चिंताजनक! बुलडाणा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात अवघ्या २८ दिवसांत तब्बल १४८ महिला व मुली घर सोडून बेपत्ता.. बुलडाणा: लिव्ह-इन रिलेशनशिप पर्यटन किंवा भ्रमंतीची इच्छा काही प्रकरणांमध्ये मानसिक समस्या काही महिलांनी लग्नानंतरही जुन्या प्रेमसंबंधांमुळे घर सोडल्याचे प्रकारही समोर आले आहेत, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांवर गंभीर परिणाम होत आहेत. पालकांची चिंता वाढली लहान वयातील मुलीही भविष्याचा विचार न करता घर सोडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल बंद करून संपर्क तोडल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. “मुलींच्या हालचालींवर व संपर्कावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाला मदत होऊ शकते,” असे मत महिला शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक कमला उमाळे यांनी व्यक्त केले. सामाजिक जबाबदारीही महत्त्वाची या वाढत्या घटनांमुळे केवळ पोलिस व प्रशासनच नव्हे, तर समाज व नातेवाईकांची जबाबदारीही वाढली आहे. मुलांचे संगोपन, संवाद आणि योग्य मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
चिंताजनक! बुलडाणा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात अवघ्या २८ दिवसांत तब्बल १४८ महिला व मुली घर सोडून बेपत्ता.. बुलडाणा: लिव्ह-इन रिलेशनशिप पर्यटन किंवा भ्रमंतीची इच्छा काही प्रकरणांमध्ये मानसिक समस्या काही महिलांनी लग्नानंतरही जुन्या प्रेमसंबंधांमुळे घर सोडल्याचे प्रकारही समोर आले आहेत, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांवर गंभीर परिणाम होत आहेत. पालकांची चिंता वाढली लहान वयातील मुलीही भविष्याचा विचार न करता घर सोडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल बंद करून संपर्क तोडल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. “मुलींच्या हालचालींवर व संपर्कावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाला मदत होऊ शकते,” असे मत महिला शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक कमला उमाळे यांनी व्यक्त केले. सामाजिक जबाबदारीही महत्त्वाची या वाढत्या घटनांमुळे केवळ पोलिस व प्रशासनच नव्हे, तर समाज व नातेवाईकांची जबाबदारीही वाढली आहे. मुलांचे संगोपन, संवाद आणि योग्य मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
- बुलढाणा जिल्ह्याचे वैभव आणि चिखली शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री रेणुका माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला आहे. आज पहाटे पारंपरिक विधीवत पूजा आणि घटस्थापनेने या नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरुवात झाली. २ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या चिखली नगरीत आजपासून नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पहाटेच्या मंगल मुहूर्तावर रेणुका माता संस्थानच्या वतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.यंदाचा नवरात्रोत्सव विशेष ठरणार आहे. संस्थानच्या वतीने २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी महापूजा, अभिषेक, दुपारी आरती आणि सायंकाळी विविध भजनांचे कार्यक्रम रंगणार आहेत. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.उत्सव कालावधी | १० दिवस (समाप्ती २ एप्रिल) | | मुख्य विधी | घटस्थापना, महापूजा, अखंड दीप प्रज्वलन | | विशेष आयोजन | भजन, कीर्तन आणि धार्मिक प्रवचने | | भक्त सोय | महाप्रसाद आणि दर्शन रांगेचे नियोजन चिखलीचे हे शक्तिपीठ केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान आहे. येत्या नऊ दिवसांत याठिकाणी श्रद्धेचा मोठा महाकुंभ भरणार असून, प्रशासनानेही या गर्दीचे नियोजन करण्यासाठी कंबर कसली आहे.1
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- Post by Gautam Hiwrale1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1