धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवून जयंती साजरा करावे.- सपोनी.शिंदे कुंडलवाडी प्रतिनिधी महा पुरूषांचे कार्य महान आहे.त्यांचे योगदान फार मोठे आहे.त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.जयंती मंडळांनी जयंती साजरा करतांना जबाबदारीने पुढे जायचे आहे.पारंपारिक वाद्याचा वापर करून डि.जे मुक्त वातावरणात जयंती साजरा करायत धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवा असे दि.14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.11 एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलिस ठाणे सभागृहात आयोजित शांतता समितीचा बैठकीत सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित जयंती मंडळांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे होते.प्रमुख अथिती नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,पोउनी.गजेंद्र मांजरमकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,पोलिस ठाणे हद्दीत 26 गावे आणि कुंडलवाडी शहराचा समावेश आहे.त्यापैकी 14 गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते.रासह नव्याने ईतर गावात जयंती साजरा करायचे असेल तर धर्मदाय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून परवांगी घ्यावे.जयंतीत डि.जे मुक्त,पारंपारिक वाद्याचा वापर करून साजरा करावे.जयंतीत रक्तदान,संस्कृत कार्यक्रम,तसेच गावातील होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून मदत,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यांना सहाय्य करावे.यातून धार्मिक सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.ज्या जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबून जयंती साजरा करतील अशा मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देवेन सन्मान सत्कार करण्यात येईल. जयंती मिरवणूकीत दारूपिऊन गोंधळ घालणा-यावर मंडळांनी नजर ठेवावे.ज्या पद्धतीने जयंती मंडळाची तयारी चालू आहे.तशाच पद्धतीत पोलिस प्रशासनाची सुद्धा प्रत्येक मंडळाची माहिती जमाकरणे चालू आहे.कोबिंग ऑपरेशन तसेच रात्री अपरात्री संशयित व्यक्ती आढळताच त्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येणार.तसेच पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले,पोलिस पाटील गाव सोडून कुठेच जावूनय गावातील सर्व माहिती आमच्या पर्यंत पोहचवावे अशा सुचना दिले. यावेळी गजानन कोटलावार म्हणाले.मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण करावे.डी.जे.मुक्त वातावरणात मिरवणूक शांततेत पारपाडावे.तसेच दि.21 एप्रिल रोजी शहरातील अंबेकर नगर येथे अंबेकर जयंती निमित्त आयोजित संस्कृतीत कार्यक्रमात मोठ्यासंख्येत नागरीक उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल डाॅ.प्रा.माधव हळदेकर यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास पोलिस ठाणे हद्दीतील डाॅ.बाबासाहेब अंबेकर जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य पोलिस पाटील,पत्रकार मोठ्यासंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.
धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवून जयंती साजरा करावे.- सपोनी.शिंदे कुंडलवाडी प्रतिनिधी महा पुरूषांचे कार्य महान आहे.त्यांचे योगदान फार मोठे आहे.त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.जयंती मंडळांनी जयंती साजरा करतांना जबाबदारीने पुढे जायचे आहे.पारंपारिक वाद्याचा वापर करून डि.जे मुक्त वातावरणात जयंती साजरा करायत धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवा असे दि.14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.11 एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलिस ठाणे सभागृहात आयोजित शांतता समितीचा बैठकीत सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित जयंती मंडळांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे होते.प्रमुख अथिती नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,पोउनी.गजेंद्र मांजरमकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,पोलिस ठाणे हद्दीत 26 गावे आणि कुंडलवाडी शहराचा समावेश आहे.त्यापैकी 14 गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते.रासह नव्याने ईतर गावात जयंती साजरा करायचे असेल तर धर्मदाय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून परवांगी घ्यावे.जयंतीत डि.जे मुक्त,पारंपारिक वाद्याचा वापर करून साजरा करावे.जयंतीत रक्तदान,संस्कृत कार्यक्रम,तसेच गावातील होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून मदत,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यांना सहाय्य करावे.यातून धार्मिक सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.ज्या जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबून जयंती साजरा करतील अशा मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देवेन सन्मान सत्कार करण्यात येईल. जयंती मिरवणूकीत दारूपिऊन गोंधळ घालणा-यावर मंडळांनी नजर ठेवावे.ज्या पद्धतीने जयंती मंडळाची तयारी चालू आहे.तशाच पद्धतीत पोलिस प्रशासनाची सुद्धा प्रत्येक मंडळाची माहिती जमाकरणे चालू आहे.कोबिंग ऑपरेशन तसेच रात्री अपरात्री संशयित व्यक्ती आढळताच त्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येणार.तसेच पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले,पोलिस पाटील गाव सोडून कुठेच जावूनय गावातील सर्व माहिती आमच्या पर्यंत पोहचवावे अशा सुचना दिले. यावेळी गजानन कोटलावार म्हणाले.मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण करावे.डी.जे.मुक्त वातावरणात मिरवणूक शांततेत पारपाडावे.तसेच दि.21 एप्रिल रोजी शहरातील अंबेकर नगर येथे अंबेकर जयंती निमित्त आयोजित संस्कृतीत कार्यक्रमात मोठ्यासंख्येत नागरीक उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल डाॅ.प्रा.माधव हळदेकर यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास पोलिस ठाणे हद्दीतील डाॅ.बाबासाहेब अंबेकर जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य पोलिस पाटील,पत्रकार मोठ्यासंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.
- नांदेड शहरातील शाहू नगर परिसरात विद्यार्थ्यांसाठी 'यशस्वी' व 'लक्ष्मीनारायण' हॉस्टेलचे थाटात उद्घाटन झाले. खासदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा व अभ्यासिकेची सोय मिळेल. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरक्षित व अभ्यासपूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.1
- महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरणासाठी संघर्ष सुरू असून, लोक स्वराज्य आंदोलनाने १९ मे रोजी 'वज्रमुठ महाआंदोलन' पुकारले आहे. या महाआंदोलनात समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील एका राजकीय विश्लेषकाने सध्याच्या घडामोडींवर महत्त्वाचे भाष्य केले. त्यांच्या या निरीक्षणातून स्थानिक राजकीय परिस्थितीचे आकलन होण्यास मदत होईल.1
- औरंगाबादमधील MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील पहेलवान टी हाऊस परिसरात एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.1
- बुधवारी रात्री उदगीर शहरावर अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे खबरदारी म्हणून काही भागांतील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांनी याकडे संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.1
- राज्यात आजही महिलांना पाण्यासाठी मैलो मैल पायपीट करावी लागत आहे. कोट्यवधींचा निधी आल्यानंतरही पाण्याची समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्वप्नील (अण्णा) जाधव यांनी केली आहे.1
- उदगीर-देगलूर रस्त्यावरील बोरतळा पाटीजवळ अचानक नियंत्रण सुटल्याने एक क्रूझर जीप पलटी झाली. सुदैवाने जीप रिकामी असल्याने चालक बचावला आणि कोणतीही जीवितहानी टळली.1