस ठाणे हद्दीत 26 गावे आणि कुंडलवाडी शहराचा समावेश आहे.त्यापैकी 14 गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते.रासह नव्याने ईतर गावात जयंती साजरा करायचे असेल तर धर्मदाय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून परवांगी घ्यावे.जयंतीत डि.जे मुक्त,पारंपारिक वाद्याचा वापर करून साजरा करावे.जयंतीत रक्तदान,संस्कृत कार्यक्रम,तसेच गावातील होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून मदत,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यांना सहाय्य करावे.यातून धार्मिक सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.ज्या जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबून जयंती साजरा करतील अशा मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देवेन सन्मान सत्कार करण्यात येईल. जयंती मिरवणूकीत दारूपिऊन गोंधळ घालणा-यावर मंडळांनी नजर ठेवावे.ज्या पद्धतीने जयंती मंडळाची तयारी चालू आहे.तशाच पद्धतीत पोलिस प्रशासनाची सुद्धा प्रत्येक मंडळाची माहिती जमाकरणे चालू आहे.कोबिंग ऑपरेशन तसेच रात्री अपरात्री संशयित व्यक्ती आढळताच त्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येणार.तसेच पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले,पोलिस पाटील गाव सोडून कुठेच जावूनय गावातील सर्व माहिती आमच्या पर्यंत पोहचवावे अशा सुचना दिले. यावेळी गजानन कोटलावार म्हणाले.मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण करावे.डी.जे.मुक्त वातावरणात मिरवणूक शांततेत पारपाडावे.तसेच दि.21 एप्रिल रोजी शहरातील अंबेकर नगर येथे अंबेकर जयंती निमित्त आयोजित संस्कृतीत कार्यक्रमात मोठ्यासंख्येत नागरीक उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल डाॅ.प्रा.माधव हळदेकर यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास पोलिस ठाणे हद्दीतील डाॅ.बाबासाहेब अंबेकर जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य पोलिस पाटील,पत्रकार मोठ्यासंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.
- Post by Today One Live1
- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार. वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.1
- RCC band kam jila V final kar kar milega quality mein kam aur medium Dam1
- लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.1
- क्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भिमज्योत कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील युवकांना मिळणार नवीन प्रेरणा- अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजीत अनिल गायकवाड1
- परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.1
- उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष सोमवंशी यांचा हार घालून केला सत्कार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठी पकड मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे लातूरच्या जनतेतून बोलले जात आहे. संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी कौतुकास्पद काम केले होते. अशा एका उमद्या, तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट आज मुकला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला2
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा1