Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलकांनी या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची आणि जबाबदार व्यक्तींच्या राजीनाम्याची कडक मागणी केली आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर ढवळून काढला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान प्रतिनिधी सचिन बडे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
Marathi News Point
छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलकांनी या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची आणि जबाबदार व्यक्तींच्या राजीनाम्याची कडक मागणी केली आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर ढवळून काढला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान प्रतिनिधी सचिन बडे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग संघटनांशी साधलेल्या संवादादरम्यान, शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत सूक्ष्म व लघु उद्योगांना समन्यायी व सुयोग्य पद्धतीने भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. शेंद्रा बिडकीन वसाहतीत सूक्ष्म व लघु उद्योगांना भूखंड देण्याबाबत त्वरित निर्णय घेऊन उच्चतम दर निश्चित करण्यात यावेत, जेणेकरून उद्योजकांना भूखंड घेणे शक्य होईल, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा व बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनस सुरू करण्याच्या मागणीवर बोलताना, उद्योग संघटनांनी सहभाग देऊन सहयोग तत्त्वावर ट्रक टर्मिनस उभारावे आणि चालवावे, असे श्री. सामंत यांनी सांगितले. तसेच उद्योजकांच्या वीज पुरवठ्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतील वीज वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवून द्यावा आणि एक्झिबीशन सेंटरच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार विलास भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य अभियंता राहुल बनसोड, अधीक्षक अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, उप अभियंता नितीन जाधव, कार्यकारी अभियंता नागोराव राठोड, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी, युवक, पालकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. NEET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जंतर-मंतर येथील लाठीचार्जची जबाबदारी निश्चित करावी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता राखून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवावा, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला सादर करण्यात आले. हे आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही लढाई सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे.4
- NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले आहेत, याबाबतचे थेट प्रसारण करण्यात आले आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय विधान केले आहे, याविषयीची माहिती यात मांडण्यात आली आहे.1
- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या आवाहनाला पाठिंबा देत पाचोडमधील व्यापाऱ्यांनी सुमारे दोन तास आपली व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवली. या आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पुतळ्यापासून पाचोड-पैठण चौकातील बसस्थानक परिसरापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यासोबतच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांना देण्यात आले असून या आंदोलनात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.4
- बदनापूर येथे सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही रमेश सुंदरलाल जैन यांच्या परिवाराचा शोध लागू शकलेला नाही. रमेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही महिन्यांपूर्वी सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक सादिक शेठ आणि विखार सिद्दीकी यांच्या ट्रान्सपोर्टवर काम करत होते. रमेश जैन यांच्या परिवाराचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवणे हेच सध्या ध्येय आहे. जर कोणाला त्यांच्या परिवाराविषयी माहिती असेल, तर बदनापूर येथील पत्रकार नजीर इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात माणुसकीचे दर्शन घडवत पाथरीकर पेट्रोल पंपावरील कर्मचारी शेख नईम, शेख नजीर इनामदार, भाऊसाहेब साळुंके आणि मगरे परमेश्वर यांच्यासह संपूर्ण पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसली, तरी बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किसन जाधव यांनी माणुसकीच्या नात्याने खूप मदत केली. यासोबतच चाळीसगावचे पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार महेश थेरे आणि बदनापूरचे पोलीस निरीक्षक यांनीही मदत केली असून, पाथरीकर पेट्रोल पंपाचे संपूर्ण कर्मचारी त्यांची व्यवस्था पाहत आहेत.2
- पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी मध्यस्थी केल्यानंतर बंजारा समाजाने आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे.1
- कॉक्रोज जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.1
- औरंगाबादमध्ये प्रती पंढरपूर यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने नागरिकांनी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्तांनी केले आहे. यात्रा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते नियोजन केले असून, नागरिकांनी आणि भाविकांनी संयम राखून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.1