औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगरच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सिल्लोड येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयातील शिवसेना भवन येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट आणि माजी आमदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री अतुल सावे यांनी मतदारांना मार्गदर्शन करताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी 'कपबशी' या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सावे यांनी स्पष्ट केले की, महायुतीसोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही या पॅनलमध्ये सहभाग असून, राजकीय भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जात आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा बँकेला अधिक सक्षम आणि शेतकरीहिताचे बनवण्यासाठी पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण आदी मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीपूर्वी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन अग्रवाल यांनी केले, तर प्रास्ताविक आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मानले. या बैठकीला गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, रामराव शेळके, रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, राजेंद्र दानवे, दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, रामदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, दामू अण्णा गव्हाणे, सय्यद नासेर हुसेन, सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगरच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सिल्लोड येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयातील शिवसेना भवन येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट आणि माजी आमदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री अतुल सावे यांनी मतदारांना मार्गदर्शन करताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी 'कपबशी' या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सावे यांनी स्पष्ट केले की, महायुतीसोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही या पॅनलमध्ये सहभाग असून, राजकीय भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जात आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त
केला. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा बँकेला अधिक सक्षम आणि शेतकरीहिताचे बनवण्यासाठी पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण आदी मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीपूर्वी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन अग्रवाल यांनी केले, तर प्रास्ताविक आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मानले. या बैठकीला गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, रामराव शेळके, रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, राजेंद्र दानवे, दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, रामदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, दामू अण्णा गव्हाणे, सय्यद नासेर हुसेन, सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, पोलिओ मुक्त भारत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शासन सदैव तत्पर असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः लहान मुलांच्या पालकांपर्यंत, पोलिओ लसीकरणाचा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. या उद्देशाने, शासनातर्फे २८ जून २०२६ रोजी पल्स पोलिओचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बेंदेवाडी शाळेने बेंदेवाडी गावात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढून जनजागृती केली. या प्रभात फेरीची सुरुवात प्रार्थनेने झाली. शाळेतील शिक्षक तुषार गवई, कैलास पवार आणि शितल भडांगे यांनी ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओची लस घेणे का महत्त्वाचे आहे, यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर, सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी जनजागृतीसाठी प्रभात फेरीत विविध घोषणा देत संपूर्ण गावकऱ्यांना २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील १०० टक्के बालकांना पोलिओ लस घेण्याचा संदेश दिला. शाळेचे मुख्याध्यापक रणजित राठोड यांनी पल्स पोलिओ व विविध रोगांना कसे समूळ नष्ट करू शकतो, प्रत्येक लस ० ते ५ वयोगटातील बालकासाठी किती महत्त्वाची असते, तसेच संतुलित आहार, योग, रोगमुक्त व तणावमुक्त जीवन यावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रभात फेरीत सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश नारहाडे, माजी सरपंच नारायण बैनाडे, सुरेश उसारे, दिनेश शिहिरे, गितेश शिहिरे, चतरसिंग बैनाडे, शाम शिहिरे, प्रदीप बैनाडे, संतोष नारहाडे, गणेश शिहिरे, करण शेवगण, सागर राजपूत, राहुल धनावत, संतोष तसेवाल, जगन्नाथ ठोंबरे, दीपक हिवराळे, सुवर्णसिंग राजरवाल, अनुसया चरावंडे, कांचनाबाई नारहाडे यांसह अनेक पालक उपस्थित होते. प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करून पोलिओ मुक्त भारत ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रणजित राठोड, कैलास पवार, तुषार गवई आणि शितल भडागे यांनी परिश्रम घेतले.3
- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगरच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सिल्लोड येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयातील शिवसेना भवन येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट आणि माजी आमदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री अतुल सावे यांनी मतदारांना मार्गदर्शन करताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी 'कपबशी' या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सावे यांनी स्पष्ट केले की, महायुतीसोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही या पॅनलमध्ये सहभाग असून, राजकीय भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जात आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा बँकेला अधिक सक्षम आणि शेतकरीहिताचे बनवण्यासाठी पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण आदी मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीपूर्वी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन अग्रवाल यांनी केले, तर प्रास्ताविक आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मानले. या बैठकीला गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, रामराव शेळके, रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, राजेंद्र दानवे, दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, रामदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, दामू अण्णा गव्हाणे, सय्यद नासेर हुसेन, सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- बेंगळुरूच्या राजाजीनगरमधील राम मंदिर रोडवर चालत्या दुचाकीवर अचानक झाडाची सुकलेली फांदी कोसळल्याने ५२ वर्षीय सतीश गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ते कोमात गेले असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात खत टंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे ते हतबल झाले आहेत. केंद्र सरकारद्वारे अनुदानित रासायनिक खत विक्रीसाठी सुरू करण्यात आलेले “फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” हे ॲप (FSS app) सध्या शेतकरी आणि खत विक्रेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना या ॲपमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने छत्रपती संभाजीनगरात खत खरेदी प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहूनही खत बुकिंग करता येत नसल्याचे चित्र आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील विविध भागात तीन दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने शेतकरी पेरणी आणि लागवडीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, डिएपी आणि युरियासारख्या महत्त्वाच्या खतांची पैठण, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर या तालुक्यांमध्ये तीव्र टंचाई आहे. ऑनलाइन पोर्टलवर खताचा पुरेसा साठा दिसत असला, तरी तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे ऑनलाइन बुकिंग होत नाही, परिणामी त्यांना खत मिळत नाही. शासनाने खत वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि अनुदानित खत थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ही ऑनलाइन प्रणाली लागू केली आहे. परंतु, प्रत्यक्षात ॲप सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन जाणे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. कृषी दुकानदारांनीही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय खत देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खत टंचाई आणि खतांच्या लिंकिंगच्या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृषी विभागाने साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटना खतांच्या गोदामांवर धाडी टाकून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात महत्त्वाची खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी खत टंचाईमुळे हतबल झाले असून, प्रशासनाने तातडीने ऑफलाइन खत विक्री सुरू करावी, अशी मागणी ते करत आहेत.4
- बदनापूर पोलीस ठाण्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले आहे, ज्यात महापुरुष फुले-शाहू-आंबेडकर यांचा जाहीर अवमान करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी संजय इचे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. २४ जून २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित एका जाहीर सभेत आरोपींनी ही आक्षेपार्ह वक्तव्ये केली, ज्यामुळे कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सभेत, आरोपी संजय इचे (राहणार: जालना) याने जाहीरपणे माईकवरून बोलताना "हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र नाही" असे अत्यंत आक्षेपार्ह, भडकवू आणि महापुरुषांची मानहानी करणारे निंदनीय विधान केले. त्याचवेळी, व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने (दुसरा आरोपी) परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरणीय कुटुंबाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करत त्यांची जाहीरपणे बदनामी केली. या दोन्ही आरोपींच्या प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी) मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले असून ते व्हायरल झाले आहेत, असे निवेदनात पुराव्या दाखल नमूद आहे. निवेदनानुसार, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सर्वोच्च प्रेरणास्थान आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत. संजय इचेने जाणीवपूर्वक व हेतुपरस्सर या महापुरुषांचा अवमान करून संपूर्ण बहुजन समाजाच्या तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरवादी जनतेच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या आहेत. दुसऱ्या आरोपीने कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेडकर कुटुंबावर चिखलफेक करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही आरोपींच्या द्वेषयुक्त आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे शांतताप्रिय महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ, सामाजिक वैमनस्य आणि अशांतता निर्माण होण्याची दाट शक्यता असून, हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे निवेदनात गंभीरपणे म्हटले आहे. हे कृत्य भारतीय संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा घोर अपमान करणारे आहे. महाराष्ट्रातील सामाजिक व जातीय शांतता अबाधित राखण्यासाठी आणि महापुरुषांचा व त्यांच्या कुटुंबांचा असा जाहीर अवमान रोखण्यासाठी, दोषी संजय इचे आणि संबंधित अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांन्वये, तसेच पूर्वीच्या भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १५३-अ (दोन गटांत वैमनस्य पसरवणे), २९५-अ (धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावणे), ५०५(१)(क) (सार्वजनिक शांतता बिघडवणारे वक्तव्य) व अन्य संबंधित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.1
- शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळावर उपस्थित होते.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील कब्रस्तानात पाणी शिरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची मोठी हलगर्जीपणा आणि बेफिकिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.1
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राऊतांनी शिंदे गटातील सहा खासदारांनाही लक्ष्य करत विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, या टीकेला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1