Shuru
Apke Nagar Ki App…
पोलीस अधीक्षक मा. रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुंजाळ यांना निरोप
Rahul dhabale
पोलीस अधीक्षक मा. रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुंजाळ यांना निरोप
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Today One Live1
- ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा ) मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.1
- Post by नागनाथ ससाने1
- समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. मेहकरजवळ धावत्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. मात्र, जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जालना येथून नागपूरकडे शासकीय कामानिमित्ताने जात असताना राज्य राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक कैलास पुसाम यांच्या निदर्शनास ही घटना आली. मेहकरजवळील समृद्धी महामार्गावर एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ पोलिस वाहनाचा सायरन वाजवून संबंधित ट्रॅव्हल्सला थांबवण्यात आले. त्यानंतर पुसाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत वाहनातील सर्व 35 ते 40 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.1
- मुखेड तालुक्यातील दापका राजा ग्रामपंचायतला टाळे — सरपंच व ग्रामसेवक ग्रामस्थांचा संताप उसळला! दापका राजा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले असून, आजच्या तारखेला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात आपल्या सह्या देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरपंच व ग्रामसेवक यांनी विकासकामांच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार (घोटाळा) केला असून, गावाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आलेला नाही. गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले की, 👉 “आमच्या गावाच्या विकासाची पूर्णपणे दयना झाली आहे.” 👉 “रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांचा पूर्ण अभाव आहे.” 👉 “संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, इतका मोठा प्रकार घडूनही अद्याप ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लागल्याने अनेक शासकीय कामे ठप्प झाली आहेत, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.1
- स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक. सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 3 मे 2026. लातूर जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 1. सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर) 2. आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) झडती घेतली असता आरोपींकडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 06 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/2026 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे,सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.2
- Post by Today One Live1
- ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा ) मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.1
- नीट परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे बेहाल बारावी बोर्डात विद्यार्थ्यांचा घसरता निकाल. कडक उन्हामुळे पालकांनी घेतला वृक्षचा अश्रय. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 3 मे 2026. लातूर शहरात नीट (NEET) परीक्षेच्या काळात कडाक्याच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. मे महिन्याच्या भीषण उकाड्यात, दुपारच्या सत्रात परीक्षा केंद्रावर पोहोचताना आणि परीक्षा देताना विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांचा सोबत आलेल्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आज रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेला आलेल्या विद्यार्थी व पालकांत पाहायला दिसून येत होते. आज लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षांचे अयोजन करण्यात आले होते. नीट ( NEET )परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रत्यक्ष दुपारी 2 pm वाजता सुरू होणार होती पण विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रावर 11 : 00 वाजता प्रवेश दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यां सोबत लातूर शहरासह बाहेर गावच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाकडून परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी व पालकांना थांबण्याकरिता उन्हाच्या झळा लागू नये म्हणून सावलीची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात बेहाल झाले असल्याचे चित्र पहायला दिसून येत होते. पालकांनी वृक्षांच्या सावलीचा सहारा घेत गर्दी केली होती. शिवाय पोलीस यंत्रणेकडून परिक्षा केंद्र परिसरातील दुकाने व थंड पेयाचे गाडे सक्तीने बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यां सोबत आलेल्या पालकांचे उन्हाच्या झळा लागून बेहाल झाले असल्याचे प्रत्यक्ष चित्र पाहायला दिसत होते. यात उन्हाच्या तीव्रतेच्या उष्माघाताच्या आजाराने बळी गेल्यास याची जबाबदारी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना घेणार का? मोठी शोकांतिका की, शहरातील विविध विद्यार्थी संघटना, पक्ष, विविध क्लासेस, सेवाभावी संस्था यांच्याकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे चीत्र दिसून आले नाही हाच का लातूर पॅटर्न? यामुळेच की काय? नावाला प्रवेश घेऊन नीट (NEET) सीईटी पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा घसरता निकाल दिसून येतो आहे.1