कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील मायनर व तलाव भरून मिळावे. नगराध्यक्षा,डॉ.प्रणिता भगीरथ भालके भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील सर्व मायनर व तलाव तातडीने भरून देण्यात यावेत, या मागणीसाठी लोकनेते आमदार भारत नाना भालके फौंडेशनच्या वतीने नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी प्रांतअधिकारी सचिन इथापे साहेब यांना निवेदन दिले. यावेळी मागणीची तत्काळ दखल घेत तलाव भरून घेणेसाठी प्रयत्न करू असे सांगितले.* *पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी व भाटघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. परंतू पंढरपूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले, तलाव व कुपनलिका इ.कोरडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी, अनवली,कासेगांव,शिरगाव, नेपतगांव, ओझेवाडी व इतर तलाव यांना उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरील विविध मायनरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या अनेक तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून काही तलाव पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. उजनी व भाटघर धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरून संबंधित मायनरद्वारे परिसरातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे नगरअध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी निवेदनात म्हणले आहे यावेळी संभाजी कांबळे, दादासो ढोले, मारुती भाकरे, सुखदेव घाटुळ, विजय ढोले, अतुल फरकंडे, विलास शिंदे, विजय ढोले, लखन सुर्यवंशी, बापुसो भोसले, कपील कोरके, दाजीसो देशमुख, अंकुश डांगे, धनाजी कळकुंबे, पांडूरंग भुसे, सदाशिव जाधव,सुधाकर शिंदे उपस्थित होते.
कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील मायनर व तलाव भरून मिळावे. नगराध्यक्षा,डॉ.प्रणिता भगीरथ भालके भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील सर्व मायनर व तलाव तातडीने भरून देण्यात यावेत, या मागणीसाठी लोकनेते आमदार भारत नाना भालके फौंडेशनच्या वतीने नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी प्रांतअधिकारी सचिन इथापे साहेब यांना निवेदन दिले. यावेळी मागणीची तत्काळ दखल घेत तलाव भरून घेणेसाठी प्रयत्न करू असे सांगितले.* *पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी व भाटघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. परंतू पंढरपूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले, तलाव व कुपनलिका इ.कोरडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी, अनवली,कासेगांव,शिरगाव, नेपतगांव, ओझेवाडी व इतर तलाव यांना उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरील विविध मायनरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या अनेक तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून काही तलाव पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. उजनी व भाटघर धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरून संबंधित मायनरद्वारे परिसरातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे नगरअध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी निवेदनात म्हणले आहे यावेळी संभाजी कांबळे, दादासो ढोले, मारुती भाकरे, सुखदेव घाटुळ, विजय ढोले, अतुल फरकंडे, विलास शिंदे, विजय ढोले, लखन सुर्यवंशी, बापुसो भोसले, कपील कोरके, दाजीसो देशमुख, अंकुश डांगे, धनाजी कळकुंबे, पांडूरंग भुसे, सदाशिव जाधव,सुधाकर शिंदे उपस्थित होते.
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.2