घरकुल प्रत्येक लाभार्थ्यांना मिळालेच पाहिजे यासाठी लातूर जिल्ह्याच्या खासदारांचे विशेष प्रयत्न जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा- खासदार डॉ. शिवाजी काळगे लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योग्य नियोजन करावे आणि घरकुलाचे अनुदान कोणत्याही विलंबाशिवाय दिले जाईल यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, अशासकीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत योजनांच्या लाभार्थी वयोवृद्ध व्यक्तींच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामात येत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. सध्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने कृषी विभागाने तत्काळ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून नुकसानीची अचूक नोंद करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत, तसेच पोषण आहाराच्या बाबतीत सर्व आवश्यक निकष काटेकोरपणे पाळले जावेत, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी जिल्ह्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी व्ही. बी. जी. राम जी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरी व ग्रामीण भागात एकही अंगणवाडी इमारतीविना राहू नये आणि सर्व अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळावी, यासाठी जिथे जागा उपलब्ध नाही तिथे ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण हा बालकांच्या शिक्षण व पोषणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर भुयारी गटार योजनेची कामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. आगामी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावात व्ही. बी. जी. राम जी योजनेतून किमान एकतरी काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता अवैध पाणी उपसा रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका, महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्त पथक स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा त्यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या. तसेच योजनांच्या अंमलबजावणीविषयी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले.
घरकुल प्रत्येक लाभार्थ्यांना मिळालेच पाहिजे यासाठी लातूर जिल्ह्याच्या खासदारांचे विशेष प्रयत्न जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा- खासदार डॉ. शिवाजी काळगे लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योग्य नियोजन करावे आणि घरकुलाचे अनुदान कोणत्याही विलंबाशिवाय दिले जाईल यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, अशासकीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत योजनांच्या लाभार्थी वयोवृद्ध व्यक्तींच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामात येत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. सध्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने कृषी विभागाने तत्काळ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून नुकसानीची अचूक नोंद करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत, तसेच पोषण आहाराच्या बाबतीत सर्व आवश्यक निकष काटेकोरपणे पाळले जावेत, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी जिल्ह्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी व्ही. बी. जी. राम जी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरी व ग्रामीण भागात एकही अंगणवाडी इमारतीविना राहू नये आणि सर्व अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळावी, यासाठी जिथे जागा उपलब्ध नाही तिथे ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण हा बालकांच्या शिक्षण व पोषणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर भुयारी गटार योजनेची कामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. आगामी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावात व्ही. बी. जी. राम जी योजनेतून किमान एकतरी काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता अवैध पाणी उपसा रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका, महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्त पथक स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा त्यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या. तसेच योजनांच्या अंमलबजावणीविषयी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले.
- *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे3
- :श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर मध्ये भव्य कीर्तनाचा सोहळा संपन्न देगलूर : ऋषी पंचमीच्या पावन तिथीनिमित्त श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज व श्री दत्त महाराज मंदिर बापू मार्केट येथे मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .श्रीदेवी असावरी रबंदे जोशी यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा संपन्न झाला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मोठ्या संख्येने महिला पुरुष मुली मुले या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला . या संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रमेश कंतेवार,वैजनाथ स्वामी,अशोक साखरे ,सायलू तैदलवार,नारायण तोटावर ,सुवर्णकार सूर्यकांत,सत्यनारायण नागोरी,आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रतिनिधी :संदीप देसाई2
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- आमच्या घरी गणरायाचे थाटात मंगलमय आगमन! मंगलमय वातावरण पूजा अर्चना 🙏🌺 सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची… 🌺🙏 आमच्या घरी गणरायाचे थाटात मंगलमय आगमन! गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना— सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो…! 🙏❤️ 🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #गणेशचतुर्थी #गणरायाचेआगमन #बाप्पाचाआगमनसोहळा #गणेशोत्सव #गणराया #सुखकर्तादुःखहर्ता #श्रीगणेश #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #Ganeshotsav1
- मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.1
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.4
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1